शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

अमरावती विभागात गळीताकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 15:09 IST

वाशिम: अमरावती विभागातील शेतकरी रब्बी हंगामातील गळीताबाबत उदासीन असून, यंदा सरासरी १९९१ हेक्टर क्षेत्रावर गळीताची पेरणी अपेक्षीत असताना पाचही जिल्ह्यात मिळून केवळ १७७ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिके अर्थात तेलबियांची पेरणी झाली आहे.

वाशिम: अमरावती विभागातील शेतकरी रब्बी हंगामातील गळीताबाबत उदासीन असून, यंदा सरासरी १९९१ हेक्टर क्षेत्रावर गळीताची पेरणी अपेक्षीत असताना पाचही जिल्ह्यात मिळून केवळ १७७ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिके अर्थात तेलबियांची पेरणी झाली आहे. नियोजित सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ९ टक्के आहे. वन्यप्राण्यांचा उपद्रव, तसेच नगण्य भाव यामुळे या पिकांकडे शेतकºयांनी पाठ केली आहे.अमरावती विभागात पूर्वी सूर्यफुल, करडई, तीळ, कराळ, हिवाळी भुईमुगाचे क्षेत्र लक्षणीय होते; परंतु गत काही वर्षांत या पिकांच्या पेºयात सतत घट होत असून, गेल्या पाच, सहा वर्षांत या पिकांकडे शेतकºयांनी पूर्णपणे पाठच केल्याचे दिसत आहे. सुर्यफुल, तिळ या पिकांना फारशी पाण्याची गरज नसते. तथापि, विपरित वातावरणाचा फटका या पिकांना बसतो, तसेच वन्यप्राणी आणि पक्ष्यांकडून या पिकांची मोठी नासाडी होते. त्यातच उत्पादन झाल्यानंतर बाजारात अपेक्षीत दर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी या पिकाकडे पाठ करीत आहेत. गतवर्षी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात मिळून ८६०० हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी कृषी विभागाने नियोजित केली होती. प्रत्यक्षात केवळ २१०८ हेक्टर क्षेत्रावर या पिकांची पेरणी झाली होती. सरासरीच्या तुलनेत पेरणीचे प्रमाण केवळ २५ टक्के होते. यंदा विभागात समाधानकारक पाऊस पडला असताना केवळ १९९१ क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी अपेक्षीत होती. प्रत्यक्षात केवळ १७७ हेक्टर क्षेत्रावर या पिकांची पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ९ टक्के आहे. विशेष म्हणजे जवस आणि तीळ या पिकांचे क्षेत्र निरंक आहे. यंदा बुलडाणा जिल्ह्यात ७१ हेक्टर, अकोला जिल्ह्यात ४ हेक्टर, वाशिम जिल्ह्यात ३९ हेक्टर, तर यवतमाळ जिल्ह्यात ६३ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी झाली आहे.अमरावती जिल्हा निरंकविभागातील पाच जिल्हे मिळून एकूण १७७ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी झाली असली तरी, अमरावती जिल्ह्यात यंदा एका हेक्टर क्षेत्रातही गळीत पिकांची पेरणी झालेली नाही. गतवर्षी अमरावती जिल्ह्यात ४२०० हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी अपेक्षीत असताना केवळ ९४५ हेक्टर क्षेत्रावर या पिकांची पेरणी झाली होती, हे येथे उल्लेखनीय. गळीत पिकांच्या सतत घटणाºया पेºयामुळे शेतकरी या पिकांबाबत उदासीन असल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी