शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सोनल प्रकल्पातील पाण्यापासून शेतकरी वंचित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 16:01 IST

शेलूबाजार (वाशिम) : सोनल प्रकल्पाच्या कालव्यातून रब्बी हंगामाकरिता पाणी मिळत नसल्याची तक्रार वनोजा येथील गणेश नामदेव गावंडे यांच्यासह शेतकऱ्यांनी शेलूबाजार येथील सोनल प्रकल्प शाखा अभियंत्यांकडे ८ जानेवारीला केली.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार (वाशिम) : सोनल प्रकल्पाच्या कालव्यातून रब्बी हंगामाकरिता पाणी मिळत नसल्याची तक्रार वनोजा येथील गणेश नामदेव गावंडे यांच्यासह शेतकऱ्यांनी शेलूबाजार येथील सोनल प्रकल्प शाखा अभियंत्यांकडे ८ जानेवारीला केली. पाण्याअभावी गहू पिकाचे नुकसान होण्याची भीती शेतकºयांनी वर्तविली आहे.   सन २०१८ मध्ये सोनल प्रकल्प १०० टक्के भरल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रब्बीची पेरणी झाली. यावर्षी  गव्हाचा पेरा चांगलाच वाढलेला आहे. परंतु सोनल प्रकल्प प्रशासनाकडून प्रत्येक शेतकऱ्यांना पाणी मिळेल अशा प्रकारची व्यवस्था केली नसल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. वनोजा येथील शेतकरी गणेश नामदेव गावंडे यांनी शेलूबाजार शाखेत जावून गहू पेरणी करावयाची असल्याने सिंचनासाठी पाणी मिळेल का? अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांना पाणी मिळेल असे आश्वासन मिळाल्याने रितसर अर्ज केला. गावंडे यांचेकडून सन २०१६-१७ मधील थकीत १८३ रुपयांचा भरणा करुन पावती दिली. त्यामुळे पाणी मिळण्याची आशा पल्लवीत झाल्याने २ एकरात ९ डिसेंबर रोजी गव्हाची पेरणी केली. परंतु अद्याप शेतात पाणी पोहचले नाही. अशीच गत परिसरातील अनेक शेतकºयांची झाली आहे. पेरलेले बियाणे व्यर्थ जावू नये म्हणून विहीरीचे पाणी देवून पिके वाचविली. परंतु यापुढे विहिरीत पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे प्रकल्पातील पाणी मिळविण्यासाठी शेलूबाजार शाखेत वारंवार चकरा मारल्या. परंतु उडवा उजवीचे उत्तरे मिळत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. तºहाळा येथील अनेक शेतकºयांनी रब्बीची पेरणी केली. परंतु अद्याप त्यांच्या शेतात पाणी पोहोचले नसल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात सोनल प्रकल्पाचे प्रभारी शाखा अभियंता अनिल डांगे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतू, त्यांनी कॉल रिसीव्ह केला नसल्याने संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :washimवाशिमDamधरणFarmerशेतकरीagricultureशेती