शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

वाशिम जिल्ह्यातील पहिली रेशीम चौकी कार्यान्वित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 14:47 IST

माधव भिवाजी बोरकर या शेतकऱ्याने जिल्ह्यातील पहिली रेशीम चौकी (रेशीम किटक संगोपन केंद्र) कार्यान्वित केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील काही भागात थोड्याफार प्रमाणात रेशीम शेती केली जायची. त्यासाठी लागणारे अंडीपुंज आंध्रप्रदेशातून आणावे लागायचे. ही बाब लक्षात घेऊन टो या गावातील माधव भिवाजी बोरकर या शेतकऱ्याने जिल्ह्यातील पहिली रेशीम चौकी (रेशीम किटक संगोपन केंद्र) कार्यान्वित केली. त्यास केंद्रीय रेशीम मंडळ, बंगलोर यांच्याकडून रितसर मान्यता मिळाली आहे. यामुळे रेशीम शेती करू इच्छित शेतकऱ्यांना अंडीपुंज तत्काळ उपलब्ध होणार असून वेळ पैशाचा अपव्यय टळणार आहे. सोबतच रेशीम उद्योगासही जिल्ह्यात चालना मिळणार आहे.टो येथील माधव बोरकर या युवा शेतकºयाने गत १० वर्षांपासून रेशीम शेतीकडे लक्ष केंद्रीत केले. त्याबाबतचे प्रशिक्षणही त्यांनी ९० दिवस हैद्राबाद येथे राहून पूर्ण केले. दरम्यान, रेशीम शेती करणाºया शेतकºयांना अंडीपुंज आणण्याकरिता आंध्रप्रदेशात जावे लागते. यात त्यांचा फार मोठा वेळ जाण्यासोबतच पैसे देखील खर्च होतात. ही बाब लक्षात घेऊन शेतकरी बोरकर यांनी टो येथे रेशीम किटकाचे संगोपन केंद्र अर्थात रेशीम चौकी सुरू केली. त्यांना केंद्रीय रेशीम मंडळ, बंगलोर यांच्याकडून रेशीम चौकी चालविण्याची मान्यता प्रदान करण्यात आली, त्यामुळे वाशिम जिल्ह्यात रेशीम व्यवसाय करणाºया शेतकºयांना फार सोयीचे झाले. यामुळे शेतकºयांना दोन अवस्थैतील किटक चौकी केंद्रावर तयार करुन मिळतील व पुढे १५ ते २० दिवस रेशीम किटक ांचे संगोपन करताना रेशीम कोशाचे पिक कमी कालावधीत काढणे शक्य होणार आहे. या रेशीम चौकीमुळे रेशीम शेती करणे अत्यंत सोपे होणार आहे. आतापर्यंत रेशीम शेतीसाठी लागणारे तंत्रज्ञान, अंडीपुंज व प्रशिक्षणाची जवळपास कुठेच सुविधा उपलब्ध नव्हती. आता मात्र ती उपलब्ध झाल्याने शेतकºयांमधून समाधान व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी