शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यास शेतकऱ्यांचा विरोध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 14:50 IST

वाशिम : सोनल प्रकल्पावर अवलंबून असलेल्या परिसरातील २० ते २२ गावातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी कडाडून विरोध करीत, २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

ठळक मुद्देनगर पालिकेने सोनल प्रकल्पातील पाणी मोतसावंगा प्रकल्पाच्या जॅकवेलमध्ये आणून त्याद्वारे नागरिकांची तहान भागविण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाची ४ कोटीची योजना प्रस्तावित केली होती. सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यात आले तर सोनल परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे. सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यात येऊ नये, अशी एकमुखी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी यावेळी केली.

वाशिम : मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्पातील पाणी मंगरुळपीर शहरातील नागरिकांसाठी मोतसावंगा प्रकल्पात वळविण्याची योजना मंजूर झाली आहे.  सोनल प्रकल्पावर अवलंबून असलेल्या परिसरातील २० ते २२ गावातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी कडाडून विरोध करीत, २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यात येऊ नये, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थ, शेतकरी व सोनल प्रकल्प शेती सिंचन बचाव समितीने केली. 

मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणाºया मोतसावंगा प्रकल्पाने तळ गाठल्यामुळे मंगरुळपीर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत आहे. सध्याही येथे पाणीेटंचाई निर्माण झालेली आहे. यावर मात करण्यासाठी मंगरुळपीर नगर पालिकेने सोनल प्रकल्पातील पाणी मोतसावंगा प्रकल्पाच्या जॅकवेलमध्ये आणून त्याद्वारे नागरिकांची तहान भागविण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाची ४ कोटीची योजना प्रस्तावित केली होती. या योजनेला राज्य शासनाने नुकतीच मंजुरात दिली आहे. सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यात आले तर सोनल परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे.  सोनल प्रकल्पात आता केवळ मृतसाठा उरला असून, या प्रकल्पातून सिंचनही आधीच बंद झाले आहे. या प्रकल्पातून मोतसावंगा प्रकल्पापर्यंत पाणी नेण्यात आले तर सोनल प्रकल्प परिसरातील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे सोनल प्रकल्पातून पाणी नेण्यात येऊ नये, या मागणीसाठी गत १० दिवसांपासून सोनल प्रकल्प परिसरातील सोनाळा, किन्हीराजा, एरंडा, मैराळडोह, हिरंगी, लाठी, येडशी, शेलूबाजार, चोरद, वनोजा, माळशेलू, शेंदुरजना, गोगरी, खेर्डा, नागी, इचा, तपोवन, तºहाळा, पेडगाव, मसोला, गणेशपुर, चिखली आदी गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी लढा उभारला आहे. यापूर्वीदेखील या गावातील नागरिकांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन देत सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. तसेच  सोनल प्रकल्प शेती सिंचन बचाव समितीने गावोगावी बैठका घेऊन ग्रामस्थ व शेतकºयांना जागरूक केले. २७ मार्च रोजीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चाची पूर्वकल्पना २० ते २२ गावातील शेतकरी व ग्रामस्थांना दिली होती. नियोजित तारखेनुसार २७ मार्च रोजी सोनल प्रकल्प परिसरातील २० ते २२ गावातील नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यात येऊ नये, अशी एकमुखी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी यावेळी केली.

सिंचनासाठी जमिनी दिल्या; आता पाणीही हिरावून घेतले जातेय !

 सोनल प्रकल्प उभारताना अहवाल तयार करण्यात आला. त्यावेळी या प्रकल्पाचे पाणी शेतकºयांना सिंचनासाठी राखीव राहील, या पाण्यावर आरक्षण राहणार नाही, असेही नमुद केलेले असल्याचे यावेळी काही शेतकºयांनी सांगितले. सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार असल्याने आमच्या जमिनी आम्ही या प्रकल्पासाठी दिल्या. आता सिंचनाऐवजी पिण्यासाठी आणि तेही अन्यत्र पाणी वळविण्यात येणार असल्याने हा आमच्यावर अन्याय नाही का? असा सवालही शेतकºयांनी उपस्थित केला. या प्रकल्पातील पाणी शेतकºयांच्या सिंचनासाठी हक्काचे असताना या प्रकल्पातून उपसा करुन इतर ठिकाणी हलविण्याचे प्रयोजन काय? असा सवाल उपस्थित करून या प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी राखीव ठेवण्यात यावे. या प्रकल्पातील पाण्याचा वापर शेतकºयांना सिंचनासाठीच झाला पाहिजे, अशी रोखठोक भूमिका शेतकरी व ग्रामस्थांनी घेतली.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरWaterपाणीFarmerशेतकरी