शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रेशिम शेतीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 14:47 IST

वाशिम : जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे, या उद्देशाने १७ ते ३० डिसेंबर २०१८ या कालावधीत जिल्ह्यात ‘महारेशीम नोंदणी अभियान २०१९’ राबविण्यात आले. या अंतर्गत जिल्ह्यातील ४८० शेतकऱ्यांनी नोंदणी करीत रेशीम शेती करण्याचा संकल्प केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे, या उद्देशाने १७ ते ३० डिसेंबर २०१८ या कालावधीत जिल्ह्यात ‘महारेशीम नोंदणी अभियान २०१९’ राबविण्यात आले. या अंतर्गत जिल्ह्यातील ४८० शेतकऱ्यांनी नोंदणी करीत रेशीम शेती करण्याचा संकल्प केला.महारेशीम नोंदणी अभियानाचा शुभारंभ वाशिम येथे १७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये या चित्ररथाच्या आधारे रेशीम शेतीविषयी जनजागृती करण्यात आली. या अभियानाला जिल्ह्यातील शेतकºयांचा उदंड प्रतिसाद लाभला आणि ३० डिसेंबरच्या मुदतीपर्यंत जिल्हाभरातील ४८० शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी नोंदणी केली, असे जिल्हा रेशीम विकास अधिकारी अरविंद मोरे यांनी सांगितले. शेतीला रेशीम उद्योगाची जोड देण्याच्या अनुषंगाने हे अभियान राबविण्यात आले. अभियान कालावधीत चित्ररथासोबत जिल्हा रेशीम कार्यालयाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गावोगावी जावून शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना रेशीम शेती करण्याबाबत प्रोत्साहित करतानाच तांत्रिक मार्गदर्शनही केले. त्यामुळेच शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला आणि जिल्ह्याचे उद्दिष्ट ५० एकर असताना ४८० शेतकऱ्यांच्या नोंदणीमुळे ४८० एकर क्षेत्रात अर्थात मुळ उद्दिष्टाच्या जवळपास १० पट क्षेत्रात आता रेशीम शेती होणार आहे.  टो येथे रोपनिर्मिती प्रशिक्षणरेशीम शेतीसाठी तुती लागवडीपूर्वी तुती रोपनिर्मिती करणे आवश्यक आहे. यासाठी नोंदणी करणाºयांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, हे प्रशिक्षण येत्या आठवड्यात वाशिम तालुक्यातील टो येथे घेतले जाणार आहे. रेशीम कार्यालयाच्यावतीने शेतकºयांना रोपनिर्मितीविषयी प्रात्यक्षिकाद्वारे या अंतर्गत मार्गदर्शन करण्यात येईल. त्यानंतर शेतकºयांना प्रत्यक्ष स्वत:च्या शेतात रोपनिर्मिती करावी लागणार असून, ही रोपनिर्मिती १५ जानेवारीपासून करावी लागणार आहे. रोपनिर्मितीनंतर १५ जून ते १५ जुलैदरम्यान तुती रोप लागवड करावी लागणार आहे. या कार्यक्रमासाठी स्वत: रेशिम विकास अधिकारी अरविंद मोरे परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी