शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

शेतकरी दुहेरी संकटात; पिकांवर किडींचा प्रकोप, फवारणीही ठरतेय घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 14:24 IST

फवारणी केली नाही, तर पिके हातची जातील आणि फवारणी करावी, तर जीव धोक्यात येईल, त्यामुळे करावे तरी काय, असा प्रश्न शेतकरी आणि शेतमजुरांसमोरही उपस्थित होत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क उंबर्डा बाजार (वाशिम) : रिमझीम पावसामुळे खरीप पिके बहरत असतानाच या पिकांवर विविध किडींचा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यावर नियंत्रणासाठी शेतकरी कीटकनाशक फवारणी करीत आहेत; परंतु कीटकनाशक फवारणी करताना विषबाधेची भिती आहेच शिवाय पिक मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने या पिकांतील सरपटणाºया प्राण्यांचाही संचार आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांसमोर दुहेरी संकट ओढवल्याचे दिसत आहे.कारंजा तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. तथापि, गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पडत असलेला रिमझीम पाऊस पिकांसाठी फायदेशीर ठरत असला तरी, याच पावसामुळे पिकांवर विविध किडींचा प्रादूर्भाव होत आहे. सोयाबीनसह कपाशीवर मावा, कोकडा, पांढरी माशी, उंटअळी, पाने खाणाºया अळीचा मोठा प्रादूर्भाव झालेला आहे. त्यामुळे शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. तथापि, रिमझीम पावसामुळे पिकांची उंची वाढली असून, शिवार दाट झाले आहे. या पिकांत साप, विंचू आदि सरपटणाºया घातक प्राण्यांचा संचारही वाढला आहे. कमरेच्यावर वाढलेल्या पिकांत फवारणी करताना पंपवर धरावा लागतो. अशात थोडाही वारा आला की, फवारणीचे औषध शेतमजुर, शेतकºयाच्या नाका, तोंडाकडे उडते. त्यामुळे विषबाधेची भिती आहे, तर हा धोका टाळण्याचा प्रयत्न करीत असताना खाली सरपटणाºया प्राण्यांकडे लक्ष राहत नाही. कीटकनाशक फवारणी केली नाही, तर पिके हातची जातील आणि फवारणी करावी, तर जीव धोक्यात येईल, त्यामुळे करावे तरी काय, असा प्रश्न शेतकरी आणि शेतमजुरांसमोरही उपस्थित होत आहे. 

फवारणी करताना शेतमजूराच्या पायाला गुंडाळला सापउंबर्डा बाजार: सोयाबीन पिकांवरील किडीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतात फवारणी करणाºया शेतमजुराच्या पायालाच साप गुंडाळल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी उंबर्डा बाजार परिसरात घडली. नशिब बलवत्तर म्हणून शेतमजुराच्या लक्षात आल्याने त्याने शेताबाहेर धाव घेतल्याने त्याचा जीव वाचला. दुसºया दिवशी दुसरा शेतमजूर आणि शेतकरी हळदे यांना पुन्हा शेतात मोठा साप दिसला. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण, रिमझीम पावसामुळे खरीप पिकांवर किडींचा प्रादूर्भाव झाला आहे. या किडीवर नियंत्रणासाठी उंबर्डा बाजार येथील शेतकरी वसंतराव हळदे यांनी सोयाबीन पिकावर कीटकनाशक फवारणीचे काम शेतमजुराला दिले. हा शेतमजूर ७ सप्टेंबर रोजी फवारणी करीत असताना दुपारी चार वाजताच्या सुमारास अचानक पायावर काही भार पडल्याचे जाणवले. त्याने पाहिले असता पायाला मोठा साप गुंडाळल्याचे दिसले. त्याने लगेच पाय झटकून शेताबाहेर पळ काढला. सुदैवाने सापाने त्याच्या पायाला चावा घेतला नाही. त्यामुळे त्याने फवारणीच सोडून दिली. विशेष म्हणजे दुसºया दिवशी वसंतराव हळद हे दुसºया शेतमजुला घेऊन फवारणीसाठी गेले. त्यावेळीही दोघांना मोठा साप दिसला. त्यामुळे दोघांनीही शेतातून पळ काढला.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी