शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 14:50 IST

आतापर्यंत केवळ १९२४ शेतकºयांना २२.१५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रब्बी हंगामात पीककर्ज मिळण्यासाठी शेतकरी संबंधित बँकांचे उंबरठे झिजवित आहेत. प्रशासकीय दिरंगाईमुळे पीककर्ज वाटपास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आतापर्यंत केवळ १९२४ शेतकºयांना २२.१५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.कृषीप्रधान देशातील शेतकºयांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या तरी गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. सन २०१९ या वर्षात खरीप हंगामात पावसाने दगा दिला. त्यानंतरही अनियमित पाऊस राहिल्याने सोयाबीन, मूग, उडदाच्या उत्पादनात घट आली. अवकाळी पावसाने तर पिकांचे प्रचंड नुकसान केले. संकटांची ही मालिका कमी म्हणून की काय, यात शेतमालाच्या अल्प बाजारभावाची भर पडली. चोहोबाजूंनी आलेल्या या संकटातून सावरत अनेक शेतकºयांनी रब्बी हंगामात पीककर्जाच्या माध्यमातून पेरणी करण्याचा प्रयत्न केला. काही शेतकºयांना पीककर्ज मिळाले तर काही शेतकºयांचे प्रस्ताव लालफितशाहीत अडकले. २०१९-२० च्या रब्बी हंगामात पीककर्जासाठी ४० कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. रब्बी हंगाम संपत आला असताना ९ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील १९२४ शेतकºयांना २२.१५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले.दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अपवाद वगळता अन्य राष्ट्रीयकृत बँकांकडून पीककर्जासाठी फारसा प्रतिसाद मिळत नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकºयांमधून उमटत आहेत. शेतकºयांना विनाविलंब पीककर्ज वाटप करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी यापूर्वीच दिले आहेत. तथापि, काही बँकांकडून दिरंगाई होत असल्याचा फटका शेतकºयांना बसत आहे. ४० कोटींच्या पीककर्जाचे उद्दिष्टसन २०१९ च्या रब्बी हंगामात ४० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. सदर उद्दिष्’ट पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांनी दिल्या आहेत. तथापि, ९ डिसेंबरपर्यंत २२.१५ कोटींचे पीककर्ज वाटप होऊ शकले.यावर्षी शेतकºयांना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागले. खरीप हंगामातही अनेक शेतकºयांना पीककर्ज मिळण्यासाठी हेलपाटे घ्यावे लागले. आता रब्बी हंगामातील शेतकºयांना मागणीनुसार पीककर्ज मिळण्यास विलंब होतो. शेतकºयांची गैरसोय होता कामा नये, असे प्रशासनाचे आदेश असतानाही शेतकºयांना वेळेवर कर्ज मिळत नाही.

- आकातराव सरनाईकदेऊळगाव बंडा ता. रिसोड

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज