शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

वाशिम जिल्ह्यातील पहिली रेशीम चौकी कार्यान्वित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 14:47 IST

माधव भिवाजी बोरकर या शेतकऱ्याने जिल्ह्यातील पहिली रेशीम चौकी (रेशीम किटक संगोपन केंद्र) कार्यान्वित केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील काही भागात थोड्याफार प्रमाणात रेशीम शेती केली जायची. त्यासाठी लागणारे अंडीपुंज आंध्रप्रदेशातून आणावे लागायचे. ही बाब लक्षात घेऊन टो या गावातील माधव भिवाजी बोरकर या शेतकऱ्याने जिल्ह्यातील पहिली रेशीम चौकी (रेशीम किटक संगोपन केंद्र) कार्यान्वित केली. त्यास केंद्रीय रेशीम मंडळ, बंगलोर यांच्याकडून रितसर मान्यता मिळाली आहे. यामुळे रेशीम शेती करू इच्छित शेतकऱ्यांना अंडीपुंज तत्काळ उपलब्ध होणार असून वेळ पैशाचा अपव्यय टळणार आहे. सोबतच रेशीम उद्योगासही जिल्ह्यात चालना मिळणार आहे.टो येथील माधव बोरकर या युवा शेतकºयाने गत १० वर्षांपासून रेशीम शेतीकडे लक्ष केंद्रीत केले. त्याबाबतचे प्रशिक्षणही त्यांनी ९० दिवस हैद्राबाद येथे राहून पूर्ण केले. दरम्यान, रेशीम शेती करणाºया शेतकºयांना अंडीपुंज आणण्याकरिता आंध्रप्रदेशात जावे लागते. यात त्यांचा फार मोठा वेळ जाण्यासोबतच पैसे देखील खर्च होतात. ही बाब लक्षात घेऊन शेतकरी बोरकर यांनी टो येथे रेशीम किटकाचे संगोपन केंद्र अर्थात रेशीम चौकी सुरू केली. त्यांना केंद्रीय रेशीम मंडळ, बंगलोर यांच्याकडून रेशीम चौकी चालविण्याची मान्यता प्रदान करण्यात आली, त्यामुळे वाशिम जिल्ह्यात रेशीम व्यवसाय करणाºया शेतकºयांना फार सोयीचे झाले. यामुळे शेतकºयांना दोन अवस्थैतील किटक चौकी केंद्रावर तयार करुन मिळतील व पुढे १५ ते २० दिवस रेशीम किटक ांचे संगोपन करताना रेशीम कोशाचे पिक कमी कालावधीत काढणे शक्य होणार आहे. या रेशीम चौकीमुळे रेशीम शेती करणे अत्यंत सोपे होणार आहे. आतापर्यंत रेशीम शेतीसाठी लागणारे तंत्रज्ञान, अंडीपुंज व प्रशिक्षणाची जवळपास कुठेच सुविधा उपलब्ध नव्हती. आता मात्र ती उपलब्ध झाल्याने शेतकºयांमधून समाधान व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी