शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

न उगवलेल्या बियाण्यांच्या अहवालाची शेतकऱ्यांना प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 11:25 IST

समित्यांच्या पंचनाम्यांचा अहवाल शेतकऱ्यांना देणे बंधनकारक असतानाही त्यांना अद्याप अहवाल मिळालेला नाही.

वाशिम: जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या ४३३४ तक्रारी कृषी विभागाच्या तालुकास्तर समित्यांकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीनुसार संबंधित शेतकºयाच्या शेताला भेट देऊन पंचनामेही करण्यात आले; तथापि, दोन महिने उलटले तरी, तालुकास्तरीय समित्यांच्या पंचनाम्यांचा अहवाल शेतकऱ्यांना देणे बंधनकारक असतानाही त्यांना अद्याप अहवाल मिळालेला नाही.यंदाच्या हंगामात बियाणे न उगवल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. शासनाच्या निर्देशानुसार शेतकºयांना तातडीने बियाणे बदलून देण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी तालुकास्तरावर समित्यांची नियुक्ती केली आहे. या समितीत तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांसह कृषी विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांचाही समावेश आहे. या समित्या न उगवलेल्या बियाण्यांची पाहणी करून शेतकºयाचे नाव, गट क्रमांक, पेरलेल्या बियाण्यांची मात्रा, बियाणे न उगवण्याचे कारण आदि बाबींचा समावेश असलेला अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल संबंधित बियाणे उत्पादक कंपनीसह नुकसानग्रस्त शेतकºयांनाही द्यावा लागणार आहे. यात बियाणे सदोष असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित कंपनी आणि शेतकºयांना त्यांच्या पातळीवर निर्णय घेता येणार आहे. तथापि, दोन महिने उलटले तरी, शेतकºयांना न उगवलेल्या बियाण्यांच्या पंचनाम्यांचे अहवाल अद्यापही प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे शेतकºयांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बियाणे सदोष असले तरच मिळणार अहवाल!जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या हजारो तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी बियाणे न उगवण्याची वेगवेगळी कारणेही आहेत. त्यामुळे बियाणे सदोष असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित कंपनी आणि शेतकºयांना त्यांच्या पातळीवर निर्णय घेता येणार आहे. अर्थात संबंधित कंपनीकडून नुकसान भरपाई घ्यावयाची की त्यांच्या विरोधात ग्राहक पंचायतमध्ये दाद मागायची, हे शेतकºयांना ठरविता येणार आहे. तथापि, काही सदोष बियाण्यांचे अहवाल अप्राप्त आहेत.

वाशिममधील प्रक्रिया पूर्ण४वाशिम तालुक्यात बियाणे न उगवल्याच्या केवळ ४८ तक्रारी झाल्या असून, यात सदोष बियाणे प्रकरणी एका कंपनीवर कारवाई झाली, तर काही शेतकºयांना अहलवाही देण्यात आले आहेत.

न उगवलेल्या बियाण्यांच्या पंचनाम्यांचे अहवाल तालुकास्तर समित्यांकडून शेतकºयांना देण्यात येत आहेत. ज्या शेतकºयांनी पेरलेले बियाणे सदोष आढळून आले. त्यांना हा अहवाल देण्यात येत असून, ही प्रक्रिया सुरू आहे. तथापि, ज्या शेतकºयांनी पेरलेल्या बियाण्यांत दोष आढळून आला आहे. त्यांनाच हा अहवाल मिळणार असून, इतर कारणांसाठी अहवाल देता येणार नाही. .- एम. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी