शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

शेततळे योजनेबाबत शेतकरी उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 13:32 IST

चार वर्षांच्या कालावधित जिल्ह्यात केवळ १३७१ शेततळ्यांची कामे होऊ शकली आहेत.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: शासनाच्या मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत शासनाकडून वाशिम जिल्ह्यासाठी १९०० शेततळ्यांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. तथापि, या योजनेत शेतकऱ्यांना कमाल ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत असले तरी, लागणारा खर्च एक लाखापेक्षा अधिक होत असल्याने शेतकरी आता या योजनेबाबत उदासीन आहेत. त्यामुळेच २०१६-१७ ते २०१९-२० पर्यंत चार वर्षांच्या कालावधित जिल्ह्यात केवळ १३७१ शेततळ्यांची कामे होऊ शकली आहेत. दरम्यान, उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी कृषी विभागाची धडपड पुन्हा सुरु झाली आहे.राज्यात पावसाची अनियमिततेमुळे शेतकºयांना खरीप आणि रब्बी हंगामातही पाण्याअभावी मोठे नुकसान सोसावे लागते. ही बाब लक्षात घेऊन ९ फेब्रुवारी, २०१६ रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत ‘मागेल त्याला शेततळे’ योजना मंजूर करून महाराष्ट्र राज्य जलसंधारण महामंडळासाठी १० हजार कोटींची तरतुद करण्यात आली. शेततळयाची मागणी करणाºया अर्जदारास प्रथम प्राधान्य याप्रमाणे लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. या योजनेअंतर्गत सात प्रकारच्या आकारमानाची शेततळी निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये सर्वात मोठया आकारमानाचे शेततळे ३० मीटर लांब, रुंद आणि ३ मीटर खोल, तर सर्वात कमी १५ मीटर लांब, रूंद आणि ३ मीटर आकारमानाचे आहे. ३० मीटर लांब, रुंद आणि ३ मीटर खोल आकारमानाच्या शेततळ्यासाठी ५० हजार रुपये कमाल अनुदान निश्चित करण्यात आले आहे. इतर शेततळयासाठी आकारमानानुसार अनुदान देय असून, ५० हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च झाल्यास उर्वरित रक्कम लाभार्थ्यांला स्वत: खर्च करावा लागतो. या योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यासाठी १९०० शेततळ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. या योजनेच्या पहिल्याच वर्षी शेतकºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि सहा तालुक्यात मिळून ४८४ शेतकºयांनी शेततळे खोदले; परंतु त्यानंतर आजवरच्या तीन वर्षांत योजनेंतर्गत अर्ज करून मंजुरी मिळाल्यानंतरही खर्च अधिक लागत असल्याने शेतकरी या योजनेकडे पाठ करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच गेल्या तीन वर्षांत सहाही तालुक्यात मिळून केवळ ८८७ शेततळ्यांची कामे होऊ शकली असून, जिल्ह्यात आजवर १३७० शेततळी पूर्ण झाली आहेत.

शेततळ्याच्या योजनेसाठी राज्यभरात अनुदानाबाबत सारखेच निकष आहेत. प्रत्यक्षात राज्यातील विविध भागांतील जमिनीचे प्रकार किंवा स्तर भिन्न आहेत. वाशिम जिल्ह्यात चार ते पाच फुटावरच कठीणस्तर लागतो. परिणामी, खोदकामाला अडचणी येऊन निर्धारित अनुदानात शेततळ्याचे खोदकाम पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळेच वाशिम जिल्ह्यात या योजनेबाबत शेतकरी उदासीन असल्याचे दिसते.- एस. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी