शहरं
Join us  
Trending Stories
1
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
2
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
3
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
4
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
5
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
6
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
7
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
8
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
9
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
10
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
11
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
12
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
13
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
14
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
15
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
16
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
17
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
18
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
19
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
20
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
Daily Top 2Weekly Top 5

कोथिंबीर शेतकऱ्याकडून दहाला पाच, ग्राहकाच्या पदरात दहाला दोन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:43 IST

यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीला दमदार पाऊस झाला. यामुळे खरिपातील पिकांसोबतच भाजीपालावर्गीय पिकांची स्थितीही उत्तम राहिली. अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न हाती पडल्याने ...

यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीला दमदार पाऊस झाला. यामुळे खरिपातील पिकांसोबतच भाजीपालावर्गीय पिकांची स्थितीही उत्तम राहिली. अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न हाती पडल्याने बाजारात भाजीपाल्याचे दर सध्या चांगलेच गडगडले आहेत. फुलकोबी, पत्ताकोबी, भेंडी, टमाटर, सिमला मिर्ची, मेथी, पालक, कोथिंबीर आदी पालेभाज्यांचे दर कमी झाले असून, व्यावसायिक त्यांच्या परीने फायद्याचा व्यवसाय करीत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा आलेली आहे.

..................

कोणत्या भाजीला काय भाव?

वांगी - १०/२०

टोमॅटो - १०/२०

भेंडी - ५/१०

पत्ताकोबी - १०/२०

फुलकोबी - १०/२०

काकडी - १०/१५

कारले - ३०/४०

मेथी - ५/१०

पालक - ५/१०

कोथिंबीर - २/४

दोडके - १०/२०

हिरवी मिरची - १०/२०

.............................

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना...

शेतात दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजीपालावर्गीय पिकांची लागवड केली. समाधानकारक पर्जन्यमान आणि अनुकूल हवामानामुळे उत्पादन चांगले झाले. मात्र, दर गडगडल्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. लावलेला खर्चही यामुळे वसूल होईना.

-दिलीप मुठाळ

........................

शेतात यंदा पाण्याची मुबलक सोय आहे. त्यामुळे भाजीपाला पिकापासून चांगले उत्पन्न हाती पडेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र चालू आठवड्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर कमी झाले असून, वाहतूक खर्चही निघणे कठीण झाले आहे.

-अतुल कुटे

.....................

ग्राहकांचा फायदा; मात्र नाराजीचा सूर...

हर्रासीतून व्यावसायिकांना कमी दराने भाजीपाला मिळतो. मात्र, तोच बाजारात किंवा घरासमोर विकत घेताना दर वाढलेले असतात. त्यातही अधिकांश भाजीपाला सडलेला निघत असल्याने तुलनेने दुहेरी नुकसान सहन करावे लागत आहे.

-मनीषा शिंदे

................

सर्वच भाजीपाल्याचे दर सध्या कमी झाले आहेत. मात्र, ग्राहकांना त्याचा विशेष फायदा होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. भाजीपाला विक्रेत्यांनी कधी- कधी ग्राहकांचाही विचार करायला हवा. दर कमी झाल्यास त्याचा लाभ ग्राहकांना मिळावा.

-अंजली देशमुख

................

भावात एवढा फरक का?

वाशिम शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दैनंदिन भाजीपाल्याची हर्रासी होते. त्याठिकाणी व्यावसायिकांकडून माल विकत घेऊन तो दिवसभर बाजारात बसून विकला जातो. स्वत:ची कमाई, वाहतूक खर्च जोडले जात असल्याने त्याचे दर दुप्पट होतात, असे काही व्यावसायिकांनी सांगितले.