शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रेशिम शेतीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 14:47 IST

वाशिम : जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे, या उद्देशाने १७ ते ३० डिसेंबर २०१८ या कालावधीत जिल्ह्यात ‘महारेशीम नोंदणी अभियान २०१९’ राबविण्यात आले. या अंतर्गत जिल्ह्यातील ४८० शेतकऱ्यांनी नोंदणी करीत रेशीम शेती करण्याचा संकल्प केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे, या उद्देशाने १७ ते ३० डिसेंबर २०१८ या कालावधीत जिल्ह्यात ‘महारेशीम नोंदणी अभियान २०१९’ राबविण्यात आले. या अंतर्गत जिल्ह्यातील ४८० शेतकऱ्यांनी नोंदणी करीत रेशीम शेती करण्याचा संकल्प केला.महारेशीम नोंदणी अभियानाचा शुभारंभ वाशिम येथे १७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये या चित्ररथाच्या आधारे रेशीम शेतीविषयी जनजागृती करण्यात आली. या अभियानाला जिल्ह्यातील शेतकºयांचा उदंड प्रतिसाद लाभला आणि ३० डिसेंबरच्या मुदतीपर्यंत जिल्हाभरातील ४८० शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी नोंदणी केली, असे जिल्हा रेशीम विकास अधिकारी अरविंद मोरे यांनी सांगितले. शेतीला रेशीम उद्योगाची जोड देण्याच्या अनुषंगाने हे अभियान राबविण्यात आले. अभियान कालावधीत चित्ररथासोबत जिल्हा रेशीम कार्यालयाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गावोगावी जावून शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना रेशीम शेती करण्याबाबत प्रोत्साहित करतानाच तांत्रिक मार्गदर्शनही केले. त्यामुळेच शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला आणि जिल्ह्याचे उद्दिष्ट ५० एकर असताना ४८० शेतकऱ्यांच्या नोंदणीमुळे ४८० एकर क्षेत्रात अर्थात मुळ उद्दिष्टाच्या जवळपास १० पट क्षेत्रात आता रेशीम शेती होणार आहे.  टो येथे रोपनिर्मिती प्रशिक्षणरेशीम शेतीसाठी तुती लागवडीपूर्वी तुती रोपनिर्मिती करणे आवश्यक आहे. यासाठी नोंदणी करणाºयांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, हे प्रशिक्षण येत्या आठवड्यात वाशिम तालुक्यातील टो येथे घेतले जाणार आहे. रेशीम कार्यालयाच्यावतीने शेतकºयांना रोपनिर्मितीविषयी प्रात्यक्षिकाद्वारे या अंतर्गत मार्गदर्शन करण्यात येईल. त्यानंतर शेतकºयांना प्रत्यक्ष स्वत:च्या शेतात रोपनिर्मिती करावी लागणार असून, ही रोपनिर्मिती १५ जानेवारीपासून करावी लागणार आहे. रोपनिर्मितीनंतर १५ जून ते १५ जुलैदरम्यान तुती रोप लागवड करावी लागणार आहे. या कार्यक्रमासाठी स्वत: रेशिम विकास अधिकारी अरविंद मोरे परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी