शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहीर दुरूस्तीसाठी उपोषणाचा इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 15:38 IST

बांबर्डा कानकिरड (वाशिम) : कारंजा तालुक्यात २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कारंजा तालुक्यातील बांबर्डा कानकिरड येथील शेतकºयांच्या सिंचन विहीरी पूर्णपणे खचल्याने त्यांना सिंचन करणे कठिण झाले आहे

लोकमत न्यूज नेटवर्क बांबर्डा कानकिरड (वाशिम) : कारंजा तालुक्यात २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कारंजा तालुक्यातील बांबर्डा कानकिरड येथील शेतकºयांच्या सिंचन विहीरी पूर्णपणे खचल्याने त्यांना सिंचन करणे कठिण झाले आहे. या संदर्भात संबंधित शेतकºयांनी कांरजा तहसीलदारांना निवेदन देऊनही दोन वर्षांंपासून सदर सिंचन विहीर दुरूस्तीसाठी आर्थिक मदत केल्या गेली नसल्याने शेतकºयांतून तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे. बांबर्डा येथील शेतकरी विनायक लक्ष्मण वानखडे व भास्कर शालिकराम कानकिरड यांची बांबर्डा शेतशिवारात सर्व्हे नं. ५/३ व सर्व्हे नं. ४५ मध्ये शेती असून त्यामध्ये सदर शेतकºयांच्या सिंचन विहिरी आहेत. तालुक्यात २०१६ च्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे सिंचन विहीरी खचल्याने विहीरी संपूर्णपणे गाळल्या आहेत. त्यामुळे संबंधित शेतकºयांना सिंचन करणे कठिण झाले आहे. शासनाने अतिवृष्टीमुळे खचलेल्या सिंचन विहीरीची दुरूस्ती महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेतून करून देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संबंधित शेतकºयांनी सिंचन विहीर दुरूस्तीसाठी दोन वेळा कारंजा तहसीलदारांना निवेदन सादर केले होते. त्यानंतर खचलेल्या विहीरींचा संबंधित तलाठ्यांकडून पंचनामाही करण्यात आला; परंतु दोन वर्ष उलटले तरी, विहीरीची दुरूस्ती करण्यात आली नाही. एकीकडे शासन स्तरावरून शेतकºयांचे उत्पन्न करण्यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न केल्या जात आहेत, दुसरीकडे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सिंचन विहीर दुरूस्तीसाठी शेतकºयांना वारंवार प्रशासनदरबारी येरझारा घालाव्या लागत आहेत. त्यामुळे शेतकरी व्यथीत झाले असून, या विहिरींची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित शेतकºयांनी पुन्हा ११ जानेवारीला तहसीलदारांकडे निवेदन सादर केले आहे. महिनाभरात विहिरींची दुरुस्ती न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन