शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅक्सी - रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ, विमा, मुलांना नोकरी...
2
अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य
3
अभिषेक बच्चनला बंपर लॉटरी लागली; खटाखट खटाखट १५ कोटींचे सहा आलिशान फ्लॅट खरेदी केले
4
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
5
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
6
Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप
7
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
8
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
9
'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
10
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
11
लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...
12
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
13
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
14
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
15
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार
16
खळबळजनक! T20 World Cup मध्ये मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, वेगवेगळ्या नंबरवरून आले फोन
17
ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री
18
फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळात भाजप असणे अशक्य; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य
19
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे लोकार्पण कधी? उद्धव ठाकरेंनी केली बांधकामाची पाहणी
20
सुख-शांती हिरावून घेऊ शकतं स्मार्टफोनचं व्यसन; 'या' आजारांचा धोका, काय आहे Nomophobia?

नाफेड केंद्रांवर शेतकऱ्यांची झुंबड

By admin | Published: May 16, 2017 1:38 AM

वाशिम : येत्या ३१ मेपर्यंत शासकीय तूर खरेदी होणार असल्याने हमीभावात तूरीची विक्री व्हावी म्हणून जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रांवर एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येत्या ३१ मेपर्यंत शासकीय तूर खरेदी होणार असल्याने हमीभावात तूरीची विक्री व्हावी म्हणून जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रांवर एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे.सन २०१३ ते २०१५ या दरम्यान निसर्गाची साथ मिळाली नसल्याने शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पादन घेता आले नाही. खरिप हंगामात पावसाच्या अनियमित हजेरीने शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीला सामोरे जावे लागले. त्यानंतर पावसाने दगा दिल्याने उत्पादनात प्रचंड घट आली. रब्बी हंगामात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली होती. सलग तीन वर्षे वाशिम जिल्हा दुष्काळाच्या छायेत होता. शासनाने दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून घोषितही केले होते. सन २०१६ या वर्षात निसर्गाने साथ दिल्याने शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पादन घेता आले. मात्र, या वर्षातच शेतमालाचे बाजारभाव गडगडल्याने शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ आलेच नाहीत. शासनाने तूरीला ५०५० रुपये हमीभाव जाहिर केलेला आहे. मात्र, बाजार समित्यांमध्ये हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी नाफेड केंद्रांवर मोठ्या संख्येने वळत आहेत. मध्यंतरी शासनाने नाफेडची तूर खरेदी बंद केली होती. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता ३१ मे पर्यंत शासकीय तूर खरेदी होणार आहे. प्रथम नाफेड केंद्रांवर नोंदणी करून ‘टोकन’ घेणाऱ्या शेतकऱ्यांचीच तूर खरेदी केली जाणार आहे. ग्रेडर व गोदामाचे नियोजन नसल्याने १२ मे पर्यंत नाफेड केंद्रावर तूर खरेदीला सुरूवात होऊ शकली नव्हती. १३ मे पासून जिल्ह्यात वाशिम, मालेगाव, कारंजा व मंगरूळपीर येथे शासकीय खरेदी सुरू आहे. मानोरा येथे नाफेड केंद्र नाही तर रिसोड बाजार समितीत नाफेडची खरेदी सुरू होऊ शकली नाही. टोकन घेण्यासाठी मालेगाव, वाशिम, कारंजा व मंगरूळपीर येथे शेतकऱ्यांची झुंबड उडत असल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. ट्रक्टर व अन्य प्रकारच्या वाहनांमध्ये तूर आणली जात आहे. टोकन घेताना वाहन क्रमांक नोंदविणे आवश्यक असल्याने शेतकऱ्यांना अगोदरच ‘वाहन’ बुक करण्याची वेळ आली आहे.