शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कामरगाव जिल्हा परिषद विद्यालयातील खाद्य महोत्सवात रानभाज्यांची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 15:30 IST

कारंजा: कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयात आयोजित  खाद्यमहोत्सवात विद्यार्थ्यांनी  आनंद मेळावा साजरा केला या आनंद मेळाव्यात विविध   खाद्यपदार्थांसोबतच विविध प्रकारच्या रानभाज्यांपासून बनवलेले पदार्थही विशेष आकर्षण ठरले.

ठळक मुद्देया आनंद मेळाव्यात विविध   खाद्यपदार्थांसोबतच विविध प्रकारच्या रानभाज्यांपासून बनवलेले पदार्थही विशेष आकर्षण ठरले.रानभाज्यांमध्ये चाकवत, चवळी, अंबाडी, चिली, दाळिंबी, हेटा, चमकुरा, तांदुळजिरा, शेवगा, काठेमाठ, चोपडामाठ या भाज्यांचा समावेश होता. त्यासोबत तांदूळ, ज्वारी,बाजरी, मिसळीच्या विविध प्रकारच्या भाकरी खास आकर्षण होते.

 

कारंजा: कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयात आयोजित  खाद्यमहोत्सवात विद्यार्थ्यांनी  आनंद मेळावा साजरा केला.या आनंद मेळाव्यात विविध   खाद्यपदार्थांसोबतच विविध प्रकारच्या रानभाज्यांपासून बनवलेले पदार्थही विशेष आकर्षण ठरले.विद्यार्थ्यांनी या रानभाज्यांचा आस्वाद घेतला .

दरवर्षी प्रमाणे यावर्षी जिल्हा परिषद विदयालय कामरगाव येथे आनंद मेळाव्याचे  आयोजन करण्यात आले होत.े या आनंद मेळाव्याचे उदघाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा देशमुख यांनी केले. संवेदना संस्था व पर्यावरण शिक्षण केंद्र पुणे यांचे पर्यावरण शिक्षण मित्र साहेबराव राठोड , भिमराव सुरडकर, पर्यवेक्षिका प्रेमलता पारवे, गोपाल खाडे उपस्थित होते. रानभाजी खाद्यमहोत्सवाच्या आयोजन निता तोडकर पर्यावरण शिक्षक यांनी मुख्याध्यापिका सुरेखा देशमुखा यांच्या मार्गदर्शनात केले होते .आनंद मेळाव्याचे आयोजन दिपाली खोडके,सोनाली ठाकरे, गोपाल खाडे,पुष्पा व्यवहारे, संजीवनी सोळंके, निर्मला शेरेकर, माधुरी दुधे, नीता तोडकर, विजया उगले, ममता जयस्वाल, शीतल काळे व पुरुषोत्तम दाहेदार यांनी केले होते.या आनंद मेळाव्यात जवळपास ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.  तर रानभाज्या  खाद्यमहोत्सवामध्ये दहा विद्याथीर्नी आपला सहभाग नोंदविला.रानभाज्यांमध्ये चाकवत, चवळी, अंबाडी, चिली, दाळिंबी, हेटा, चमकुरा, तांदुळजिरा, शेवगा, काठेमाठ, चोपडामाठ या भाज्यांचा समावेश होता.या भाज्या विद्यार्थिनींनी बनवून आणल्या. त्यासोबत तांदूळ, ज्वारी,बाजरी, मिसळीच्या विविध प्रकारच्या भाकरी खास आकर्षण होते. विद्याथीर्नींनी पदार्थ कसे बनवायचे याबाबत सुद्धा उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली .

याशिवाय या भाज्यांची आपल्या जीवनामध्ये असलेले आरोग्यदायी महत्त्वसुद्धा विद्यार्थिनींनी इतरांना समजावून सांगितले.आनंद मेळाव्यात सुद्धा विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ बनवून आणले होते.कोणतेही काम कमी प्रतीचे नसते व श्रम करणा?्या लोकांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आदर निर्माण व्हावा,विद्यार्थ्यांना विविध रानभाज्यांची माहिती होऊन त्याचे महत्त्व त्यांना कळावे यासाठी या बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी याबद्दल विद्यार्थी तथा शिक्षकांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशाची आयोजनकरीता शिक्षक तथा विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाStudentविद्यार्थी