शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पीक नुकसानाचे अंतीम अहवाल अद्याप अप्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 14:52 IST

पीक नुकसानाचे अंतीम अहवालच प्राप्त झाले नसल्याने हे अहवाल शासनापर्यंत कधी पोहचणार आणि शेतकºयांना मदत कधी मंजूर होणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

- सुनील काकडेवाशिम : १५ ते १७ आॅगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील मानोरा आणि कारंजा या दोन तालुक्यातील खरीप पिकांना जबर फटका बसला. त्यामुळे हजारो शेतकरी बाधीत झाले असून त्यांना शासनाकडून अर्थसहाय्य मिळणे आवश्यक ठरत आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्हा प्रशासनाने बाळगलेली कमालीची उदासिनता आणि तहसील स्तरावरून अद्याप (११ सप्टेंबर) पीक नुकसानाचे अंतीम अहवालच प्राप्त झाले नसल्याने हे अहवाल शासनापर्यंत कधी पोहचणार आणि शेतकºयांना मदत कधी मंजूर होणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गतवर्षी पावसातील अनियमिततेमुळे खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामापासून शेतकºयांना विशेष उत्पन्न घेता आले नाही. यावर्षी पर्जन्यमान चांगले असल्याने पीकपरिस्थिती बºयापैकी आहे; परंतु आॅगस्ट महिन्यातील १५ ते १७ तारखेदरम्यान कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येवून हजारो हेक्टरवरील पीके नेस्तनाबूत झाली. अनेकांच्या शेतजमिनी पूर्णत: खरडून गेल्या. यादरम्यान महसूल प्रशासनाने प्राथमिक स्वरूपात केलेल्या सर्वेक्षणातून सुमारे १४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला होता. मात्र, जोपर्यंत अंतीम अहवाल तयार होवून जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे पाठविले जात नाहीत, तोपर्यंत नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत देखील मंजूर होणार नाही. असे असताना कारंजा व मानोरा तहसील स्तरावरून पीक नुकसानाचे अंतीम अहवाल पाठविण्यासंदर्भात प्रचंड दिरंगाई केली जात आहे. जिल्हा प्रशासनाकडूनही हवा तसा पाठपुरावा नसल्याने हा प्रश्न लालफितशाहीत अडकला असून शेतकºयांमधून याप्रती तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.जिल्हाधिकाºयांना नुकसानाची कल्पनाच नाही!वाशिमचे विद्यमान जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना यासंदर्भात छेडले असता, त्यांच्या बोलण्यातून आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानाची त्यांना पुरेशी कल्पनाच नसल्याचे जाणवून आले. यासंदर्भात त्यांनी निवासी उपजिल्हाधिकाºयांकडे अंगुलीनिर्देश करून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकºयांप्रती जिल्हा प्रशासनही किती जागरूक आहे, याचा प्रत्यय आला.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती