शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

न उगवलेल्या बियाण्यांच्या अहवालाची शेतकऱ्यांना प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 11:25 IST

समित्यांच्या पंचनाम्यांचा अहवाल शेतकऱ्यांना देणे बंधनकारक असतानाही त्यांना अद्याप अहवाल मिळालेला नाही.

वाशिम: जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या ४३३४ तक्रारी कृषी विभागाच्या तालुकास्तर समित्यांकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीनुसार संबंधित शेतकºयाच्या शेताला भेट देऊन पंचनामेही करण्यात आले; तथापि, दोन महिने उलटले तरी, तालुकास्तरीय समित्यांच्या पंचनाम्यांचा अहवाल शेतकऱ्यांना देणे बंधनकारक असतानाही त्यांना अद्याप अहवाल मिळालेला नाही.यंदाच्या हंगामात बियाणे न उगवल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. शासनाच्या निर्देशानुसार शेतकºयांना तातडीने बियाणे बदलून देण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी तालुकास्तरावर समित्यांची नियुक्ती केली आहे. या समितीत तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांसह कृषी विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांचाही समावेश आहे. या समित्या न उगवलेल्या बियाण्यांची पाहणी करून शेतकºयाचे नाव, गट क्रमांक, पेरलेल्या बियाण्यांची मात्रा, बियाणे न उगवण्याचे कारण आदि बाबींचा समावेश असलेला अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल संबंधित बियाणे उत्पादक कंपनीसह नुकसानग्रस्त शेतकºयांनाही द्यावा लागणार आहे. यात बियाणे सदोष असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित कंपनी आणि शेतकºयांना त्यांच्या पातळीवर निर्णय घेता येणार आहे. तथापि, दोन महिने उलटले तरी, शेतकºयांना न उगवलेल्या बियाण्यांच्या पंचनाम्यांचे अहवाल अद्यापही प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे शेतकºयांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बियाणे सदोष असले तरच मिळणार अहवाल!जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या हजारो तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी बियाणे न उगवण्याची वेगवेगळी कारणेही आहेत. त्यामुळे बियाणे सदोष असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित कंपनी आणि शेतकºयांना त्यांच्या पातळीवर निर्णय घेता येणार आहे. अर्थात संबंधित कंपनीकडून नुकसान भरपाई घ्यावयाची की त्यांच्या विरोधात ग्राहक पंचायतमध्ये दाद मागायची, हे शेतकºयांना ठरविता येणार आहे. तथापि, काही सदोष बियाण्यांचे अहवाल अप्राप्त आहेत.

वाशिममधील प्रक्रिया पूर्ण४वाशिम तालुक्यात बियाणे न उगवल्याच्या केवळ ४८ तक्रारी झाल्या असून, यात सदोष बियाणे प्रकरणी एका कंपनीवर कारवाई झाली, तर काही शेतकºयांना अहलवाही देण्यात आले आहेत.

न उगवलेल्या बियाण्यांच्या पंचनाम्यांचे अहवाल तालुकास्तर समित्यांकडून शेतकºयांना देण्यात येत आहेत. ज्या शेतकºयांनी पेरलेले बियाणे सदोष आढळून आले. त्यांना हा अहवाल देण्यात येत असून, ही प्रक्रिया सुरू आहे. तथापि, ज्या शेतकºयांनी पेरलेल्या बियाण्यांत दोष आढळून आला आहे. त्यांनाच हा अहवाल मिळणार असून, इतर कारणांसाठी अहवाल देता येणार नाही. .- एम. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी