शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
"अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यास शेतकऱ्यांचा विरोध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 14:50 IST

वाशिम : सोनल प्रकल्पावर अवलंबून असलेल्या परिसरातील २० ते २२ गावातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी कडाडून विरोध करीत, २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

ठळक मुद्देनगर पालिकेने सोनल प्रकल्पातील पाणी मोतसावंगा प्रकल्पाच्या जॅकवेलमध्ये आणून त्याद्वारे नागरिकांची तहान भागविण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाची ४ कोटीची योजना प्रस्तावित केली होती. सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यात आले तर सोनल परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे. सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यात येऊ नये, अशी एकमुखी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी यावेळी केली.

वाशिम : मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्पातील पाणी मंगरुळपीर शहरातील नागरिकांसाठी मोतसावंगा प्रकल्पात वळविण्याची योजना मंजूर झाली आहे.  सोनल प्रकल्पावर अवलंबून असलेल्या परिसरातील २० ते २२ गावातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी कडाडून विरोध करीत, २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यात येऊ नये, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थ, शेतकरी व सोनल प्रकल्प शेती सिंचन बचाव समितीने केली. 

मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणाºया मोतसावंगा प्रकल्पाने तळ गाठल्यामुळे मंगरुळपीर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत आहे. सध्याही येथे पाणीेटंचाई निर्माण झालेली आहे. यावर मात करण्यासाठी मंगरुळपीर नगर पालिकेने सोनल प्रकल्पातील पाणी मोतसावंगा प्रकल्पाच्या जॅकवेलमध्ये आणून त्याद्वारे नागरिकांची तहान भागविण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाची ४ कोटीची योजना प्रस्तावित केली होती. या योजनेला राज्य शासनाने नुकतीच मंजुरात दिली आहे. सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यात आले तर सोनल परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे.  सोनल प्रकल्पात आता केवळ मृतसाठा उरला असून, या प्रकल्पातून सिंचनही आधीच बंद झाले आहे. या प्रकल्पातून मोतसावंगा प्रकल्पापर्यंत पाणी नेण्यात आले तर सोनल प्रकल्प परिसरातील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे सोनल प्रकल्पातून पाणी नेण्यात येऊ नये, या मागणीसाठी गत १० दिवसांपासून सोनल प्रकल्प परिसरातील सोनाळा, किन्हीराजा, एरंडा, मैराळडोह, हिरंगी, लाठी, येडशी, शेलूबाजार, चोरद, वनोजा, माळशेलू, शेंदुरजना, गोगरी, खेर्डा, नागी, इचा, तपोवन, तºहाळा, पेडगाव, मसोला, गणेशपुर, चिखली आदी गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी लढा उभारला आहे. यापूर्वीदेखील या गावातील नागरिकांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन देत सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. तसेच  सोनल प्रकल्प शेती सिंचन बचाव समितीने गावोगावी बैठका घेऊन ग्रामस्थ व शेतकºयांना जागरूक केले. २७ मार्च रोजीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चाची पूर्वकल्पना २० ते २२ गावातील शेतकरी व ग्रामस्थांना दिली होती. नियोजित तारखेनुसार २७ मार्च रोजी सोनल प्रकल्प परिसरातील २० ते २२ गावातील नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यात येऊ नये, अशी एकमुखी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी यावेळी केली.

सिंचनासाठी जमिनी दिल्या; आता पाणीही हिरावून घेतले जातेय !

 सोनल प्रकल्प उभारताना अहवाल तयार करण्यात आला. त्यावेळी या प्रकल्पाचे पाणी शेतकºयांना सिंचनासाठी राखीव राहील, या पाण्यावर आरक्षण राहणार नाही, असेही नमुद केलेले असल्याचे यावेळी काही शेतकºयांनी सांगितले. सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार असल्याने आमच्या जमिनी आम्ही या प्रकल्पासाठी दिल्या. आता सिंचनाऐवजी पिण्यासाठी आणि तेही अन्यत्र पाणी वळविण्यात येणार असल्याने हा आमच्यावर अन्याय नाही का? असा सवालही शेतकºयांनी उपस्थित केला. या प्रकल्पातील पाणी शेतकºयांच्या सिंचनासाठी हक्काचे असताना या प्रकल्पातून उपसा करुन इतर ठिकाणी हलविण्याचे प्रयोजन काय? असा सवाल उपस्थित करून या प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी राखीव ठेवण्यात यावे. या प्रकल्पातील पाण्याचा वापर शेतकºयांना सिंचनासाठीच झाला पाहिजे, अशी रोखठोक भूमिका शेतकरी व ग्रामस्थांनी घेतली.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरWaterपाणीFarmerशेतकरी