शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कपाशीच्या फरदडीवर जोर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 18:07 IST

वाशिम: कपाशीवरील बोंडअळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी हंगामातीत कापसाचा वेचा झाल्यानंतर कपाशी उपटून शेत पाच ते सहा महिने मोकळे ठेवणे आवश्यक आहे; परंतु बहुतांश शेतकरी फरदडीची कपाशीही घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: कपाशीवरील बोंडअळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी हंगामातीत कापसाचा वेचा झाल्यानंतर कपाशी उपटून शेत पाच ते सहा महिने मोकळे ठेवणे आवश्यक आहे; परंतु बहुतांश शेतकरी फरदडीची कपाशीही घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.गत दोन वर्षांपासून राज्यभरात बोंडअळीचा प्रादूर्भाव होत असल्याने कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. डिसेंबर महिन्यानंतर खाद्य उपलब्ध न झाल्यास शेंदरी वा गुलाबी बोंडअळी सुप्तावस्थेत जाते; परंतु फरदडीमुळे तिचा जीवनक्रम चालू राहून पुढील हंगामात येणाºया कपाशीवर तिचा पुन्हा प्रादूर्भाव होतो. यावर नियंत्रणासाठी कृषी विभाग जनजागृती करीत आहे. त्यांच्यावतीने पत्रकांद्वारे बोंडअळी नियंत्रणासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कपाशीचे सुरुवातीचे वेचे आटोपल्यानंतर फरदडीचा विचार न करता कपाशी उपटून शेत मोकळे करणे, शेतात शेळ्या, मेंढ्या चारणे, डिसेंबर महिन्यानंतर ५ ते ६ महिने शेत कापूस विरहित ठेवणे आदि सुचना देण्यात येत आहेत. कपाशीच्या पºहाट्यांतही या किडीच्या सुप्त अवस्था राहत असल्याने पºहाटीची गंजी शेताच्या बांधावर ठेवणे अयोग्य ठरते. त्यामुळे कापूस काढणीनंतर पºहाट्या, व्यवस्थीत न उघडलेली किडग्रस्त बोंडे, पालापाचोळा नष्ट करण्यासह पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरटी करण्याच्या सुचनाही कृषी विभागाकडून देण्यात येत आहेत; परंतु बहुतांश शेतकºयांना या सुचना कळल्याच नाहीत. त्याचे गांभिर्यही शेतकºयांना कळू शकले नाही. अद्यापही जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांनी फरदडीचा कापूस घेण्याच्या विचाराने शेतातील कपाशी उपटलेली नाही. त्यामुळे पुढील वर्षीही कपाशीवर बोंडअळीचा प्रादूर्भाव होण्याची भिती आहे. या पृष्ठभूमीवर कृषी विभागाने गावागावांत मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. जिनिंग, प्रेसिंग मिलमध्येही कामगंध सापळ्यांचा अभावहंगामातील कपाशीचा वेचा झाल्यानंतर जिनिंग, प्रेसिंगमध्ये विक्री केली जाते. शेतकºयांनी विकलेल्या कपाशीपासून रुई, सरकी वेगळी करून कपाशीच्या गाठी तयार केल्या जातात. खरीप हंगाम संपल्यानंतर रब्बी हंगाम संपेपर्यंतही ही कपाशी अनेक महिने जिनिंग, प्रेसिंगमध्ये राहते. त्यामुळे अशा ठिकाणी कामगंध सापळे, प्रकाश सापळे लावण्याच्या सुचना कृषी विभागाने दिल्या आहेत. या सुचनांचीही गांभिर्याने अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीcottonकापूस