शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाव मिळेना, २० रुपयांत विकावे लागताहेत आठ किलो टरबूज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 11:00 IST

Agriculture News : शेतकऱ्यांना २० रुपयांत आठ किलो टरबूज विकण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

कामरगाव : यंदा शेतकऱ्यांना नानाविध संकटाला सामोरे जावे लागत असून, कडक निर्बंध असल्याने कामरगाव परिसरातील शेतकऱ्यांना २० रुपयांत आठ किलो टरबूज विकण्याची वेळ आली आहे.

सततच्या पावसाने मागील वर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने खरिपातील तोटा रबीत भरून काढावा या उद्देशाने सिंचनाची सोय असलेल्या कामरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी टरबूज लागवडीचा निर्णय घेतला. त्यासाठी शेतीमशागतीपासून बियाणे व खते, खरेदी तसेच पुढील मशागतीसाठीही खर्च केला. बाजारात टरबुजाची विक्री करण्याच्या वेळी कोरोनाचा संसर्ग वाढल्याने निर्बंध कडक करण्यात आले. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना व दुकाने तसेच आठवडी बाजार बंद करण्यात आले. परिणामी, टरबुजाची विक्री थांबली.

सुरुवातीला प्रतिकिलो दराने होणारी टरबुजाची विक्री नगावर येऊन पोहोचली. आणि त्याही पुढे जाऊन आजमितीला २० रुपयांत (दोन, अडीच किलोचे एक टरबूज) चार टरबूज विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

यामुळे शेतकरी गारद झाला आहे. आजमितीला टरबूज विक्रीतून मिळणाऱ्या रकमेतून लागवड खर्च निघणेही कठीण झाले आहे. संचारबंदी, कडक निर्बंधाचा सर्वाधिक फटका भाजीपाला व टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना बसला. अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर भाजीपाला सडल्याचे, याशिवाय टरबुजाची विक्री न झाल्याने टरबूज रस्त्यावर फेकून दिल्याचे प्रकार यापूर्वी कामरगाव परिसरात घडले आहेत. भाजीपाला व टरबूज उत्पादक शेतकऱ्यांनाही शासनाने अर्थसाहाय्य करावे, अशी मागणी होत आहे.

 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी