शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहीर दुरूस्तीसाठी उपोषणाचा इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 15:38 IST

बांबर्डा कानकिरड (वाशिम) : कारंजा तालुक्यात २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कारंजा तालुक्यातील बांबर्डा कानकिरड येथील शेतकºयांच्या सिंचन विहीरी पूर्णपणे खचल्याने त्यांना सिंचन करणे कठिण झाले आहे

लोकमत न्यूज नेटवर्क बांबर्डा कानकिरड (वाशिम) : कारंजा तालुक्यात २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कारंजा तालुक्यातील बांबर्डा कानकिरड येथील शेतकºयांच्या सिंचन विहीरी पूर्णपणे खचल्याने त्यांना सिंचन करणे कठिण झाले आहे. या संदर्भात संबंधित शेतकºयांनी कांरजा तहसीलदारांना निवेदन देऊनही दोन वर्षांंपासून सदर सिंचन विहीर दुरूस्तीसाठी आर्थिक मदत केल्या गेली नसल्याने शेतकºयांतून तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे. बांबर्डा येथील शेतकरी विनायक लक्ष्मण वानखडे व भास्कर शालिकराम कानकिरड यांची बांबर्डा शेतशिवारात सर्व्हे नं. ५/३ व सर्व्हे नं. ४५ मध्ये शेती असून त्यामध्ये सदर शेतकºयांच्या सिंचन विहिरी आहेत. तालुक्यात २०१६ च्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे सिंचन विहीरी खचल्याने विहीरी संपूर्णपणे गाळल्या आहेत. त्यामुळे संबंधित शेतकºयांना सिंचन करणे कठिण झाले आहे. शासनाने अतिवृष्टीमुळे खचलेल्या सिंचन विहीरीची दुरूस्ती महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेतून करून देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संबंधित शेतकºयांनी सिंचन विहीर दुरूस्तीसाठी दोन वेळा कारंजा तहसीलदारांना निवेदन सादर केले होते. त्यानंतर खचलेल्या विहीरींचा संबंधित तलाठ्यांकडून पंचनामाही करण्यात आला; परंतु दोन वर्ष उलटले तरी, विहीरीची दुरूस्ती करण्यात आली नाही. एकीकडे शासन स्तरावरून शेतकºयांचे उत्पन्न करण्यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न केल्या जात आहेत, दुसरीकडे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सिंचन विहीर दुरूस्तीसाठी शेतकºयांना वारंवार प्रशासनदरबारी येरझारा घालाव्या लागत आहेत. त्यामुळे शेतकरी व्यथीत झाले असून, या विहिरींची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित शेतकºयांनी पुन्हा ११ जानेवारीला तहसीलदारांकडे निवेदन सादर केले आहे. महिनाभरात विहिरींची दुरुस्ती न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन