शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

खरीपासाठी शेतकऱ्यांची राखीव शेतमाल विक्रीची घाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 16:40 IST

बियाणे, खते खरेदी करता यावीत म्हणून शेतकºयांनी शिल्लक ठेवलेला शेतमाल विकण्याची लगबग सुरू केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: खरीपाच्या पेरणीची तयारी शेतकरी करीत आहेत. दमदार पावसानंतर पेरणीला सुरूवात होणार असून, यासाठी बियाणे, खते खरेदी करता यावीत म्हणून शेतकºयांनी शिल्लक ठेवलेला शेतमाल विकण्याची लगबग सुरू केली आहे. त्यात शेतमालाच्या दरात तेजी आल्याने शेतकºयांना थोडा फायदाही होत आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील जिल्ह्यातील बाजार समित्यांत शेतमालाची आवक वाढल्याचे दिसत आहे.गतवर्षी जिल्ह्यातील शेतकºयांना पुन्हा निसर्गाच्या अनियमिततेचा फटका बसला. सुरुवातीच्या चांगल्या पावसानंतर पडलेला खंड, तर आॅगस्टमधील अतिवृष्टी आणि पावसाची घटलेली सरासरी यामुळे सर्वच पिकांच्या उत्पादनावर काही प्रमाणात परिणाम झाला. त्यात हंगाम संपेपर्यंतही बाजारात शेतमालास अपेक्षीत भाव मिळालेच नाहीत. काही शेतकºयांनी घेणीदेणी, कर्ज, तसेच इतर आवश्यक कामांसाठी शेतमाल विकलाही; परंतु खरीप हंगामाच्या तयारीत पैशांची अडचण भासू नये म्हणून काही शेतकºयांनी शेतमाल घरी साठवूनही ठेवला होता. आता यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्यात १५०० कोटींच्या पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट असताना बँका पीक कर्ज वितरणात उदासीन असून, अद्याप २० टक्केही कर्जाचे वितरण जिल्ह्यात झालेले नाही. त्यामुळे अडचणीत आलेले शेतकरी घरात ठेवलेला शेतमाल विकून बियाणे, खते खरेदी करीत आहेत. यामुळे बाजारात शेतमालाची आवक वाढली असून, शेतमालाच्या दरातही थोडी तेजी आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांत तुरीला सरासरी प्रति क्विंटल ६ हजार, सोयाबीनला सरासरी ३७००, मुगाला सरासरी ५६००, उडिदाला ४५००, तर हरभºयाला ४४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंतचे दर मिळत आहेत. अर्थात बियाणे विक्रीच्या वेळेतील ही तेजी असली तरी गरजवंत शेतकºयांना त्याचा फायदा होत असल्याने बाजार समित्यांत शेतमालाची आवक वाढल्याचे चित्रही दिसत आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीMarket committee washimबाजार समिती वाशिम