शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

पीक नुकसानाचे अंतीम अहवाल अद्याप अप्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 14:52 IST

पीक नुकसानाचे अंतीम अहवालच प्राप्त झाले नसल्याने हे अहवाल शासनापर्यंत कधी पोहचणार आणि शेतकºयांना मदत कधी मंजूर होणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

- सुनील काकडेवाशिम : १५ ते १७ आॅगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील मानोरा आणि कारंजा या दोन तालुक्यातील खरीप पिकांना जबर फटका बसला. त्यामुळे हजारो शेतकरी बाधीत झाले असून त्यांना शासनाकडून अर्थसहाय्य मिळणे आवश्यक ठरत आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्हा प्रशासनाने बाळगलेली कमालीची उदासिनता आणि तहसील स्तरावरून अद्याप (११ सप्टेंबर) पीक नुकसानाचे अंतीम अहवालच प्राप्त झाले नसल्याने हे अहवाल शासनापर्यंत कधी पोहचणार आणि शेतकºयांना मदत कधी मंजूर होणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गतवर्षी पावसातील अनियमिततेमुळे खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामापासून शेतकºयांना विशेष उत्पन्न घेता आले नाही. यावर्षी पर्जन्यमान चांगले असल्याने पीकपरिस्थिती बºयापैकी आहे; परंतु आॅगस्ट महिन्यातील १५ ते १७ तारखेदरम्यान कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येवून हजारो हेक्टरवरील पीके नेस्तनाबूत झाली. अनेकांच्या शेतजमिनी पूर्णत: खरडून गेल्या. यादरम्यान महसूल प्रशासनाने प्राथमिक स्वरूपात केलेल्या सर्वेक्षणातून सुमारे १४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला होता. मात्र, जोपर्यंत अंतीम अहवाल तयार होवून जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे पाठविले जात नाहीत, तोपर्यंत नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत देखील मंजूर होणार नाही. असे असताना कारंजा व मानोरा तहसील स्तरावरून पीक नुकसानाचे अंतीम अहवाल पाठविण्यासंदर्भात प्रचंड दिरंगाई केली जात आहे. जिल्हा प्रशासनाकडूनही हवा तसा पाठपुरावा नसल्याने हा प्रश्न लालफितशाहीत अडकला असून शेतकºयांमधून याप्रती तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.जिल्हाधिकाºयांना नुकसानाची कल्पनाच नाही!वाशिमचे विद्यमान जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना यासंदर्भात छेडले असता, त्यांच्या बोलण्यातून आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानाची त्यांना पुरेशी कल्पनाच नसल्याचे जाणवून आले. यासंदर्भात त्यांनी निवासी उपजिल्हाधिकाºयांकडे अंगुलीनिर्देश करून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकºयांप्रती जिल्हा प्रशासनही किती जागरूक आहे, याचा प्रत्यय आला.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती