शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

राजुरा येथील गोडाऊनला आग; २० लाखांचे साहित्य जळून खाक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 18:12 IST

राजूरा (वाशिम) : येथील साई एजन्सीच्या गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत जवळपास २० लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा माल जळून खाक झाल्याची घटना ११ जानेवारी रोजी सकाळी १० वाजतादरम्यान घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूरा (वाशिम) : येथील साई एजन्सीच्या गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत जवळपास २० लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा माल जळून खाक झाल्याची घटना ११ जानेवारी रोजी सकाळी १० वाजतादरम्यान घडली. यामध्ये समर्थ महिला बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाचाही समावेश आहे. राजुरा ते खैरखेडा मार्गावरील अनसिंग फाटयावर अमित शिवाजीराव घुगे यांच्या मालकीचे साई एजन्सीच्या माल साठविण्याचे गोडाऊन आहे. घुगे यांच्याकडे नामांकित कंपनीबरोबरच गावातीलच समर्थ महिला बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री करण्यासाठीची एजन्सी आहे. या एजन्सीच्या माध्यमातून उत्पादित कंपन्याचे बर्फी, गुलाब जामून, चॉकलेट, चिवडा, बिस्कीट, लोणचे, मॅगी, नुडल्स, ब्रेड, केक यासह इतरही उत्पादने वाशिम, अकोला जिल्हयातील शहरे व गावात दररोज वितरीत केल्या जातात. विविध प्रकारचा हा माल तसेच कापूस व शेतीपयोगी साहित्यही गोडावूनमध्ये ठेवले होते. ११ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता दरम्यान गोडावूनमधून वितरणासाठीची गाडी भरून देवून अमित घुगे घरी गेले असता, १० वाजतादरम्यान त्यांचे गोडाऊनला अचानक आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळाकडे धाव घेतली. या आगीत गोडावूनमधील संपूर्ण माल जळून खाक झाल्याचे दिसून आले. सदर गोडावून हे गावापासून थोडे अंतरावर शेतात असून त्या ठिकाणी आग विझविण्यासाठी उपाययोजना नसल्याने वाशिम येथील अग्निशामक दल यासह महसूल व पोलिस प्रशासनाला तात्काळ कळविण्यात आले. मात्र अग्निशामक दलाची गाडी पोहचविण्यापुर्वीच गोडावूनमधील माल पुर्णत: जळून खाक झाला होता. घुगे यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.यामध्ये अमित घुगे यांचे जवळपास २० लाख २७ हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अहवाल तलाठी नागेशराव घुगे यांनी वरिष्ठांकडे सादर केला आहे. घटनास्थळावर तलाठी नागेशराव घुगे, पोलिस पाटील डॉ.धनंजय राजुरकर, बिट जमादार उत्तम राठोड, पोलिस कर्मचारी पाटील यांचेसह ग्रामस्थांनी धाव घेत मदत कार्यात सहभाग घेतला. 

समर्थ बचत गटही आर्थिक संकटात राजूरा येथे कार्यरत समर्थ महिला बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेला माल हा साठवणुकीसाठी घुगे यांच्या गोडावूनमध्ये ठेवत असत. या आगीत त्यांचाही बराचसा माल जळून खाक झाल्याने बचत गटाच्या महिलांवर आर्थिक संकट ओढवले आहे. यापुढे कच्चा मालाच्या खरेदीसासाठी आर्थिक संकट ओढावल्याने महिला हतबल  झाल्याचे दिसून येते. रोजगारावरच पाणी फिरल्याने संसाराचा गाडा हाकण्यासाठी महिलांना कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :washimवाशिमfireआग