शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यास शेतकऱ्यांचा विरोध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 14:50 IST

वाशिम : सोनल प्रकल्पावर अवलंबून असलेल्या परिसरातील २० ते २२ गावातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी कडाडून विरोध करीत, २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

ठळक मुद्देनगर पालिकेने सोनल प्रकल्पातील पाणी मोतसावंगा प्रकल्पाच्या जॅकवेलमध्ये आणून त्याद्वारे नागरिकांची तहान भागविण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाची ४ कोटीची योजना प्रस्तावित केली होती. सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यात आले तर सोनल परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे. सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यात येऊ नये, अशी एकमुखी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी यावेळी केली.

वाशिम : मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्पातील पाणी मंगरुळपीर शहरातील नागरिकांसाठी मोतसावंगा प्रकल्पात वळविण्याची योजना मंजूर झाली आहे.  सोनल प्रकल्पावर अवलंबून असलेल्या परिसरातील २० ते २२ गावातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी कडाडून विरोध करीत, २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यात येऊ नये, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थ, शेतकरी व सोनल प्रकल्प शेती सिंचन बचाव समितीने केली. 

मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणाºया मोतसावंगा प्रकल्पाने तळ गाठल्यामुळे मंगरुळपीर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत आहे. सध्याही येथे पाणीेटंचाई निर्माण झालेली आहे. यावर मात करण्यासाठी मंगरुळपीर नगर पालिकेने सोनल प्रकल्पातील पाणी मोतसावंगा प्रकल्पाच्या जॅकवेलमध्ये आणून त्याद्वारे नागरिकांची तहान भागविण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाची ४ कोटीची योजना प्रस्तावित केली होती. या योजनेला राज्य शासनाने नुकतीच मंजुरात दिली आहे. सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यात आले तर सोनल परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे.  सोनल प्रकल्पात आता केवळ मृतसाठा उरला असून, या प्रकल्पातून सिंचनही आधीच बंद झाले आहे. या प्रकल्पातून मोतसावंगा प्रकल्पापर्यंत पाणी नेण्यात आले तर सोनल प्रकल्प परिसरातील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे सोनल प्रकल्पातून पाणी नेण्यात येऊ नये, या मागणीसाठी गत १० दिवसांपासून सोनल प्रकल्प परिसरातील सोनाळा, किन्हीराजा, एरंडा, मैराळडोह, हिरंगी, लाठी, येडशी, शेलूबाजार, चोरद, वनोजा, माळशेलू, शेंदुरजना, गोगरी, खेर्डा, नागी, इचा, तपोवन, तºहाळा, पेडगाव, मसोला, गणेशपुर, चिखली आदी गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी लढा उभारला आहे. यापूर्वीदेखील या गावातील नागरिकांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन देत सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. तसेच  सोनल प्रकल्प शेती सिंचन बचाव समितीने गावोगावी बैठका घेऊन ग्रामस्थ व शेतकºयांना जागरूक केले. २७ मार्च रोजीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चाची पूर्वकल्पना २० ते २२ गावातील शेतकरी व ग्रामस्थांना दिली होती. नियोजित तारखेनुसार २७ मार्च रोजी सोनल प्रकल्प परिसरातील २० ते २२ गावातील नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यात येऊ नये, अशी एकमुखी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी यावेळी केली.

सिंचनासाठी जमिनी दिल्या; आता पाणीही हिरावून घेतले जातेय !

 सोनल प्रकल्प उभारताना अहवाल तयार करण्यात आला. त्यावेळी या प्रकल्पाचे पाणी शेतकºयांना सिंचनासाठी राखीव राहील, या पाण्यावर आरक्षण राहणार नाही, असेही नमुद केलेले असल्याचे यावेळी काही शेतकºयांनी सांगितले. सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार असल्याने आमच्या जमिनी आम्ही या प्रकल्पासाठी दिल्या. आता सिंचनाऐवजी पिण्यासाठी आणि तेही अन्यत्र पाणी वळविण्यात येणार असल्याने हा आमच्यावर अन्याय नाही का? असा सवालही शेतकºयांनी उपस्थित केला. या प्रकल्पातील पाणी शेतकºयांच्या सिंचनासाठी हक्काचे असताना या प्रकल्पातून उपसा करुन इतर ठिकाणी हलविण्याचे प्रयोजन काय? असा सवाल उपस्थित करून या प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी राखीव ठेवण्यात यावे. या प्रकल्पातील पाण्याचा वापर शेतकºयांना सिंचनासाठीच झाला पाहिजे, अशी रोखठोक भूमिका शेतकरी व ग्रामस्थांनी घेतली.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरWaterपाणीFarmerशेतकरी