शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

कोथिंबीर शेतकऱ्याकडून दहाला पाच, ग्राहकाच्या पदरात दहाला दोन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:43 IST

यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीला दमदार पाऊस झाला. यामुळे खरिपातील पिकांसोबतच भाजीपालावर्गीय पिकांची स्थितीही उत्तम राहिली. अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न हाती पडल्याने ...

यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीला दमदार पाऊस झाला. यामुळे खरिपातील पिकांसोबतच भाजीपालावर्गीय पिकांची स्थितीही उत्तम राहिली. अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न हाती पडल्याने बाजारात भाजीपाल्याचे दर सध्या चांगलेच गडगडले आहेत. फुलकोबी, पत्ताकोबी, भेंडी, टमाटर, सिमला मिर्ची, मेथी, पालक, कोथिंबीर आदी पालेभाज्यांचे दर कमी झाले असून, व्यावसायिक त्यांच्या परीने फायद्याचा व्यवसाय करीत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा आलेली आहे.

..................

कोणत्या भाजीला काय भाव?

वांगी - १०/२०

टोमॅटो - १०/२०

भेंडी - ५/१०

पत्ताकोबी - १०/२०

फुलकोबी - १०/२०

काकडी - १०/१५

कारले - ३०/४०

मेथी - ५/१०

पालक - ५/१०

कोथिंबीर - २/४

दोडके - १०/२०

हिरवी मिरची - १०/२०

.............................

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना...

शेतात दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजीपालावर्गीय पिकांची लागवड केली. समाधानकारक पर्जन्यमान आणि अनुकूल हवामानामुळे उत्पादन चांगले झाले. मात्र, दर गडगडल्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. लावलेला खर्चही यामुळे वसूल होईना.

-दिलीप मुठाळ

........................

शेतात यंदा पाण्याची मुबलक सोय आहे. त्यामुळे भाजीपाला पिकापासून चांगले उत्पन्न हाती पडेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र चालू आठवड्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर कमी झाले असून, वाहतूक खर्चही निघणे कठीण झाले आहे.

-अतुल कुटे

.....................

ग्राहकांचा फायदा; मात्र नाराजीचा सूर...

हर्रासीतून व्यावसायिकांना कमी दराने भाजीपाला मिळतो. मात्र, तोच बाजारात किंवा घरासमोर विकत घेताना दर वाढलेले असतात. त्यातही अधिकांश भाजीपाला सडलेला निघत असल्याने तुलनेने दुहेरी नुकसान सहन करावे लागत आहे.

-मनीषा शिंदे

................

सर्वच भाजीपाल्याचे दर सध्या कमी झाले आहेत. मात्र, ग्राहकांना त्याचा विशेष फायदा होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. भाजीपाला विक्रेत्यांनी कधी- कधी ग्राहकांचाही विचार करायला हवा. दर कमी झाल्यास त्याचा लाभ ग्राहकांना मिळावा.

-अंजली देशमुख

................

भावात एवढा फरक का?

वाशिम शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दैनंदिन भाजीपाल्याची हर्रासी होते. त्याठिकाणी व्यावसायिकांकडून माल विकत घेऊन तो दिवसभर बाजारात बसून विकला जातो. स्वत:ची कमाई, वाहतूक खर्च जोडले जात असल्याने त्याचे दर दुप्पट होतात, असे काही व्यावसायिकांनी सांगितले.