शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

पंचनाम्यासाठी शेतकरी आक्रमक; माहुली, बेलोरा येथे रास्ता रोको

By संदीप वानखेडे | Updated: July 23, 2023 14:23 IST

मानोरा तालुक्यात गत तीन दिवसांपासून संततधार पाऊस झाल्याने शेतात पाणीच पाणी दिसून येते.

वाशिम : सुरूवातीला मान्सून लांबल्याने पेरणीस विलंब झाला आणि आता अतिवृष्टीमुळे पिकांसह शेतीचे अतोनात नुकसान झाले. दुसरीकडे २३ जुलै रोजी सकाळी १० वाजेपर्यंतही नुकसानग्रस्त भागात पंचनाम्यासाठी अधिकारी, कर्मचारी आले नसल्याचे पाहून मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत माहुली व बेलोरा येथे रास्ता रोको आंदोलन केले.

मानोरा तालुक्यात गत तीन दिवसांपासून संततधार पाऊस झाल्याने शेतात पाणीच पाणी दिसून येते. २२ जुलै रोजी अतिवृष्टी झाल्याने नदी, नाल्याला पूर आला. पुराचे पाणी नदी-नाल्या काठच्या शेतात गेल्याने जमिन खरडून गेली, पिके जमिनदोस्त झाली, काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले तर काही नागरिकांच्या घराच्या भिंती पडल्या. नैसर्गिक आपत्तीत सापडल्याने २३ जुलैला सकाळपासूनच प्रशासकीय यंत्रणेकडून पंचनाम्याला सुरूवात होईल, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते. मात्र, सकाळी १० वाजेपर्यंतही तालुका प्रशासनातील कोणताही अधिकारी पाहणी करण्यासाठी आला नाही. अगोदरच नैसर्गिक आपत्तीमुळे होत्याचे नव्हते झाले आणि प्रशासकीय यंत्रणेकडूनही पंचनाम्यास विलंब होत असल्याचे पाहून मानोरा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा संयमाचा बांध फुटला.

माहुली परिसरातील शेतकऱ्यांनी माहुली येथे तर बेलोरा परिसरातील शेतकऱ्यांनी बेलोरा येथे रास्ता रोको आंदोलन केले. काही वेळ दिग्रस ते मानोरा रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहून तातडीने प्रशासन जागे झाले आणि महसूल व कृषी विभागातील अधिकारी माहुली व बेलोरा येथे पोहचले. नायब तहसीलदार जी.एम.राठोड, तालुका कृषी अधिकारी उमेश राठोड, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुचेकर, मंडळ अधिकारी, कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक आदी हजर झाले. पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने सकाळी ११:३० वाजदरम्यान रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Farmerशेतकरीwashimवाशिम