शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

सोनल प्रकल्पातील पाण्यापासून शेतकरी वंचित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 16:01 IST

शेलूबाजार (वाशिम) : सोनल प्रकल्पाच्या कालव्यातून रब्बी हंगामाकरिता पाणी मिळत नसल्याची तक्रार वनोजा येथील गणेश नामदेव गावंडे यांच्यासह शेतकऱ्यांनी शेलूबाजार येथील सोनल प्रकल्प शाखा अभियंत्यांकडे ८ जानेवारीला केली.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार (वाशिम) : सोनल प्रकल्पाच्या कालव्यातून रब्बी हंगामाकरिता पाणी मिळत नसल्याची तक्रार वनोजा येथील गणेश नामदेव गावंडे यांच्यासह शेतकऱ्यांनी शेलूबाजार येथील सोनल प्रकल्प शाखा अभियंत्यांकडे ८ जानेवारीला केली. पाण्याअभावी गहू पिकाचे नुकसान होण्याची भीती शेतकºयांनी वर्तविली आहे.   सन २०१८ मध्ये सोनल प्रकल्प १०० टक्के भरल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रब्बीची पेरणी झाली. यावर्षी  गव्हाचा पेरा चांगलाच वाढलेला आहे. परंतु सोनल प्रकल्प प्रशासनाकडून प्रत्येक शेतकऱ्यांना पाणी मिळेल अशा प्रकारची व्यवस्था केली नसल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. वनोजा येथील शेतकरी गणेश नामदेव गावंडे यांनी शेलूबाजार शाखेत जावून गहू पेरणी करावयाची असल्याने सिंचनासाठी पाणी मिळेल का? अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांना पाणी मिळेल असे आश्वासन मिळाल्याने रितसर अर्ज केला. गावंडे यांचेकडून सन २०१६-१७ मधील थकीत १८३ रुपयांचा भरणा करुन पावती दिली. त्यामुळे पाणी मिळण्याची आशा पल्लवीत झाल्याने २ एकरात ९ डिसेंबर रोजी गव्हाची पेरणी केली. परंतु अद्याप शेतात पाणी पोहचले नाही. अशीच गत परिसरातील अनेक शेतकºयांची झाली आहे. पेरलेले बियाणे व्यर्थ जावू नये म्हणून विहीरीचे पाणी देवून पिके वाचविली. परंतु यापुढे विहिरीत पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे प्रकल्पातील पाणी मिळविण्यासाठी शेलूबाजार शाखेत वारंवार चकरा मारल्या. परंतु उडवा उजवीचे उत्तरे मिळत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. तºहाळा येथील अनेक शेतकºयांनी रब्बीची पेरणी केली. परंतु अद्याप त्यांच्या शेतात पाणी पोहोचले नसल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात सोनल प्रकल्पाचे प्रभारी शाखा अभियंता अनिल डांगे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतू, त्यांनी कॉल रिसीव्ह केला नसल्याने संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :washimवाशिमDamधरणFarmerशेतकरीagricultureशेती