शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

पंचनाम्यासाठी शेतकरी आक्रमक; माहुली, बेलोरा येथे रास्ता रोको

By संदीप वानखेडे | Updated: July 23, 2023 14:23 IST

मानोरा तालुक्यात गत तीन दिवसांपासून संततधार पाऊस झाल्याने शेतात पाणीच पाणी दिसून येते.

वाशिम : सुरूवातीला मान्सून लांबल्याने पेरणीस विलंब झाला आणि आता अतिवृष्टीमुळे पिकांसह शेतीचे अतोनात नुकसान झाले. दुसरीकडे २३ जुलै रोजी सकाळी १० वाजेपर्यंतही नुकसानग्रस्त भागात पंचनाम्यासाठी अधिकारी, कर्मचारी आले नसल्याचे पाहून मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत माहुली व बेलोरा येथे रास्ता रोको आंदोलन केले.

मानोरा तालुक्यात गत तीन दिवसांपासून संततधार पाऊस झाल्याने शेतात पाणीच पाणी दिसून येते. २२ जुलै रोजी अतिवृष्टी झाल्याने नदी, नाल्याला पूर आला. पुराचे पाणी नदी-नाल्या काठच्या शेतात गेल्याने जमिन खरडून गेली, पिके जमिनदोस्त झाली, काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले तर काही नागरिकांच्या घराच्या भिंती पडल्या. नैसर्गिक आपत्तीत सापडल्याने २३ जुलैला सकाळपासूनच प्रशासकीय यंत्रणेकडून पंचनाम्याला सुरूवात होईल, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते. मात्र, सकाळी १० वाजेपर्यंतही तालुका प्रशासनातील कोणताही अधिकारी पाहणी करण्यासाठी आला नाही. अगोदरच नैसर्गिक आपत्तीमुळे होत्याचे नव्हते झाले आणि प्रशासकीय यंत्रणेकडूनही पंचनाम्यास विलंब होत असल्याचे पाहून मानोरा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा संयमाचा बांध फुटला.

माहुली परिसरातील शेतकऱ्यांनी माहुली येथे तर बेलोरा परिसरातील शेतकऱ्यांनी बेलोरा येथे रास्ता रोको आंदोलन केले. काही वेळ दिग्रस ते मानोरा रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहून तातडीने प्रशासन जागे झाले आणि महसूल व कृषी विभागातील अधिकारी माहुली व बेलोरा येथे पोहचले. नायब तहसीलदार जी.एम.राठोड, तालुका कृषी अधिकारी उमेश राठोड, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुचेकर, मंडळ अधिकारी, कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक आदी हजर झाले. पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने सकाळी ११:३० वाजदरम्यान रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Farmerशेतकरीwashimवाशिम