शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी दुहेरी संकटात; पिकांवर किडींचा प्रकोप, फवारणीही ठरतेय घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 14:24 IST

फवारणी केली नाही, तर पिके हातची जातील आणि फवारणी करावी, तर जीव धोक्यात येईल, त्यामुळे करावे तरी काय, असा प्रश्न शेतकरी आणि शेतमजुरांसमोरही उपस्थित होत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क उंबर्डा बाजार (वाशिम) : रिमझीम पावसामुळे खरीप पिके बहरत असतानाच या पिकांवर विविध किडींचा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यावर नियंत्रणासाठी शेतकरी कीटकनाशक फवारणी करीत आहेत; परंतु कीटकनाशक फवारणी करताना विषबाधेची भिती आहेच शिवाय पिक मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने या पिकांतील सरपटणाºया प्राण्यांचाही संचार आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांसमोर दुहेरी संकट ओढवल्याचे दिसत आहे.कारंजा तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. तथापि, गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पडत असलेला रिमझीम पाऊस पिकांसाठी फायदेशीर ठरत असला तरी, याच पावसामुळे पिकांवर विविध किडींचा प्रादूर्भाव होत आहे. सोयाबीनसह कपाशीवर मावा, कोकडा, पांढरी माशी, उंटअळी, पाने खाणाºया अळीचा मोठा प्रादूर्भाव झालेला आहे. त्यामुळे शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. तथापि, रिमझीम पावसामुळे पिकांची उंची वाढली असून, शिवार दाट झाले आहे. या पिकांत साप, विंचू आदि सरपटणाºया घातक प्राण्यांचा संचारही वाढला आहे. कमरेच्यावर वाढलेल्या पिकांत फवारणी करताना पंपवर धरावा लागतो. अशात थोडाही वारा आला की, फवारणीचे औषध शेतमजुर, शेतकºयाच्या नाका, तोंडाकडे उडते. त्यामुळे विषबाधेची भिती आहे, तर हा धोका टाळण्याचा प्रयत्न करीत असताना खाली सरपटणाºया प्राण्यांकडे लक्ष राहत नाही. कीटकनाशक फवारणी केली नाही, तर पिके हातची जातील आणि फवारणी करावी, तर जीव धोक्यात येईल, त्यामुळे करावे तरी काय, असा प्रश्न शेतकरी आणि शेतमजुरांसमोरही उपस्थित होत आहे. 

फवारणी करताना शेतमजूराच्या पायाला गुंडाळला सापउंबर्डा बाजार: सोयाबीन पिकांवरील किडीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतात फवारणी करणाºया शेतमजुराच्या पायालाच साप गुंडाळल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी उंबर्डा बाजार परिसरात घडली. नशिब बलवत्तर म्हणून शेतमजुराच्या लक्षात आल्याने त्याने शेताबाहेर धाव घेतल्याने त्याचा जीव वाचला. दुसºया दिवशी दुसरा शेतमजूर आणि शेतकरी हळदे यांना पुन्हा शेतात मोठा साप दिसला. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण, रिमझीम पावसामुळे खरीप पिकांवर किडींचा प्रादूर्भाव झाला आहे. या किडीवर नियंत्रणासाठी उंबर्डा बाजार येथील शेतकरी वसंतराव हळदे यांनी सोयाबीन पिकावर कीटकनाशक फवारणीचे काम शेतमजुराला दिले. हा शेतमजूर ७ सप्टेंबर रोजी फवारणी करीत असताना दुपारी चार वाजताच्या सुमारास अचानक पायावर काही भार पडल्याचे जाणवले. त्याने पाहिले असता पायाला मोठा साप गुंडाळल्याचे दिसले. त्याने लगेच पाय झटकून शेताबाहेर पळ काढला. सुदैवाने सापाने त्याच्या पायाला चावा घेतला नाही. त्यामुळे त्याने फवारणीच सोडून दिली. विशेष म्हणजे दुसºया दिवशी वसंतराव हळद हे दुसºया शेतमजुला घेऊन फवारणीसाठी गेले. त्यावेळीही दोघांना मोठा साप दिसला. त्यामुळे दोघांनीही शेतातून पळ काढला.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी