शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय खरेदीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 15:22 IST

शासकीय खरेदी सुरू झालेली नसतानाच जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोयाबीन, मुग, उडिद या शेतमालाचे दर चांगलेच वाढू लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात अवकाळी पावसाने खरीप पिकांचे अति नुकसान झाल्यानंतर बाजारात मात्र शेतमालाचे दर सतत वाढत आहेत. त्यात बहुतांश शेतमालाची खरेदी ही शासनाच्या हमीभावापेक्षा अधिक दराने व्यापारी करीत आहेत. त्यामुळे यंदा शासकीय खरेदी प्रक्रियेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे.जिल्ह्यात यंदा ३ लाख ९७ हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात खरीप पिकांची पेरणी झाली होती. त्यातील तूर आणि कपाशी वगळता सर्वच पिकांची काढणी झाली. तथापि, पावसामुळे सोयाबीनचे काढणी पश्चात नुकसान झाले, तर कपाशीलाही मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यापूर्वी सप्टेंबर महिन्यातही पावसामुळेच मुग आणि उडिद पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना बाजारातही अपेक्षीत दर मिळत नव्हते. या पृष्ठभुमीवर शासकीय खरेदी प्रक्रिया सुरू करण्याची मागणी शेतकरी क रीत होते. या मागणीनुसार जिल्ह्यात शासकीय खरेदीसाठी शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी प्रक्रियाही सुरू झाली. मंगरुळपीर, वाशिम, कारंजा, मानोरा आणि मालेगाव येथे नोंदणी कें द्र सुरू करून शेतकºयांची नोंदणी करण्यास सुरुवात करण्यात आली. तथापि, अद्याप शासकीय खरेदी सुरू झालेली नसतानाच जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोयाबीन, मुग, उडिद या शेतमालाचे दर चांगलेच वाढू लागले आहेत.या तिन्ही शेतमालाची शासनाच्या हमीपेक्षा अधिक दराने व्यापाºयांकडून खरेदी होत आहे. शासनाने सोयाबीनला ३७१० रुपये प्रति क्विंटल हमीभाव घोषीत केला असताना बाजार समित्यांत या शेतमालाची ३७५० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी होत आहे. मुगाला ७०५० रुपये प्रति क्विंटल हमीभाव घोषीत केला असताना या शेतमालास व्यापाºयांकडून ७००० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहेत, तर उडिदाला ५७०० रुपये हमीदर घोषीत केला असताना या शेतमालाची प्रति क्विंटल ८००० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक दराने खरेदी होत आहे. त्यामुळे यंदा शासकीय खरेदी केंद्रावर शेतकरी दिसणार नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)खरेदी प्रक्रियेसाठी शेतकºयांना एसएमएसही नाहीशेतकºयांकडून हमीभावाने शेतमाल खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातील पाच तालुक्यात शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.या पाचही केंद्रांवर मिळून आजवर ६२६ शेतकºयांनी शेतमालाची विक्री करण्यासाठी नोंदणी केली आहे. त्यात सर्वाधिक ४६५ शेतकºयांनी सोयाबीनच्या विक्रीसाठी १३९ शेतकºयांनी उडिदाच्या विक्रीसाठी, तर केवळ २२ शेतकºयांनी मुगाची विक्री करण्यासाठी नोंंदणी केली आहे. शेतकºयांची नोंदणी गत महिनाभरापासून सुरू असल्याने खरेदी प्रक्रियेला सुरुवात होणे अपेक्षीत आहे; परंतु अद्याप पाचपैकी एकाही शासकीय खरेदी केंद्रावर कोणत्याच प्रकारच्या शेतमालाची हमीभावाने खरेदी सुरू झालेली नाही. त्यातच काही ठिकाणी शेतकºयांना शेतमाल आणण्यासाठी एसएमएसही पाठविल्याची माहिती नाही.

शाासनाकडून शासकीय खरेदी प्रक्रीयेची तारीख अद्याप निश्चित झाली नाही. ही तारीख निश्चित झाल्यानंतर शासन निर्देशानुसारच जिल्हयातील प्रत्येक केंद्रावर शेतकºयांनी नोंदणी केलेल्या शेतमालाची खरेदी प्रक्रीया सुरु करण्यात येईल. तथापि, सद्यस्थितीत ही खरेदी कधी सुरु होईल हे आपल्याला निश्चित सांगता येणार नाही-रमेश कटकेजिल्हा उपनिबंधकवाशिम

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी