शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
2
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
3
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टेमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
4
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
5
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
6
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
7
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
8
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
9
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
10
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
12
यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
13
YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?
14
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार
15
'या'साठी रशियासोबत भागीदारी करण्याच्या तयारीत भारत, चीनला झटका देणार; अवलंबित्व कमी करणार
16
सणासुदीच्या दिवसांत दोन अपघात; नंदुरबारमध्ये सात भाविकांचा बळी, समृद्धीवर म्यानमारच्या नागरिकांचा अपघाती अंत
17
"मोठे नेते गैरसमजातून बोलले, पण इतकी वर्षे..."; भुजबळांच्या शाब्दिक हल्ल्यानंतर विखे-पाटलांचे स्पष्टीकरण
18
केवळ ५ वर्षांत ३५ लाख रुपयांचा फंड; पैशांचा पाऊस पाडणारी ही पोस्टाची स्कीम कोणती? जाणून घ्या
19
Radhika Yadav Case: "आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली
20
कुंडली न जुळवता लग्न केलं तर होऊ शकते हत्या; बनारस हिंदू विद्यापीठाचे धक्कादायक संशोधन, काय म्हटलंय?

अन् रामगाव बसफेरी धावू लागली नियमित ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 17:54 IST

बस येते किंवा नाही, याचा अंदाज लागत नसल्याने सायखेडा येथील विद्यार्थिनींना ३ कि.मी. प्रवास पायदळ करावा लागत होता.

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा (वाशिम) : मंगरूळपीर आगाराची रामगाव बसफेरी अनियमित व वेळेवर येत नसल्याने विद्यार्थिनींच्या शिक्षणावर परिणाम होत असे. यामुळे विद्यार्थीनी व पालकांनी आक्रमक पवित्रा घेत २७ सप्टेंबर रोजी थेट मंगरुळपीरच्या आगारात धडक देत आगारप्रमुखांना निवेदन सादर करून बस वेळेवर सोडण्याची मागणी केली होती, तसेच लोकमतनेही २८ सप्टेंबरच अकांत  ‘बसफेरी अनियमीत; आक्रमक विद्यार्थींनीची आगारात धडक’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून आगार प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन ही बसफेरी आता नियमित सुरू करण्यात आली आहे.  मंगरूळपीर आगाराची मंगरुळपीर-रामगाव ही अनेक गावातील प्रवाशासाठी एकमेव बस आहे. मानोली व मंगरूळपीर येथे शिक्षण घेण्याकरीता ६० मुली आणि १० मुले दररोज याच बसने प्रवास करतात; परंतु ही बस कधीकधी सायंकाळी उशिरा येत असल्याने मुलींना रात्रीचा प्रवास करावा लागत होता. त्यातच बस येते किंवा नाही, याचा अंदाज लागत नसल्याने सायखेडा येथील विद्यार्थिनींना ३ कि.मी. प्रवास पायदळ करावा लागत होता; परंतु मानोली ते रामगाव हे अंतर ६ किलोमीटर असल्याने त्या मुलींना पायदळ प्रवास शक्य होत नव्हता. त्यातच रात्रीचा वेळ पाहून खाजगी वाहनधारक मनमानी प्रवासभाडे आकारतात. त्यामुळे मुली घरी येईपर्यंत पालक चिंताग्रस्त राहत होते. या समस्येमुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थीनी आणि पालकांनी आक्रमक पवित्रा घेत २७ सप्टेंबर रोजी थेट मंंगरुळपीरच्या आगारात धडक दिली. यावेळी ५० विद्यार्थीनींनी बस वेळेवर सोडण्यासाठी आगारप्रमुखांना निवेदनही   दिले. बसफेरीच्या नियमिततेमुळे विद्यार्थीनींना सायंकाळच्या वेळी सहन करावा लागत असलेला त्रास, ही गंभीर बाब असतानाही आगार प्रशासन दखल घेत नसल्याने लोकमतने २८ सप्टेंबरच्या अंकात ‘बसफेरी अनियमीत; आक्रमक विद्यार्थींनीची आगारात धडक’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून आगार प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन ही बसफेरी आता नियमित सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या बसने प्रवास करणाºया विद्यार्थीनींना मोठा दिलासा मिळाला असून, पालकवर्गातही समाधानाचे वातावरण आहे.  (वार्ताहर) 

ग्रामीण भागातील विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होवू नये.यासाठी आम्ही खूप काळजी घेतो. मात्र जिल्ह्यात रस्त्यांची कामे सुरू असल्याने कधी कधी आमचाही नाईलाज होतो. रामगाव बसफेरी नियमित ठेवण्याचा प्रयत्न करू.       -जी. बी. झळके सहाय्यक वाहतूक निरीक्षक मंगरूळपीर आगार  

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी