शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

शेतकऱ्यांची महावितरण कार्यालयात धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 16:34 IST

महावितरण कार्यालयावर धडक देऊन उपविभागीय अभियंत्यांना निवेदन सादर करीत, ही समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी केली. 

लोकमत न्युज नेटवर्क पांगरी नवघरे (वाशिम) : सतत वीजेच्या लपंडावामुळे रब्बी पिके पाण्याअभावी संकटात सापडली आहेत. मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे परिसरातील बोरगाव वीज उपकेंद्रांतर्गत हा प्रकार घडत असल्याने त्रस्त झालेल्या शेतकºयांनी २६ जानेवारी रोजी रात्री १.३० वाजता मालेगाव महावितरण कार्यालयावर धडक देऊन उपविभागीय अभियंत्यांना निवेदन सादर करीत, ही समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी केली. मालेगाव तालुक्यातील अमानी येथील ३३ केव्ही वीज केंद्रांतर्गत येत असलेल्या बोरगाव वीज उपकेंद्रातून पांगरी नवघरेसह परिसरातील अनेक गावांना, तसेच कृषीपंपांना वीज पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून या वीज उपकेंद्रांतर्गत सातत्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. या उपकेंद्रातून आधीच शेतकºयांना दिवसाकाळी प्रत्येकी चार तासप्रमाणे दोन टप्प्यांत वीज पुरवठा केला जातो. सतत होत असलेल्या विजेच्या लपंडावामुळे शेतकºयांना चार तासांऐवजी केवळ दीड तास वीज मिळत आहे. त्यामुळे ऐन बहरलेली रब्बीची पिके पाण्याअभावी संकटात सापडल्याने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.  एखादवेळी रात्री पिकांना पाणी देत असतानाच वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर शेतकरी संबंधित लाईनमन अथवा वीज उपकेंद्रातील कर्मचाºयांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून माहिती दिल्यास. तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडीत झाला असून, रात्रभर तो सुरळीत होऊ शकणार नसल्याचे सांगण्यात येते.  अशा परिस्थितीमध्ये नेमके करायचे तरी काय, असा प्रश्न शेतकºयांपुढे उभा ठाकत आहे. या प्रकाराला कंटाळून गेलेल्या अमानी व बोरगाव परिसरातील शेतकºयांनी २६ जानेवारी रोजी सकाळी १.३० वाजताच्या सुमारास थेट महावितरणच्या मालेगाव कार्यालयात धडक देत  प्रत्यक्ष वीज पुरवठा सुरळीत आहे की नाही याची पाहणी केली व तसेच उपविभागीय अभियंता जिवनानी यांना निवेदन देऊन शेतातील वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली. 

 प्रकल्पात काठोकाठ पाणी असतानाही फायदा नाहीया परिसरातील शेतकºयांच्या सिंचनासाठी उभारलेल्या कोल्ही प्रकल्पात ८० टक्क्यांच्यावर जलसाठा असताना आणि मोठ्या प्रमाणात रब्बीची पेरणी झाली असतानाही शेतकºयांना अनियमित वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. परिणमी रब्बीची पिके संकटात सापडली असून, महावितरणच्या या कारभाराबाबत शेतकरीवर्गात प्रचंड रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार संबंधितांना सुचना देऊन, मागणी करून आणि विनंती करूनही दखल घेण्यात येत नसल्यानेच अमानी व बोरगाव परिसरातील जवळपास ४० शेतकºयांनी महावितरणच्या मालेगाव येथील कार्यालयात धडक देऊन उपविभागीय अभियंत्यांपुढे आपली समस्या मांडली.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीmahavitaranमहावितरण