शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

कर्जमुक्तीपासून भर येथील शेतकरी वंचित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 17:29 IST

परिणामी, खरिप हंगामात नवीन पीककर्ज मिळणेही अशक्य झाले आ

लोकमत न्यूज नेटवर्कभर जहॉगीर (वाशिम) : भर जहॉगीर परिसरातील अनेक शेतकरी महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहिले आहेत. आधार प्रमाणिकरण अपूर्ण असल्याने थकित कर्ज दिसत आहे. परिणामी, खरिप हंगामात नवीन पीककर्ज मिळणेही अशक्य झाले आहे.शेतकºयांची आर्थिक परिस्थिती विचारात घेता महाआघाडी सरकारने दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ केले आहे. भर जहॉगीर परिसरातील अनेक शेतकºयांचे पीककर्जाचे पुनर्गठण परस्पर केल्याने तसेच त्यानंतर कर्ज हप्ते न भरल्याने या शेतकºयांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळू शकला नाही. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य उषा गरकळ, भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल गरकळ यांनी मध्यंतरी आंदोलनही केले होते. त्यानंतर देशभरात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्याने सर्व प्रक्रिया ठप्प झाली. २४ मार्चपासून लॉकडाउन व संचारबंदी असल्याने आधार प्रमाणिकरणही बंद झाले. परिसरातील अनेक शेतकरी पात्र असूनही कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहिले. कर्ज थकित दाखवित असल्याने कर्जमुक्तीचा सर्व खाते अडचणीत आले आहेत. खरिप हंगामाचा कालावघी जवळ येत असल्याने बियाणे, खते खरेदीसाठी शेतकºयांना पैशाची गरज भासत आहे. परंतू, कर्जमुक्तीचा लाभ नसल्याने नवीन कर्जही मिळणे कठीण झाले आहे. अगोदरच विविध कारणांमुळे शेतकरी संकटात सापडत आहेत. त्यात आता कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नसल्याने शेतकºयांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणेच जिल्हा मध्यवर्ती बँके्नचे अनेक शेतकºयांचे कर्ज थकित दाखवित आहे. शेतकºयांना दिलासा म्हणून कर्जमुक्तीचा लाभ द्यावा तसेच नवीन कर्ज तातडीने मंजूर करावे, अशी मागणी अल्पभूधारक शेतकरी गंगाधर काष्टे यांनी केली.

टॅग्स :washimवाशिमCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी