शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

किटकनाशक फवारणीच्या मार्गदर्शनाबाबत उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 15:31 IST

कृषी विभागाने जिल्हाभरात सोडाच इंझोरी येथेही भेट देऊन मार्गदर्शन करण्याची तसदी घेतली नाही, तर आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी इंझोरीत अशा प्रकारच्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी आला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी: किटकनाशकाच्या फवारणीमुळे इंझोरी येथील सहा मजुरांना विषबाधा झाल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली. या पृष्ठभुमीवर कृषी विभागाने जिल्हाभरात मार्गदर्शन मोहिम राबविणे आणि आरोग्य विभागाने इंझोरी येथे भेट देऊन पाहणी करणे गरजेचे होते; परंतु कृषी विभागाने जिल्हाभरात सोडाच इंझोरी येथेही भेट देऊन मार्गदर्शन करण्याची तसदी घेतली नाही, तर आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी इंझोरीत अशा प्रकारच्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी आला नाही.  इंझोरी शिवारात सध्या पिकांवरील किड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडून किटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे. आपले व परिवारांचे पोट भरण्याकरिता काही परिसरातील मजुर ठेका पध्दतीने ही कामे घेऊन ती कामे लवकर संपविण्याच्या दृष्टीने रात्रंदिवस काबाड कष्ट करीत आहेत. या मजुरापैकी सहा मजुरांना थकवा, उलटी, जेवण पाणी न पचणे आदिचा त्रास जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर फवारणीचे किटनाशक औषध शरीरात गेल्याने विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामध्ये नंदु श्रीकृष्ण काळेकर (२५), अश्विन दिलीप तायडे (२८), गोलु चंद्रभान लायबर (३०), कृष्णा पुंडलीक दिघडे (४०), चंदाबाई संजय दिघडे (४०) व जामदरा येथील गणेश धुरट (३५), या मजुरांचा समावेश आहे. यापैकी अश्विन तायडे, गोलु लायबर, व गणेश धुरट यांच्यावर अकोला व यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. सहापैकी तीन मजुरांना चार दिवसांपूर्वीच रुग्णालयातून सुटीही देण्यात आली. त्यांची प्रकृतीही चांगली आहे. त्यानंतर दिलिप तायडे वगळता इतर दोघांच्या प्रकृतीतही सुधारणा झाली. अद्याप येथील काही मजुरांच्या ठेका पध्दतीने फवारणी सुरु असून, कदाचीत आणखी काही रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह व कृषी विभागाने इंझोरी जिल्हाभरात फवारणीकरिता मार्गदर्शन करणे अपेक्षीत होते; परंतु चार दिवस उलटले तरी, कृषी विभागाची मार्गदर्शन मोहीम व्यापक झाली नाही इंझोरीतही या दोन्ही विभागाचा कर्मचारी चार दिवसांतही आला नाही.

इंझोरी येथील कृषी सहाय्यक आणि मंडळ कृषी अधिकारी हे नियमित गावांना भेटी देत असून, त्यांनी याबाबत मार्गदर्शनही केले आहे. याबाबत कृषी विभाग सजग आहे. त्यातच विषबाधा झाल्याची कोणतीही तक्रार मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडे आली नाही. तथापि, शनिवारी सकाळी येथे मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येईल.-सचिन कांबळे,तालुका कृषी अधिकारी, मानोरा

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी