शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कामरगाव जिल्हा परिषद विद्यालयातील खाद्य महोत्सवात रानभाज्यांची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 15:30 IST

कारंजा: कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयात आयोजित  खाद्यमहोत्सवात विद्यार्थ्यांनी  आनंद मेळावा साजरा केला या आनंद मेळाव्यात विविध   खाद्यपदार्थांसोबतच विविध प्रकारच्या रानभाज्यांपासून बनवलेले पदार्थही विशेष आकर्षण ठरले.

ठळक मुद्देया आनंद मेळाव्यात विविध   खाद्यपदार्थांसोबतच विविध प्रकारच्या रानभाज्यांपासून बनवलेले पदार्थही विशेष आकर्षण ठरले.रानभाज्यांमध्ये चाकवत, चवळी, अंबाडी, चिली, दाळिंबी, हेटा, चमकुरा, तांदुळजिरा, शेवगा, काठेमाठ, चोपडामाठ या भाज्यांचा समावेश होता. त्यासोबत तांदूळ, ज्वारी,बाजरी, मिसळीच्या विविध प्रकारच्या भाकरी खास आकर्षण होते.

 

कारंजा: कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयात आयोजित  खाद्यमहोत्सवात विद्यार्थ्यांनी  आनंद मेळावा साजरा केला.या आनंद मेळाव्यात विविध   खाद्यपदार्थांसोबतच विविध प्रकारच्या रानभाज्यांपासून बनवलेले पदार्थही विशेष आकर्षण ठरले.विद्यार्थ्यांनी या रानभाज्यांचा आस्वाद घेतला .

दरवर्षी प्रमाणे यावर्षी जिल्हा परिषद विदयालय कामरगाव येथे आनंद मेळाव्याचे  आयोजन करण्यात आले होत.े या आनंद मेळाव्याचे उदघाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा देशमुख यांनी केले. संवेदना संस्था व पर्यावरण शिक्षण केंद्र पुणे यांचे पर्यावरण शिक्षण मित्र साहेबराव राठोड , भिमराव सुरडकर, पर्यवेक्षिका प्रेमलता पारवे, गोपाल खाडे उपस्थित होते. रानभाजी खाद्यमहोत्सवाच्या आयोजन निता तोडकर पर्यावरण शिक्षक यांनी मुख्याध्यापिका सुरेखा देशमुखा यांच्या मार्गदर्शनात केले होते .आनंद मेळाव्याचे आयोजन दिपाली खोडके,सोनाली ठाकरे, गोपाल खाडे,पुष्पा व्यवहारे, संजीवनी सोळंके, निर्मला शेरेकर, माधुरी दुधे, नीता तोडकर, विजया उगले, ममता जयस्वाल, शीतल काळे व पुरुषोत्तम दाहेदार यांनी केले होते.या आनंद मेळाव्यात जवळपास ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.  तर रानभाज्या  खाद्यमहोत्सवामध्ये दहा विद्याथीर्नी आपला सहभाग नोंदविला.रानभाज्यांमध्ये चाकवत, चवळी, अंबाडी, चिली, दाळिंबी, हेटा, चमकुरा, तांदुळजिरा, शेवगा, काठेमाठ, चोपडामाठ या भाज्यांचा समावेश होता.या भाज्या विद्यार्थिनींनी बनवून आणल्या. त्यासोबत तांदूळ, ज्वारी,बाजरी, मिसळीच्या विविध प्रकारच्या भाकरी खास आकर्षण होते. विद्याथीर्नींनी पदार्थ कसे बनवायचे याबाबत सुद्धा उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली .

याशिवाय या भाज्यांची आपल्या जीवनामध्ये असलेले आरोग्यदायी महत्त्वसुद्धा विद्यार्थिनींनी इतरांना समजावून सांगितले.आनंद मेळाव्यात सुद्धा विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ बनवून आणले होते.कोणतेही काम कमी प्रतीचे नसते व श्रम करणा?्या लोकांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आदर निर्माण व्हावा,विद्यार्थ्यांना विविध रानभाज्यांची माहिती होऊन त्याचे महत्त्व त्यांना कळावे यासाठी या बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी याबद्दल विद्यार्थी तथा शिक्षकांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशाची आयोजनकरीता शिक्षक तथा विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाStudentविद्यार्थी