शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

कारंज्यातील शेतकरी धडकले उपविभागीय अधिका-यांच्या कार्यालयावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 18:45 IST

कारंजा तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्या मान्य व्हाव्या, याकरिता कारंजा तालुक्यातील कुपटी येथून १६ किलोमिटर पायदळ मोर्चा काढत शेकडो शेतकरी, शेतमजूर ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता कारंजा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले. 

ठळक मुद्देकुपटी ते  कारंजा १६ कि.मी. पायदळवारी विविध मागण्यांचे निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : कारंजा तालुक्यात गत ४ वर्षांपासून नैसर्गिक आणि शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकरी, शेतमजुर आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्या मान्य व्हाव्या, याकरिता कारंजा तालुक्यातील कुपटी येथून १६ किलोमिटर पायदळ मोर्चा काढत शेकडो शेतकरी, शेतमजूर ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता कारंजा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले. ११ नोव्हेंबर २०१७ रोजी कारंजा तालुक्यातील कुपटी येथील स्व. सुलभाताई इंगोले कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीला शिकणारा २२ वर्षीय विद्यार्थी मंगेश विष्णू लव्हाळे याने आपल्या वडिलाकडे असलेले कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून विहिरीत उडी घेउुन आत्महत्या केली होती. त्या विद्यार्थ्याची  आत्महत्या ही आत्महत्या नव्हे तर बलिदान ठरावे या करिता कुपटी येथील राहत्या घरापासून कारंजापर्यंत शेतकरी नेते तथा जिल्हा परिषद सदस्य गजानन अमदाबादकर व जिल्हा परिषद सदस्या ज्योतीताई गणेशपुरे यांच्या नेतृत्वात पायदळ यात्रा काढण्यात आली. या पायदळ यात्रेत शेतकरी व शेतमजुरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.तसेच माजी आमदार प्रकाश डहाके यांच्यासह जिल्हा मध्यावर्ती बँकेचे संचालक श्रीधर कानकिरड, ख.वि.स.चे अध्यक्ष बाबाराव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकरी व शेतमजुरांचा एल्गार मोर्चा कारंजा उपविभागीय अधीकारी यांच्या कार्यालयावर धडकला. सलग २ वर्षाच्या दुष्काळानंतर गतवर्षी परतीचा पाऊस व त्याच बरोबर नोटबंदीमुळे शेतकºयांना जबर फटका बसला. तूर पिकाचे अभूतपुर्व उत्पादन होवूनही शेतक-यांच्या नशिबी हालअपेष्टा व आर्थिक नुकसानीशिवाय काहीच आले नाही. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. परंतू त्याचा किती शेतक-यांना लाभ मिळाला, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. शेतकरी आत्महत्या या सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा परिणाम आहे असा आरोप करीत आता तर शेतक-यांची शेतकरी मुलं व तरूण मुली आत्महत्या करीत आहेत, असा दावाही मोर्चेकºयांनी केला.आपल्या वेदना सरकारसमोर सादर करण्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी मोर्चा काढला. एल्गार मोर्चा तहसिल परिसरात आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर जाहिर सभेत झाले. मान्यवरांनी उपस्थित शेतकरी व शेतमजुरांना मार्गदर्शन केले.  

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन