शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

शेतकरी दुहेरी संकटात; पिकांवर किडींचा प्रकोप, फवारणीही ठरतेय घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 14:24 IST

फवारणी केली नाही, तर पिके हातची जातील आणि फवारणी करावी, तर जीव धोक्यात येईल, त्यामुळे करावे तरी काय, असा प्रश्न शेतकरी आणि शेतमजुरांसमोरही उपस्थित होत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क उंबर्डा बाजार (वाशिम) : रिमझीम पावसामुळे खरीप पिके बहरत असतानाच या पिकांवर विविध किडींचा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यावर नियंत्रणासाठी शेतकरी कीटकनाशक फवारणी करीत आहेत; परंतु कीटकनाशक फवारणी करताना विषबाधेची भिती आहेच शिवाय पिक मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने या पिकांतील सरपटणाºया प्राण्यांचाही संचार आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांसमोर दुहेरी संकट ओढवल्याचे दिसत आहे.कारंजा तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. तथापि, गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पडत असलेला रिमझीम पाऊस पिकांसाठी फायदेशीर ठरत असला तरी, याच पावसामुळे पिकांवर विविध किडींचा प्रादूर्भाव होत आहे. सोयाबीनसह कपाशीवर मावा, कोकडा, पांढरी माशी, उंटअळी, पाने खाणाºया अळीचा मोठा प्रादूर्भाव झालेला आहे. त्यामुळे शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. तथापि, रिमझीम पावसामुळे पिकांची उंची वाढली असून, शिवार दाट झाले आहे. या पिकांत साप, विंचू आदि सरपटणाºया घातक प्राण्यांचा संचारही वाढला आहे. कमरेच्यावर वाढलेल्या पिकांत फवारणी करताना पंपवर धरावा लागतो. अशात थोडाही वारा आला की, फवारणीचे औषध शेतमजुर, शेतकºयाच्या नाका, तोंडाकडे उडते. त्यामुळे विषबाधेची भिती आहे, तर हा धोका टाळण्याचा प्रयत्न करीत असताना खाली सरपटणाºया प्राण्यांकडे लक्ष राहत नाही. कीटकनाशक फवारणी केली नाही, तर पिके हातची जातील आणि फवारणी करावी, तर जीव धोक्यात येईल, त्यामुळे करावे तरी काय, असा प्रश्न शेतकरी आणि शेतमजुरांसमोरही उपस्थित होत आहे. 

फवारणी करताना शेतमजूराच्या पायाला गुंडाळला सापउंबर्डा बाजार: सोयाबीन पिकांवरील किडीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतात फवारणी करणाºया शेतमजुराच्या पायालाच साप गुंडाळल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी उंबर्डा बाजार परिसरात घडली. नशिब बलवत्तर म्हणून शेतमजुराच्या लक्षात आल्याने त्याने शेताबाहेर धाव घेतल्याने त्याचा जीव वाचला. दुसºया दिवशी दुसरा शेतमजूर आणि शेतकरी हळदे यांना पुन्हा शेतात मोठा साप दिसला. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण, रिमझीम पावसामुळे खरीप पिकांवर किडींचा प्रादूर्भाव झाला आहे. या किडीवर नियंत्रणासाठी उंबर्डा बाजार येथील शेतकरी वसंतराव हळदे यांनी सोयाबीन पिकावर कीटकनाशक फवारणीचे काम शेतमजुराला दिले. हा शेतमजूर ७ सप्टेंबर रोजी फवारणी करीत असताना दुपारी चार वाजताच्या सुमारास अचानक पायावर काही भार पडल्याचे जाणवले. त्याने पाहिले असता पायाला मोठा साप गुंडाळल्याचे दिसले. त्याने लगेच पाय झटकून शेताबाहेर पळ काढला. सुदैवाने सापाने त्याच्या पायाला चावा घेतला नाही. त्यामुळे त्याने फवारणीच सोडून दिली. विशेष म्हणजे दुसºया दिवशी वसंतराव हळद हे दुसºया शेतमजुला घेऊन फवारणीसाठी गेले. त्यावेळीही दोघांना मोठा साप दिसला. त्यामुळे दोघांनीही शेतातून पळ काढला.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी