शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शासकीय खरेदीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 15:22 IST

शासकीय खरेदी सुरू झालेली नसतानाच जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोयाबीन, मुग, उडिद या शेतमालाचे दर चांगलेच वाढू लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात अवकाळी पावसाने खरीप पिकांचे अति नुकसान झाल्यानंतर बाजारात मात्र शेतमालाचे दर सतत वाढत आहेत. त्यात बहुतांश शेतमालाची खरेदी ही शासनाच्या हमीभावापेक्षा अधिक दराने व्यापारी करीत आहेत. त्यामुळे यंदा शासकीय खरेदी प्रक्रियेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे.जिल्ह्यात यंदा ३ लाख ९७ हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात खरीप पिकांची पेरणी झाली होती. त्यातील तूर आणि कपाशी वगळता सर्वच पिकांची काढणी झाली. तथापि, पावसामुळे सोयाबीनचे काढणी पश्चात नुकसान झाले, तर कपाशीलाही मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यापूर्वी सप्टेंबर महिन्यातही पावसामुळेच मुग आणि उडिद पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना बाजारातही अपेक्षीत दर मिळत नव्हते. या पृष्ठभुमीवर शासकीय खरेदी प्रक्रिया सुरू करण्याची मागणी शेतकरी क रीत होते. या मागणीनुसार जिल्ह्यात शासकीय खरेदीसाठी शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी प्रक्रियाही सुरू झाली. मंगरुळपीर, वाशिम, कारंजा, मानोरा आणि मालेगाव येथे नोंदणी कें द्र सुरू करून शेतकºयांची नोंदणी करण्यास सुरुवात करण्यात आली. तथापि, अद्याप शासकीय खरेदी सुरू झालेली नसतानाच जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोयाबीन, मुग, उडिद या शेतमालाचे दर चांगलेच वाढू लागले आहेत.या तिन्ही शेतमालाची शासनाच्या हमीपेक्षा अधिक दराने व्यापाºयांकडून खरेदी होत आहे. शासनाने सोयाबीनला ३७१० रुपये प्रति क्विंटल हमीभाव घोषीत केला असताना बाजार समित्यांत या शेतमालाची ३७५० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी होत आहे. मुगाला ७०५० रुपये प्रति क्विंटल हमीभाव घोषीत केला असताना या शेतमालास व्यापाºयांकडून ७००० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहेत, तर उडिदाला ५७०० रुपये हमीदर घोषीत केला असताना या शेतमालाची प्रति क्विंटल ८००० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक दराने खरेदी होत आहे. त्यामुळे यंदा शासकीय खरेदी केंद्रावर शेतकरी दिसणार नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)खरेदी प्रक्रियेसाठी शेतकºयांना एसएमएसही नाहीशेतकºयांकडून हमीभावाने शेतमाल खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातील पाच तालुक्यात शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.या पाचही केंद्रांवर मिळून आजवर ६२६ शेतकºयांनी शेतमालाची विक्री करण्यासाठी नोंदणी केली आहे. त्यात सर्वाधिक ४६५ शेतकºयांनी सोयाबीनच्या विक्रीसाठी १३९ शेतकºयांनी उडिदाच्या विक्रीसाठी, तर केवळ २२ शेतकºयांनी मुगाची विक्री करण्यासाठी नोंंदणी केली आहे. शेतकºयांची नोंदणी गत महिनाभरापासून सुरू असल्याने खरेदी प्रक्रियेला सुरुवात होणे अपेक्षीत आहे; परंतु अद्याप पाचपैकी एकाही शासकीय खरेदी केंद्रावर कोणत्याच प्रकारच्या शेतमालाची हमीभावाने खरेदी सुरू झालेली नाही. त्यातच काही ठिकाणी शेतकºयांना शेतमाल आणण्यासाठी एसएमएसही पाठविल्याची माहिती नाही.

शाासनाकडून शासकीय खरेदी प्रक्रीयेची तारीख अद्याप निश्चित झाली नाही. ही तारीख निश्चित झाल्यानंतर शासन निर्देशानुसारच जिल्हयातील प्रत्येक केंद्रावर शेतकºयांनी नोंदणी केलेल्या शेतमालाची खरेदी प्रक्रीया सुरु करण्यात येईल. तथापि, सद्यस्थितीत ही खरेदी कधी सुरु होईल हे आपल्याला निश्चित सांगता येणार नाही-रमेश कटकेजिल्हा उपनिबंधकवाशिम

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी