शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

शेततळे योजनेबाबत शेतकरी उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 13:32 IST

चार वर्षांच्या कालावधित जिल्ह्यात केवळ १३७१ शेततळ्यांची कामे होऊ शकली आहेत.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: शासनाच्या मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत शासनाकडून वाशिम जिल्ह्यासाठी १९०० शेततळ्यांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. तथापि, या योजनेत शेतकऱ्यांना कमाल ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत असले तरी, लागणारा खर्च एक लाखापेक्षा अधिक होत असल्याने शेतकरी आता या योजनेबाबत उदासीन आहेत. त्यामुळेच २०१६-१७ ते २०१९-२० पर्यंत चार वर्षांच्या कालावधित जिल्ह्यात केवळ १३७१ शेततळ्यांची कामे होऊ शकली आहेत. दरम्यान, उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी कृषी विभागाची धडपड पुन्हा सुरु झाली आहे.राज्यात पावसाची अनियमिततेमुळे शेतकºयांना खरीप आणि रब्बी हंगामातही पाण्याअभावी मोठे नुकसान सोसावे लागते. ही बाब लक्षात घेऊन ९ फेब्रुवारी, २०१६ रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत ‘मागेल त्याला शेततळे’ योजना मंजूर करून महाराष्ट्र राज्य जलसंधारण महामंडळासाठी १० हजार कोटींची तरतुद करण्यात आली. शेततळयाची मागणी करणाºया अर्जदारास प्रथम प्राधान्य याप्रमाणे लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. या योजनेअंतर्गत सात प्रकारच्या आकारमानाची शेततळी निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये सर्वात मोठया आकारमानाचे शेततळे ३० मीटर लांब, रुंद आणि ३ मीटर खोल, तर सर्वात कमी १५ मीटर लांब, रूंद आणि ३ मीटर आकारमानाचे आहे. ३० मीटर लांब, रुंद आणि ३ मीटर खोल आकारमानाच्या शेततळ्यासाठी ५० हजार रुपये कमाल अनुदान निश्चित करण्यात आले आहे. इतर शेततळयासाठी आकारमानानुसार अनुदान देय असून, ५० हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च झाल्यास उर्वरित रक्कम लाभार्थ्यांला स्वत: खर्च करावा लागतो. या योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यासाठी १९०० शेततळ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. या योजनेच्या पहिल्याच वर्षी शेतकºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि सहा तालुक्यात मिळून ४८४ शेतकºयांनी शेततळे खोदले; परंतु त्यानंतर आजवरच्या तीन वर्षांत योजनेंतर्गत अर्ज करून मंजुरी मिळाल्यानंतरही खर्च अधिक लागत असल्याने शेतकरी या योजनेकडे पाठ करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच गेल्या तीन वर्षांत सहाही तालुक्यात मिळून केवळ ८८७ शेततळ्यांची कामे होऊ शकली असून, जिल्ह्यात आजवर १३७० शेततळी पूर्ण झाली आहेत.

शेततळ्याच्या योजनेसाठी राज्यभरात अनुदानाबाबत सारखेच निकष आहेत. प्रत्यक्षात राज्यातील विविध भागांतील जमिनीचे प्रकार किंवा स्तर भिन्न आहेत. वाशिम जिल्ह्यात चार ते पाच फुटावरच कठीणस्तर लागतो. परिणामी, खोदकामाला अडचणी येऊन निर्धारित अनुदानात शेततळ्याचे खोदकाम पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळेच वाशिम जिल्ह्यात या योजनेबाबत शेतकरी उदासीन असल्याचे दिसते.- एस. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी