शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

मुग, उडिदाच्या बियाण्यांकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 14:52 IST

वाशिम: यंदा मान्सून लांबणीवर पडल्याने मुग आणि उडिद या पिकांच्या पेरणीची वेळ जवळपास निघून गेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदा मान्सून लांबणीवर पडल्याने मुग आणि उडिद या पिकांच्या पेरणीची वेळ जवळपास निघून गेली आहे. आता या पिकांची पेरणी अंगलट येण्याची भिती असल्याने शेतकरी या पिकांच्या बियाण्यांकडे पाठ करीत असल्याचे चित्र पश्चिम वºहाडात पाहायला मिळत आहे. त्यामुळे कमी धोक्याचे पीक असलेल्या सोयाबीनच्या क्षेत्रात यंदा अधिकच वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दरवर्षीच्या तुलनेत यंदा रत्तज्यात मान्सूनला मोठा विलंब झाला. त्यामुळेच जुन महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरू झाला तरी, खरीपाच्या पेरणीला सुरुवात झाली नाही. प्रत्यक्षात मान्सूनपूर्व पावसानंतरच खरीपाची पेरणी अनेक शेतकरी करतात; परंतु यंदा मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाणही नगण्य राहिले. त्यामुळे जमिनीत ओलावाही निर्माण झाला नाही. आता खरिपातील कमी कालावधीचे पीक असलेल्या मुग आणि उडिदाच्या पेरणीची वेळ निघून जात आहे. शनिवारी राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला तरी, त्यामुळे जमिनीची धूप भरून निघणार नसून, पेरणीला त्यामुळे विलंब होणार आहे. त्यातच पश्चिम वºहाडात कोरडवाहू क्षेत्र अधिक असून, जमिनीचा स्तरही फारसा सुपिक नाही. त्यामुळे मुग आणि उडिदाची पेरणी करणे शेतकऱ्यांसाठी जोखमीचे ठरणार आहे. पेरणीनंतर पावसाने खंड दिल्यास पेरणी उलटेलच शिवाय दुबार पेरणीची संधीही राहणार नाही. त्यामुळे शेतकरी या पिकाच्या बियाण्यांची खरेदी करीत नसल्याचे चित्र दिसत आहे. या पिकांच्या तुलनेत कमी पावसातही तग धरणाºया सोयाबीन बियाण्यांच्या खरेदीवर शेतकºयांनी जोर दिला आहे. त्यात महाबीजने यंदा काही नवे वाण उपलब्ध केले आहे. या वाणांची खरेदी शेतकरी मोठ्या प्रमाणात करीत असल्याची माहिती कृषी सेवा केंद्रांकडून प्राप्त झाली आहे. यावरून यंदा मुग आणि उडिदाचे क्षेत्र कमी होऊ सोयाबीनचे क्षेत्र पूर्वीपेक्षाही अधिक वाढण्याची शक्यता आहे.

पाऊस लांबल्याने मुग आणि उडिदाची पेरणी खोळंबली आहे. त्यामुळे बियाणे खरेदीची घाई आम्ही केली नाही. मुगाची पेरणी जोखमीची ठरणार आहे; परंतु येत्या दोन चार दिवसांत दमदार पाऊस पडला, तर उडिदाची पेरणी करणे शक्य होईल.- अनिल राठोडशेतकरी इंझोरी (वाशिम)

यापूर्वीही कधीही मान्सूनला एवढा लिवंब झाला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबलेल्या आहेत. मुग आणि उडिदाची पेरणी लवकर होणे अपेक्षीत असते. कमी कालावधीची ही पिके शेतकºयांना आधार देणारी ठरतात. आता वेळ निघून जात असल्याने या पिकांची पेरणी करावी की नाही, हा प्रश्न पडला आहे.-दशरथ पवारशेतकरी, मंगरुळपीर (वाशिम)

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी