शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे ‘भीक मांगाे’ आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:27 IST

मागील पाच वर्षांपासून सतत शेतकऱ्यांवर कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटाचा कहर होत आहे. शेतकऱ्यांच्या नावाने योजना काढायच्या नंतर ...

मागील पाच वर्षांपासून सतत शेतकऱ्यांवर कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटाचा कहर होत आहे. शेतकऱ्यांच्या नावाने योजना काढायच्या नंतर त्यात निकषांचे पिल्लू सोडून मोकळे व्हायचे, अशी फसवणूक करणारी पंतप्रधान पीकविमा योजनेच्या माध्यमातून सन २०१९-२० मध्ये कापसावर बोंडाळी तर सोयाबीन काढणीच्यावेळी अतिवृष्टीने झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले उभे पिकाचे नुकसान झाले. पीकविमा न मिळाल्याने शेतकऱ्यांमधे असंतोष निर्माण आहे. याच अन्यायाविरुध्द मानोरा येथे बुधवार, २१ जुलै रोजी परिवर्तन शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते मनोहर राठोड यांच्या नेतृत्वात भीक मांगो मोर्चा काढण्यात येत आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महत संजय महाराज, तांडा सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा, महत रमेश महाराज, समाज प्रबोधनकार पंकजपाल महाराज यांची या मोर्चात उपस्थिती राहणार आहे.

याबाबत तहसीलदार यांना निवेदनही देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी माेर्चात सहभागी हाेण्याचे आवाहन परिवर्तन शेतकरी संघटनेसह बंजारा क्रांती दलाचे डॉ. श्याम गव्हाणे, कर्मचारी संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रा.अनिल चव्हाण, शिवसग्राम सघटनेचे किशोर नाईक, वसंतराव नाईक मित्र मंडळाचे नितीन राठोड, विशाल राठोड, महेश राठोड,धनगर समाज संघटनेचे श्याम डोळस, बंजारा क्रांती दलाचे तालुका सचिन गोपीचंद चव्हाण, बाळा ऊर्फ विजय चव्हाण, पंजाब चव्हाण यांनी केले आहे.