शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

दहावीच्या निकालात अमरावती विभागात वाशिम जिल्हा प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 15:21 IST

वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत अमरावती विभागात वाशिम जिल्हा प्रथम स्थानी आहे.

ठळक मुद्दे वाशिम जिल्ह्याचा निकाल ८९.५० टक्के असून, गतवर्षी ८७.३७ टक्क्यासह अमरावती विभागात वाशिम जिल्हा दुसºया स्थानी होता. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८७.८२ तर मुलींची टक्केवारी ९१.७१आहे. सर्वात जास्त निकाल रिसोड तालुक्याचा ९२.८६ टक्के तर सर्वात कमी निकाल मालेगाव तालुक्याचा ८५.४५ टक्के लागला आहे.

वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत अमरावती विभागात वाशिम जिल्हा प्रथम स्थानी आहे. वाशिम जिल्ह्याचा निकाल ८९.५० टक्के असून, गतवर्षी ८७.३७ टक्क्यासह अमरावती विभागात वाशिम जिल्हा दुसºया स्थानी होता. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून, मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८७.८२ तर मुलींची टक्केवारी ९१.७१आहे. 

जिल्ह्यात यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी २० हजार ५२१ विद्यार्थ्यांची नावनोंदणी झाली होती. यापैकी २० हजार ४१२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये ११ हजार ६१३ मुले व ८ हजार ७९९ मुलींचा समावेश आहे. यापैकी १८ हजार २६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यामध्ये १० हजार १९९ मुले व ८ हजार ७० मुलींचा समावेश आहे.  मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८७.८२ तर मुलींची टक्केवारी ९१.७१ आहे.

जिल्ह्यात सर्वात जास्त निकाल रिसोड तालुक्याचा ९२.८६ टक्के तर सर्वात कमी निकाल मालेगाव तालुक्याचा ८५.४५ टक्के लागला आहे. वाशिम तालुक्यातील ६४ शाळांमधून ४९६० विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. यापैकी ४९२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ४३७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ८८.७५ अशी आहे. मालेगाव तालुक्यातील ३४ शाळांमधून २६०८ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यापैकी २५९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी २२२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ८५.४५ अशी आहे. रिसोड तालुक्यातील ५७ शाळांमधून ४५३२ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यापैकी ४४९३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ४१७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ९२.८६ अशी आहे. कारंजा तालुक्यातील ५९ शाळांमधून ३४३४ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यापैकी ३४२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ३०२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ८८.२६ अशी आहे. मंगरूळपीर तालुक्यातील ४३ शाळांमधून २७७२ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यापैकी २७६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी २५२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ९१.४० अशी आहे. मानोरा तालुक्यातील ४० शाळांमधून २२१५ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यापैकी २२०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी १९५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ८८.६६ अशी आहे. 

जिल्ह्यातील ४९२४ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत आहेत. प्रथम श्रेणीत ७४९५ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत ५१२१ विद्यार्थी तर उत्तीर्ण श्रेणीत ७२९ विद्यार्थी आहेत.

 

पुनर्परिक्षार्थींचा निकाल ५१.७५ टक्के

वाशिम जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेतील पुनर्परिक्षार्थींचा निकाल ५१.७५ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील १२०६ विद्यार्थ्यांनी पुनर्परिक्षार्थी म्हणून नोंदणी केली होती. यापैकी १२०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी ६२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ही टक्केवारी ५१.७५ अशी आहे.

टॅग्स :washimवाशिमSSC Results 2018दहावी निकाल २०१८