शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

पडताळणीत अडकली शेतकऱ्यांची नुकसानभरपाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 15:50 IST

वाशिम : आॅगस्ट २०१८ दरम्यान अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ६७०० हेक्टर क्षेत्रावर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याने बाधित शेतकºयांना पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळणार आहे. यासंदर्भात गत महिन्याभरापासून केवळ पडताळणीच केली जात असल्याने नुकसानभरपाई कधी मिळणार? याची प्रतिक्षा कायम आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आॅगस्ट २०१८ दरम्यान अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ६७०० हेक्टर क्षेत्रावर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याने बाधित शेतकºयांना पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळणार आहे. यासंदर्भात गत महिन्याभरापासून केवळ पडताळणीच केली जात असल्याने नुकसानभरपाई कधी मिळणार? याची प्रतिक्षा कायम आहे. सन २०१८ मधील खरीप हंगाम जिल्ह्यातील २ लाख १ हजार शेतकºयांनी पीक विमा काढला होता. जिल्ह्यात १६ आॅगस्ट २०१८ ते १९ आॅगस्ट २०१८ दरम्यान अतिवृष्टीमुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला होता. जवळपास ६७०० हेक्टर क्षेत्रावर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याने कृषी व महसूल विभागाच्या पंचनाम्यानुसार शासनाकडे सविस्तर अहवाल पाठविण्यात आला होता. तसेच ४८ तासांच्या आत पीकविम्याची जबाबदारी असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीकडे शेतकºयांनी नुकसानभरपाई संदर्भात तक्रारही केली होती. त्याअनुषंगाने नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेताची पाहणी पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेने केल्यानंतर, या नुकसानाबद्दल केंद्र आणि राज्य शासनाच्या हिश्शाची रक्कम शेतकºयांना मंजूर करण्यात आली. पीकविम्याबद्दल वैयक्तिक नुकसान झालेल्या शेतकºयांच्या यादीची पडताळणी पीकविमा कंपनीकडून गत महिनाभरापासून करण्यात येत आहे. अद्याप पडताळणीच सुरू असल्याने नुकसानभरपाईची रक्कम नेमकी केव्हा मिळणार? असा प्रश्न शेतकºयांमधून उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील ११४० शेतकºयांनी स्थानिक आपत्तीच्या निकषानुसार वैयक्तिक मदतीसाठी पीकविमा कंपनीकडे तक्रार केली होती.  या शेतकºयांच्या तक्रारीनुसार पडताळणी करून त्यांच्या खात्यात पीकविम्याबद्दल नुकसान भरपाईची रक्कम जमा होणे आवश्यक आहे. 

नुकसानग्रस्त शेतकºयांना पीकविम्याबद्दल आर्थिक मदत देण्यासाठी पडताळणी केली जात आहे. पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात नुकसानभरपाईबाबतची कार्यवाही केली जाईल.  - राहुल सहांशे,  जिल्हा समन्वयक, आयसीआयसीआय लोम्बार्ड

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी