शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

मानधन योजनेत नाव नोंदणी मोहिमेस शेतकऱ्यांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 15:24 IST

गावनिहाय विशेष शिबिरास सुरूवात झाली असून पहिल्याच दिवशी शेतकºयांनी नाव नोंदणी करण्याकरिता सामायिक सुविधा केंद्रांवर तोबा गर्दी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : केंद्र्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावी मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत गुरूवारपासून गावनिहाय विशेष शिबिरास सुरूवात झाली असून पहिल्याच दिवशी शेतकºयांनी नाव नोंदणी करण्याकरिता सामायिक सुविधा केंद्रांवर तोबा गर्दी झाली होती, अशी माहिती जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी दिली.शेतकºयांच्या सुरक्षित भवितव्यासाठी अंमलात आलेल्या या योजनेमध्ये १८ ते ४० वर्षे वयोगटातील २ हेक्टरर्यंत शेती असलेल्या सर्व अल्पभूधारक व सिमांत शेतकºयांना सहभाग घेता येणार आहे. वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यास ३ हजार रुपये प्रतिमाह पेन्शन मिळणार आहे. यादरम्यान लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची देखील तरतुद या योजनेत आहे. १ आॅगस्ट २०१९ रोजी १८ ते ४० वर्षे वय असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असून त्यांना वयानुसार प्रतिमाह ५५ ते २०० रुपये रक्कम जमा करावी लागेल. सदर रक्कम ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. यात केंद्र शासनाकडून सुद्धा रक्कम जमा करण्यात येईल. नोंदणीनंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून लाभार्थी हिश्याची रक्कम आॅटो-डेबीटने विमा कंपनीकडे जमा होणार आहे.दरम्यान, या योजनेच्या नाव नोंदणीसाठी गाव पातळीवर शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिले होते. तसेच या शिबिराला संबंधित गावाचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानुसार, गुरूवारी पहिल्याच दिवशी जिल्ह्यात विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करून लाभार्थी शेतकºयांची नोंदणी करण्यात आली. 

प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेमध्ये सहभागी होता यावे, याकरिता विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. २३ ते २५ आॅगस्टदरम्यान गाव पातळीवर नाव नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र शेतकºयांनी या योजनेसाठी नाव नोंदवावे.- ऋषीकेश मोडकजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी