शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेततळे योजनेबाबत शेतकरी उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 13:32 IST

चार वर्षांच्या कालावधित जिल्ह्यात केवळ १३७१ शेततळ्यांची कामे होऊ शकली आहेत.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: शासनाच्या मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत शासनाकडून वाशिम जिल्ह्यासाठी १९०० शेततळ्यांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. तथापि, या योजनेत शेतकऱ्यांना कमाल ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत असले तरी, लागणारा खर्च एक लाखापेक्षा अधिक होत असल्याने शेतकरी आता या योजनेबाबत उदासीन आहेत. त्यामुळेच २०१६-१७ ते २०१९-२० पर्यंत चार वर्षांच्या कालावधित जिल्ह्यात केवळ १३७१ शेततळ्यांची कामे होऊ शकली आहेत. दरम्यान, उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी कृषी विभागाची धडपड पुन्हा सुरु झाली आहे.राज्यात पावसाची अनियमिततेमुळे शेतकºयांना खरीप आणि रब्बी हंगामातही पाण्याअभावी मोठे नुकसान सोसावे लागते. ही बाब लक्षात घेऊन ९ फेब्रुवारी, २०१६ रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत ‘मागेल त्याला शेततळे’ योजना मंजूर करून महाराष्ट्र राज्य जलसंधारण महामंडळासाठी १० हजार कोटींची तरतुद करण्यात आली. शेततळयाची मागणी करणाºया अर्जदारास प्रथम प्राधान्य याप्रमाणे लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. या योजनेअंतर्गत सात प्रकारच्या आकारमानाची शेततळी निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये सर्वात मोठया आकारमानाचे शेततळे ३० मीटर लांब, रुंद आणि ३ मीटर खोल, तर सर्वात कमी १५ मीटर लांब, रूंद आणि ३ मीटर आकारमानाचे आहे. ३० मीटर लांब, रुंद आणि ३ मीटर खोल आकारमानाच्या शेततळ्यासाठी ५० हजार रुपये कमाल अनुदान निश्चित करण्यात आले आहे. इतर शेततळयासाठी आकारमानानुसार अनुदान देय असून, ५० हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च झाल्यास उर्वरित रक्कम लाभार्थ्यांला स्वत: खर्च करावा लागतो. या योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यासाठी १९०० शेततळ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. या योजनेच्या पहिल्याच वर्षी शेतकºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि सहा तालुक्यात मिळून ४८४ शेतकºयांनी शेततळे खोदले; परंतु त्यानंतर आजवरच्या तीन वर्षांत योजनेंतर्गत अर्ज करून मंजुरी मिळाल्यानंतरही खर्च अधिक लागत असल्याने शेतकरी या योजनेकडे पाठ करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच गेल्या तीन वर्षांत सहाही तालुक्यात मिळून केवळ ८८७ शेततळ्यांची कामे होऊ शकली असून, जिल्ह्यात आजवर १३७० शेततळी पूर्ण झाली आहेत.

शेततळ्याच्या योजनेसाठी राज्यभरात अनुदानाबाबत सारखेच निकष आहेत. प्रत्यक्षात राज्यातील विविध भागांतील जमिनीचे प्रकार किंवा स्तर भिन्न आहेत. वाशिम जिल्ह्यात चार ते पाच फुटावरच कठीणस्तर लागतो. परिणामी, खोदकामाला अडचणी येऊन निर्धारित अनुदानात शेततळ्याचे खोदकाम पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळेच वाशिम जिल्ह्यात या योजनेबाबत शेतकरी उदासीन असल्याचे दिसते.- एस. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी