शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा येथील गोडाऊनला आग; २० लाखांचे साहित्य जळून खाक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 18:12 IST

राजूरा (वाशिम) : येथील साई एजन्सीच्या गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत जवळपास २० लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा माल जळून खाक झाल्याची घटना ११ जानेवारी रोजी सकाळी १० वाजतादरम्यान घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूरा (वाशिम) : येथील साई एजन्सीच्या गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत जवळपास २० लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा माल जळून खाक झाल्याची घटना ११ जानेवारी रोजी सकाळी १० वाजतादरम्यान घडली. यामध्ये समर्थ महिला बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाचाही समावेश आहे. राजुरा ते खैरखेडा मार्गावरील अनसिंग फाटयावर अमित शिवाजीराव घुगे यांच्या मालकीचे साई एजन्सीच्या माल साठविण्याचे गोडाऊन आहे. घुगे यांच्याकडे नामांकित कंपनीबरोबरच गावातीलच समर्थ महिला बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री करण्यासाठीची एजन्सी आहे. या एजन्सीच्या माध्यमातून उत्पादित कंपन्याचे बर्फी, गुलाब जामून, चॉकलेट, चिवडा, बिस्कीट, लोणचे, मॅगी, नुडल्स, ब्रेड, केक यासह इतरही उत्पादने वाशिम, अकोला जिल्हयातील शहरे व गावात दररोज वितरीत केल्या जातात. विविध प्रकारचा हा माल तसेच कापूस व शेतीपयोगी साहित्यही गोडावूनमध्ये ठेवले होते. ११ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता दरम्यान गोडावूनमधून वितरणासाठीची गाडी भरून देवून अमित घुगे घरी गेले असता, १० वाजतादरम्यान त्यांचे गोडाऊनला अचानक आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळाकडे धाव घेतली. या आगीत गोडावूनमधील संपूर्ण माल जळून खाक झाल्याचे दिसून आले. सदर गोडावून हे गावापासून थोडे अंतरावर शेतात असून त्या ठिकाणी आग विझविण्यासाठी उपाययोजना नसल्याने वाशिम येथील अग्निशामक दल यासह महसूल व पोलिस प्रशासनाला तात्काळ कळविण्यात आले. मात्र अग्निशामक दलाची गाडी पोहचविण्यापुर्वीच गोडावूनमधील माल पुर्णत: जळून खाक झाला होता. घुगे यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.यामध्ये अमित घुगे यांचे जवळपास २० लाख २७ हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अहवाल तलाठी नागेशराव घुगे यांनी वरिष्ठांकडे सादर केला आहे. घटनास्थळावर तलाठी नागेशराव घुगे, पोलिस पाटील डॉ.धनंजय राजुरकर, बिट जमादार उत्तम राठोड, पोलिस कर्मचारी पाटील यांचेसह ग्रामस्थांनी धाव घेत मदत कार्यात सहभाग घेतला. 

समर्थ बचत गटही आर्थिक संकटात राजूरा येथे कार्यरत समर्थ महिला बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेला माल हा साठवणुकीसाठी घुगे यांच्या गोडावूनमध्ये ठेवत असत. या आगीत त्यांचाही बराचसा माल जळून खाक झाल्याने बचत गटाच्या महिलांवर आर्थिक संकट ओढवले आहे. यापुढे कच्चा मालाच्या खरेदीसासाठी आर्थिक संकट ओढावल्याने महिला हतबल  झाल्याचे दिसून येते. रोजगारावरच पाणी फिरल्याने संसाराचा गाडा हाकण्यासाठी महिलांना कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :washimवाशिमfireआग