शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

दहावीच्या निकालात अमरावती विभागात वाशिम जिल्हा प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 15:21 IST

वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत अमरावती विभागात वाशिम जिल्हा प्रथम स्थानी आहे.

ठळक मुद्दे वाशिम जिल्ह्याचा निकाल ८९.५० टक्के असून, गतवर्षी ८७.३७ टक्क्यासह अमरावती विभागात वाशिम जिल्हा दुसºया स्थानी होता. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८७.८२ तर मुलींची टक्केवारी ९१.७१आहे. सर्वात जास्त निकाल रिसोड तालुक्याचा ९२.८६ टक्के तर सर्वात कमी निकाल मालेगाव तालुक्याचा ८५.४५ टक्के लागला आहे.

वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत अमरावती विभागात वाशिम जिल्हा प्रथम स्थानी आहे. वाशिम जिल्ह्याचा निकाल ८९.५० टक्के असून, गतवर्षी ८७.३७ टक्क्यासह अमरावती विभागात वाशिम जिल्हा दुसºया स्थानी होता. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून, मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८७.८२ तर मुलींची टक्केवारी ९१.७१आहे. 

जिल्ह्यात यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी २० हजार ५२१ विद्यार्थ्यांची नावनोंदणी झाली होती. यापैकी २० हजार ४१२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये ११ हजार ६१३ मुले व ८ हजार ७९९ मुलींचा समावेश आहे. यापैकी १८ हजार २६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यामध्ये १० हजार १९९ मुले व ८ हजार ७० मुलींचा समावेश आहे.  मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८७.८२ तर मुलींची टक्केवारी ९१.७१ आहे.

जिल्ह्यात सर्वात जास्त निकाल रिसोड तालुक्याचा ९२.८६ टक्के तर सर्वात कमी निकाल मालेगाव तालुक्याचा ८५.४५ टक्के लागला आहे. वाशिम तालुक्यातील ६४ शाळांमधून ४९६० विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. यापैकी ४९२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ४३७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ८८.७५ अशी आहे. मालेगाव तालुक्यातील ३४ शाळांमधून २६०८ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यापैकी २५९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी २२२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ८५.४५ अशी आहे. रिसोड तालुक्यातील ५७ शाळांमधून ४५३२ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यापैकी ४४९३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ४१७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ९२.८६ अशी आहे. कारंजा तालुक्यातील ५९ शाळांमधून ३४३४ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यापैकी ३४२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ३०२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ८८.२६ अशी आहे. मंगरूळपीर तालुक्यातील ४३ शाळांमधून २७७२ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यापैकी २७६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी २५२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ९१.४० अशी आहे. मानोरा तालुक्यातील ४० शाळांमधून २२१५ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यापैकी २२०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी १९५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ८८.६६ अशी आहे. 

जिल्ह्यातील ४९२४ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत आहेत. प्रथम श्रेणीत ७४९५ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत ५१२१ विद्यार्थी तर उत्तीर्ण श्रेणीत ७२९ विद्यार्थी आहेत.

 

पुनर्परिक्षार्थींचा निकाल ५१.७५ टक्के

वाशिम जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेतील पुनर्परिक्षार्थींचा निकाल ५१.७५ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील १२०६ विद्यार्थ्यांनी पुनर्परिक्षार्थी म्हणून नोंदणी केली होती. यापैकी १२०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी ६२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ही टक्केवारी ५१.७५ अशी आहे.

टॅग्स :washimवाशिमSSC Results 2018दहावी निकाल २०१८