शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शेतकऱ्यांची महावितरण कार्यालयात धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 16:34 IST

महावितरण कार्यालयावर धडक देऊन उपविभागीय अभियंत्यांना निवेदन सादर करीत, ही समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी केली. 

लोकमत न्युज नेटवर्क पांगरी नवघरे (वाशिम) : सतत वीजेच्या लपंडावामुळे रब्बी पिके पाण्याअभावी संकटात सापडली आहेत. मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे परिसरातील बोरगाव वीज उपकेंद्रांतर्गत हा प्रकार घडत असल्याने त्रस्त झालेल्या शेतकºयांनी २६ जानेवारी रोजी रात्री १.३० वाजता मालेगाव महावितरण कार्यालयावर धडक देऊन उपविभागीय अभियंत्यांना निवेदन सादर करीत, ही समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी केली. मालेगाव तालुक्यातील अमानी येथील ३३ केव्ही वीज केंद्रांतर्गत येत असलेल्या बोरगाव वीज उपकेंद्रातून पांगरी नवघरेसह परिसरातील अनेक गावांना, तसेच कृषीपंपांना वीज पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून या वीज उपकेंद्रांतर्गत सातत्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. या उपकेंद्रातून आधीच शेतकºयांना दिवसाकाळी प्रत्येकी चार तासप्रमाणे दोन टप्प्यांत वीज पुरवठा केला जातो. सतत होत असलेल्या विजेच्या लपंडावामुळे शेतकºयांना चार तासांऐवजी केवळ दीड तास वीज मिळत आहे. त्यामुळे ऐन बहरलेली रब्बीची पिके पाण्याअभावी संकटात सापडल्याने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.  एखादवेळी रात्री पिकांना पाणी देत असतानाच वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर शेतकरी संबंधित लाईनमन अथवा वीज उपकेंद्रातील कर्मचाºयांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून माहिती दिल्यास. तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडीत झाला असून, रात्रभर तो सुरळीत होऊ शकणार नसल्याचे सांगण्यात येते.  अशा परिस्थितीमध्ये नेमके करायचे तरी काय, असा प्रश्न शेतकºयांपुढे उभा ठाकत आहे. या प्रकाराला कंटाळून गेलेल्या अमानी व बोरगाव परिसरातील शेतकºयांनी २६ जानेवारी रोजी सकाळी १.३० वाजताच्या सुमारास थेट महावितरणच्या मालेगाव कार्यालयात धडक देत  प्रत्यक्ष वीज पुरवठा सुरळीत आहे की नाही याची पाहणी केली व तसेच उपविभागीय अभियंता जिवनानी यांना निवेदन देऊन शेतातील वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली. 

 प्रकल्पात काठोकाठ पाणी असतानाही फायदा नाहीया परिसरातील शेतकºयांच्या सिंचनासाठी उभारलेल्या कोल्ही प्रकल्पात ८० टक्क्यांच्यावर जलसाठा असताना आणि मोठ्या प्रमाणात रब्बीची पेरणी झाली असतानाही शेतकºयांना अनियमित वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. परिणमी रब्बीची पिके संकटात सापडली असून, महावितरणच्या या कारभाराबाबत शेतकरीवर्गात प्रचंड रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार संबंधितांना सुचना देऊन, मागणी करून आणि विनंती करूनही दखल घेण्यात येत नसल्यानेच अमानी व बोरगाव परिसरातील जवळपास ४० शेतकºयांनी महावितरणच्या मालेगाव येथील कार्यालयात धडक देऊन उपविभागीय अभियंत्यांपुढे आपली समस्या मांडली.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीmahavitaranमहावितरण