शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

पाण्याच्या मागणीवरून महिला आक्रमक;  व्यक्त केला रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 18:14 IST

संतापलेल्या  महिलांनी बुधवार, १५ मे रोजी चक्क भांड्यांची आदळआपट करून प्रशासकीय धोरणांविरूद्ध घोषणाबाजी करून रोष व्यक्त केला. 

मालेगाव (वाशिम) : तालुक्यातील अन्य गावांप्रमाणेच देवठाणा खांब येथेही यंदा मार्च महिन्याच्या सुरूवातीपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टँकरने पाणी पुरविण्याची मागणी असताना प्रशासनाने त्याकडे कानाडोळा केला. त्यामुळे अखेर संतापलेल्या  महिलांनी बुधवार, १५ मे रोजी चक्क भांड्यांची आदळआपट करून प्रशासकीय धोरणांविरूद्ध घोषणाबाजी करून रोष व्यक्त केला. घनदाट जंगलाने वेढलेल्या देवठाणा खांब या गावात दरवर्षीच्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे शासकीय टँकरने पाणीपुरवठा करावा लागला नाही, असे एकही वर्ष आतापर्यंत गेले नाही. उन्हाळ्याच्या दिवसात मानसांनाच प्यायला पाणी मिळत नाही, तिथे गुराढोरांचा काय टिकाव लागणार. यामुळे जानेवारी, फेब्रूवारी महिन्यातच गावातील पुरूष मंडळी आपापली दुधाळ जनावरे पाण्याची सोय असलेल्या इतर गावांमधील नातेवाईकांकडे सोडून येतात. तशीच विदारक स्थिती यंदाही उद्भवली आहे. गावाच्या चारही बाजूला घनदाट जंगल असून वन्यप्राण्यांचा सदोदित वावर असतो; मात्र अशाही बिकट स्थितीत डोईवर हंडा घेवून गावातील महिलांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील टंचाईग्रस्त १६ गावांमध्ये आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू केला आहे; परंतु देवठाणा खांब येथे मागणी होवूनही अद्यापपर्यंत टँकर पोहचलेले नाही. यामुळे विशेषत: महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून टँकरच्या पाण्यासाठी तांड्यातील महिलांनी बुधवारी रस्त्यावर उतरून भांड्यांची आदळआपट करित आपला रोष व्यक्त केला.या आंदोलनात कांताबाई नारायण चव्हाण, शांताबाई फुलसिंग राठोड, गीता मोहन राठोड, बेबीबाई मांगीलाल जाधव, प्रयागबाई वामन तिवाले, मंदा नारायण हांडे, यमुना सिताराम राठोड, सुवर्णमाला गिरधर चव्हाण, वनिता सुखदेव राठोड, इंदू गोविंदा राठोड, सुशीला बबन राठोड, शितल दिनकर राठोड, सुमन आकाराम चव्हाण, अनुसया चव्हाण यांच्यासह इतर महिलांनी सहभाग घेतला.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई