शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

उत्पादन खर्चही न निघाल्याने शेतकऱ्याने उपटली डाळींब बाग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 14:34 IST

बागेचे नुकसान पाहता त्यांनी १९ नोव्हेंबर रोजी संपूर्ण बागेतील झाडे जेसीबीने उपटून फेकून दिली.

ठळक मुद्देएकूण ७ लाख ५० हजार रुपये तीन वर्षात खर्च आला. एकूण ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.तब्बल साडेतीन लाख रुपयाचे यामध्ये नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतीत नवनविन प्रयोग यशस्वी करणारे तथा राज्य शासनाचा कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी नंदकिशोर उल्हामाले यांनी आपल्या दोन एकर शेतात डाळींब बाग तयार करुन नविन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. विदर्भात डाळींब बागेसाठी पोषण वातावरण नसून उत्पादन खर्चही निघत नसल्याचे पाहून तसेच नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेले बागेचे नुकसान पाहता त्यांनी १९ नोव्हेंबर रोजी संपूर्ण बागेतील झाडे जेसीबीने उपटून फेकून दिली.मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील प्रयोगशिल कास्तकार नंदकिशोर उल्हामाले हे शेतीत नवनविन प्रयोग करण्यासाठी जिल्हयासह मराठवाडयात प्रसिध्द आहेत. त्यांनी २०१४ मध्ये आपल्या दोन एकराच्या शेतीमध्ये डाळींबाची बाग उभारली. यासाठी त्यांनी सर्वप्रथम तारकंपाऊडसाठी १ लाख ५० हजार, ४० हजार रुपये डाळींबाच्या कलमा,ड्रीपसाठी (ठिंबक सिंचन) ७० हजार रुपये तसेच खड्डे खोदणे व इतर खर्च ३० हजार रुपये असा एकूण ३ लाख ९० हजार रुपये खर्च केले. त्यानंतर या बागेच्या संगोपनासाठी एकरी साठ हजार रुपयाप्रमाणे दोन एकरासाठी ३ लाख साठ हजार रुपये खर्च आला. डाळींबाची बाग उभारण्यासाठी ३ लाख ९० हजार व संगोपनासाठी ३ लाख ६० हजार असे एकूण ७ लाख ५० हजार रुपये तीन वर्षात खर्च आला. या तुलनेत उत्पादन न झाल्याने, बागेसाठी लावण्यात आलेला खर्चही न निघाल्याने व अवकाळी पावसामुळे झाडे सुकल्याने अखेर त्यांनी १९ नोव्हेंबर रोजी जेसीबीव्दारे बाग उपटून टाकली. तत्पूर्वी त्यांनी कृषी विभागाकडे अवकाळी पावसामुळे या बागेचे झालेले नुकसान भरपाईची मागणी केली असता कृषी सहायकाकडून आपल्या बागेला नुकसान भरपाई मिळणार नसल्याचे सांगितल्याने प्रयोगशिल शेतकºयाचे मनोबल खचल्याचे दिसून येत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देवून उल्हामाले यांना नुकसान भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत गावातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.

खर्च साडेसात लाख हाती आले ४ लाख- मोठया अपेक्षेने शेतीत नविन प्रयोग करुन डाळींबाच्या बागेसाठी ७ लाख ५० हजार रुपये खर्च केले. बाग निर्माण झाल्यानंतर त्यामधून पहिल्यांदा ३ लाख, दुसऱ्यांदा ६० हजार तर तिसºयांदा ४० हजार असे एकूण ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. तब्बल साडेतीन लाख रुपयाचे यामध्ये नुकसान झाल्याचे शेतकरी नंदकिशोर उल्हामाले यांनी सांगितले.

- नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे बागेचे नुकसान तर झालेच शिवाय विदर्भात डाळींबासाठी पोषक वातावरणही नसल्याने बाग उपटून टाकण्यात आली. परंतु अवकाळी पाऊस आला नसता तर कदाचित अजून दोनवेळा फळे काढता आली असती असे शेतकºयाचे म्हणणेआहे.कृषी विभाग म्हणतोय नुकसान भरपाई नाही

- मालेगाव तालुकयामघ्ये अवकाळी पावसामुळे कुठेच फळबागांचे नुकसान झाले नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे असल्याने उल्हामाले यांना नुकसान भरपाई मिळणार नाही. अवकाळी पावसामुळे तालुक्यात केवळ सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले असून तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याने या शेतकºयाला नुकसान भरपाईपासून मुकावे लागणार आहे.

- दरम्यान फळबागांवर तेल्यारोग आल्यानेही नुकसान संभवते. ४४ अंशसेल्सियसच्यावर तापमान असल्यास डाळींबाच्या बागेवर परिणाम होतो. विदर्भात तसेच शिरपूर परिसरात ४७ पर्यंत तापमान होते.

गत दोन वर्षात उन्हाळयातील वाढलेले तापमानामुळे आधी तेल्यारोग व नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे झाडे सुकलीत. परंतु कृषी विभागाकडून फळबागांचे नुकसान झाले नसल्याचा अहवाल पाठविण्यात आला असल्याने नुकसान भरपाई मिळणार नाही.विदर्भातील जमिन व हवामान अनुकूल नसल्याने आपण पुन्हा डाळींब उत्पादन घेणार नाही.-नंदकिशोर उल्हामालेनुकसानग्रस्त शेतकरी, शिरपूर जैन

फळबागांवर नेहमीच विविध कीड, रोग पसरतात. पीक नुकसान पाहणीदरम्यान कुठेही फळबागांचे नुकसान झाले नसल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे संबधितांकडे पाठविण्यात आलेल्या अहवालात नमूद नाही. तरी सुध्दा शेतकºयाचे नुकसान झाले असे वाटत असेल तर त्यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा.-गजानन मालसकृषी सहाय्यक, शिरपूर जैन

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीShirpur Jainशिरपूर जैन