शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कपाशीच्या फरदडीवर जोर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 18:07 IST

वाशिम: कपाशीवरील बोंडअळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी हंगामातीत कापसाचा वेचा झाल्यानंतर कपाशी उपटून शेत पाच ते सहा महिने मोकळे ठेवणे आवश्यक आहे; परंतु बहुतांश शेतकरी फरदडीची कपाशीही घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: कपाशीवरील बोंडअळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी हंगामातीत कापसाचा वेचा झाल्यानंतर कपाशी उपटून शेत पाच ते सहा महिने मोकळे ठेवणे आवश्यक आहे; परंतु बहुतांश शेतकरी फरदडीची कपाशीही घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.गत दोन वर्षांपासून राज्यभरात बोंडअळीचा प्रादूर्भाव होत असल्याने कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. डिसेंबर महिन्यानंतर खाद्य उपलब्ध न झाल्यास शेंदरी वा गुलाबी बोंडअळी सुप्तावस्थेत जाते; परंतु फरदडीमुळे तिचा जीवनक्रम चालू राहून पुढील हंगामात येणाºया कपाशीवर तिचा पुन्हा प्रादूर्भाव होतो. यावर नियंत्रणासाठी कृषी विभाग जनजागृती करीत आहे. त्यांच्यावतीने पत्रकांद्वारे बोंडअळी नियंत्रणासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कपाशीचे सुरुवातीचे वेचे आटोपल्यानंतर फरदडीचा विचार न करता कपाशी उपटून शेत मोकळे करणे, शेतात शेळ्या, मेंढ्या चारणे, डिसेंबर महिन्यानंतर ५ ते ६ महिने शेत कापूस विरहित ठेवणे आदि सुचना देण्यात येत आहेत. कपाशीच्या पºहाट्यांतही या किडीच्या सुप्त अवस्था राहत असल्याने पºहाटीची गंजी शेताच्या बांधावर ठेवणे अयोग्य ठरते. त्यामुळे कापूस काढणीनंतर पºहाट्या, व्यवस्थीत न उघडलेली किडग्रस्त बोंडे, पालापाचोळा नष्ट करण्यासह पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरटी करण्याच्या सुचनाही कृषी विभागाकडून देण्यात येत आहेत; परंतु बहुतांश शेतकºयांना या सुचना कळल्याच नाहीत. त्याचे गांभिर्यही शेतकºयांना कळू शकले नाही. अद्यापही जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांनी फरदडीचा कापूस घेण्याच्या विचाराने शेतातील कपाशी उपटलेली नाही. त्यामुळे पुढील वर्षीही कपाशीवर बोंडअळीचा प्रादूर्भाव होण्याची भिती आहे. या पृष्ठभूमीवर कृषी विभागाने गावागावांत मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. जिनिंग, प्रेसिंग मिलमध्येही कामगंध सापळ्यांचा अभावहंगामातील कपाशीचा वेचा झाल्यानंतर जिनिंग, प्रेसिंगमध्ये विक्री केली जाते. शेतकºयांनी विकलेल्या कपाशीपासून रुई, सरकी वेगळी करून कपाशीच्या गाठी तयार केल्या जातात. खरीप हंगाम संपल्यानंतर रब्बी हंगाम संपेपर्यंतही ही कपाशी अनेक महिने जिनिंग, प्रेसिंगमध्ये राहते. त्यामुळे अशा ठिकाणी कामगंध सापळे, प्रकाश सापळे लावण्याच्या सुचना कृषी विभागाने दिल्या आहेत. या सुचनांचीही गांभिर्याने अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीcottonकापूस