शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

बियाण्यांच्या वजनमापातील घोळप्रकरणी शेतकरी आक्रमक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 18:59 IST

वाशिम : खरीप हंगामात बी-बियाणे, खते खरेदी करताना वजनमापात फसवणूक होत असल्याने याप्रकरणी फसवणूक करणाºया सर्वांविरूद्ध गुन्हे दाखल करावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांच्यासह शेतकºयांनी २० जून रोजी केली. 

ठळक मुद्देखते व बियाणे खरेदी करताना संबंधित बॅगचे वजन कमी भरत असल्याच्या तक्रारी शेतकºयांनी सुरूवातीपासूनच केल्या होत्या.वजनमापात फसवणूक करून शेतकºयांची लूट करणाºयांविरूद्ध गुन्हे दाखल करावे, अशी मागणी गवळी यांच्यासह शेतकºयांनी केली.

वाशिम : खरीप हंगामात बी-बियाणे, खते खरेदी करताना वजनमापात फसवणूक होत असल्याने याप्रकरणी फसवणूक करणाºया सर्वांविरूद्ध गुन्हे दाखल करावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांच्यासह शेतकºयांनी २० जून रोजी केली. खते व बियाणे खरेदी करताना संबंधित बॅगचे वजन कमी भरत असल्याच्या तक्रारी शेतकºयांनी सुरूवातीपासूनच केल्या होत्या. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या सभेतही जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी, हेमेंद्र ठाकरे, उस्मान गारवे आदींनी प्रश्न उपस्थित केला होता. या पृष्ठभूमीवर कृषी सेवा केंद्रांतून बियाणे व खते वजमकाटा करून मोजून द्यावी, असे निर्देश कृषी विभागाने दिले होते. तथापि, कृषी विभागाचे निर्देश धाब्यावर बसवून शेतकºयांना बियाणे व खते मोजून दिली जात नाहीत. ही बाब ‘लोकमत’ने १८ जून रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्येही उघडकीस आली होती. मागणी करूनही बियाण्यांच्या बॅग मोजून न देण्यामागे मोठे ‘अर्थ’कारण दडल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला. दरम्यान, १९ जून रोजी १९ जून रोजी मालेगाव तालुक्यातील एकांबा येथील शेतकरी गजानन गवळी यांनी खरेदी केलेल्या महाबिजच्या बियाणे बॅगचे वजन केले असता, ते एक किलोपेक्षा अधिक प्रमाणात कमी भरले. तसेच एका बॅगमधील बियाणे बोगस असल्याची शंका आल्याने संबंधितांनी हा प्रकार कृषी विकास अधिकारी नरेंद्र बारापात्रे यांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यावरून कृषी विभागाच्या चमूनेतपासणी केली असता,  बियाण्यांच्या काही बॅगचे वजन निर्धारित वजनापेक्षा कमी आढळून आले. याप्रकरणी कारवाईही प्रस्तावित केली. वाशिम जिल्ह्यात महाबिजचे जवळपास ५० हजार क्विंटलच्या आसपास बियाणे विक्रीसाठी असून, काही बियाणे बॅगचे वजन निर्धारित वजनापेक्षा कमी भरत असल्याने सर्व बॅगचे वजन करूनच शेतकºयांना विक्री करावी, वजनमापात फसवणूक करून शेतकºयांची लूट करणाºयांविरूद्ध गुन्हे दाखल करावे, अशी मागणी गवळी यांच्यासह शेतकºयांनी केली.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी