शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

कारंज्यातील शेतकरी धडकले उपविभागीय अधिका-यांच्या कार्यालयावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 18:45 IST

कारंजा तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्या मान्य व्हाव्या, याकरिता कारंजा तालुक्यातील कुपटी येथून १६ किलोमिटर पायदळ मोर्चा काढत शेकडो शेतकरी, शेतमजूर ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता कारंजा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले. 

ठळक मुद्देकुपटी ते  कारंजा १६ कि.मी. पायदळवारी विविध मागण्यांचे निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : कारंजा तालुक्यात गत ४ वर्षांपासून नैसर्गिक आणि शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकरी, शेतमजुर आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्या मान्य व्हाव्या, याकरिता कारंजा तालुक्यातील कुपटी येथून १६ किलोमिटर पायदळ मोर्चा काढत शेकडो शेतकरी, शेतमजूर ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता कारंजा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले. ११ नोव्हेंबर २०१७ रोजी कारंजा तालुक्यातील कुपटी येथील स्व. सुलभाताई इंगोले कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीला शिकणारा २२ वर्षीय विद्यार्थी मंगेश विष्णू लव्हाळे याने आपल्या वडिलाकडे असलेले कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून विहिरीत उडी घेउुन आत्महत्या केली होती. त्या विद्यार्थ्याची  आत्महत्या ही आत्महत्या नव्हे तर बलिदान ठरावे या करिता कुपटी येथील राहत्या घरापासून कारंजापर्यंत शेतकरी नेते तथा जिल्हा परिषद सदस्य गजानन अमदाबादकर व जिल्हा परिषद सदस्या ज्योतीताई गणेशपुरे यांच्या नेतृत्वात पायदळ यात्रा काढण्यात आली. या पायदळ यात्रेत शेतकरी व शेतमजुरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.तसेच माजी आमदार प्रकाश डहाके यांच्यासह जिल्हा मध्यावर्ती बँकेचे संचालक श्रीधर कानकिरड, ख.वि.स.चे अध्यक्ष बाबाराव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकरी व शेतमजुरांचा एल्गार मोर्चा कारंजा उपविभागीय अधीकारी यांच्या कार्यालयावर धडकला. सलग २ वर्षाच्या दुष्काळानंतर गतवर्षी परतीचा पाऊस व त्याच बरोबर नोटबंदीमुळे शेतकºयांना जबर फटका बसला. तूर पिकाचे अभूतपुर्व उत्पादन होवूनही शेतक-यांच्या नशिबी हालअपेष्टा व आर्थिक नुकसानीशिवाय काहीच आले नाही. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. परंतू त्याचा किती शेतक-यांना लाभ मिळाला, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. शेतकरी आत्महत्या या सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा परिणाम आहे असा आरोप करीत आता तर शेतक-यांची शेतकरी मुलं व तरूण मुली आत्महत्या करीत आहेत, असा दावाही मोर्चेकºयांनी केला.आपल्या वेदना सरकारसमोर सादर करण्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी मोर्चा काढला. एल्गार मोर्चा तहसिल परिसरात आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर जाहिर सभेत झाले. मान्यवरांनी उपस्थित शेतकरी व शेतमजुरांना मार्गदर्शन केले.  

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन