शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

खरीपासाठी शेतकऱ्यांची राखीव शेतमाल विक्रीची घाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 16:40 IST

बियाणे, खते खरेदी करता यावीत म्हणून शेतकºयांनी शिल्लक ठेवलेला शेतमाल विकण्याची लगबग सुरू केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: खरीपाच्या पेरणीची तयारी शेतकरी करीत आहेत. दमदार पावसानंतर पेरणीला सुरूवात होणार असून, यासाठी बियाणे, खते खरेदी करता यावीत म्हणून शेतकºयांनी शिल्लक ठेवलेला शेतमाल विकण्याची लगबग सुरू केली आहे. त्यात शेतमालाच्या दरात तेजी आल्याने शेतकºयांना थोडा फायदाही होत आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील जिल्ह्यातील बाजार समित्यांत शेतमालाची आवक वाढल्याचे दिसत आहे.गतवर्षी जिल्ह्यातील शेतकºयांना पुन्हा निसर्गाच्या अनियमिततेचा फटका बसला. सुरुवातीच्या चांगल्या पावसानंतर पडलेला खंड, तर आॅगस्टमधील अतिवृष्टी आणि पावसाची घटलेली सरासरी यामुळे सर्वच पिकांच्या उत्पादनावर काही प्रमाणात परिणाम झाला. त्यात हंगाम संपेपर्यंतही बाजारात शेतमालास अपेक्षीत भाव मिळालेच नाहीत. काही शेतकºयांनी घेणीदेणी, कर्ज, तसेच इतर आवश्यक कामांसाठी शेतमाल विकलाही; परंतु खरीप हंगामाच्या तयारीत पैशांची अडचण भासू नये म्हणून काही शेतकºयांनी शेतमाल घरी साठवूनही ठेवला होता. आता यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्यात १५०० कोटींच्या पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट असताना बँका पीक कर्ज वितरणात उदासीन असून, अद्याप २० टक्केही कर्जाचे वितरण जिल्ह्यात झालेले नाही. त्यामुळे अडचणीत आलेले शेतकरी घरात ठेवलेला शेतमाल विकून बियाणे, खते खरेदी करीत आहेत. यामुळे बाजारात शेतमालाची आवक वाढली असून, शेतमालाच्या दरातही थोडी तेजी आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांत तुरीला सरासरी प्रति क्विंटल ६ हजार, सोयाबीनला सरासरी ३७००, मुगाला सरासरी ५६००, उडिदाला ४५००, तर हरभºयाला ४४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंतचे दर मिळत आहेत. अर्थात बियाणे विक्रीच्या वेळेतील ही तेजी असली तरी गरजवंत शेतकºयांना त्याचा फायदा होत असल्याने बाजार समित्यांत शेतमालाची आवक वाढल्याचे चित्रही दिसत आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीMarket committee washimबाजार समिती वाशिम