शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

अमरावती विभागात गळीताकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 15:09 IST

वाशिम: अमरावती विभागातील शेतकरी रब्बी हंगामातील गळीताबाबत उदासीन असून, यंदा सरासरी १९९१ हेक्टर क्षेत्रावर गळीताची पेरणी अपेक्षीत असताना पाचही जिल्ह्यात मिळून केवळ १७७ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिके अर्थात तेलबियांची पेरणी झाली आहे.

वाशिम: अमरावती विभागातील शेतकरी रब्बी हंगामातील गळीताबाबत उदासीन असून, यंदा सरासरी १९९१ हेक्टर क्षेत्रावर गळीताची पेरणी अपेक्षीत असताना पाचही जिल्ह्यात मिळून केवळ १७७ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिके अर्थात तेलबियांची पेरणी झाली आहे. नियोजित सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ९ टक्के आहे. वन्यप्राण्यांचा उपद्रव, तसेच नगण्य भाव यामुळे या पिकांकडे शेतकºयांनी पाठ केली आहे.अमरावती विभागात पूर्वी सूर्यफुल, करडई, तीळ, कराळ, हिवाळी भुईमुगाचे क्षेत्र लक्षणीय होते; परंतु गत काही वर्षांत या पिकांच्या पेºयात सतत घट होत असून, गेल्या पाच, सहा वर्षांत या पिकांकडे शेतकºयांनी पूर्णपणे पाठच केल्याचे दिसत आहे. सुर्यफुल, तिळ या पिकांना फारशी पाण्याची गरज नसते. तथापि, विपरित वातावरणाचा फटका या पिकांना बसतो, तसेच वन्यप्राणी आणि पक्ष्यांकडून या पिकांची मोठी नासाडी होते. त्यातच उत्पादन झाल्यानंतर बाजारात अपेक्षीत दर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी या पिकाकडे पाठ करीत आहेत. गतवर्षी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात मिळून ८६०० हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी कृषी विभागाने नियोजित केली होती. प्रत्यक्षात केवळ २१०८ हेक्टर क्षेत्रावर या पिकांची पेरणी झाली होती. सरासरीच्या तुलनेत पेरणीचे प्रमाण केवळ २५ टक्के होते. यंदा विभागात समाधानकारक पाऊस पडला असताना केवळ १९९१ क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी अपेक्षीत होती. प्रत्यक्षात केवळ १७७ हेक्टर क्षेत्रावर या पिकांची पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ९ टक्के आहे. विशेष म्हणजे जवस आणि तीळ या पिकांचे क्षेत्र निरंक आहे. यंदा बुलडाणा जिल्ह्यात ७१ हेक्टर, अकोला जिल्ह्यात ४ हेक्टर, वाशिम जिल्ह्यात ३९ हेक्टर, तर यवतमाळ जिल्ह्यात ६३ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी झाली आहे.अमरावती जिल्हा निरंकविभागातील पाच जिल्हे मिळून एकूण १७७ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी झाली असली तरी, अमरावती जिल्ह्यात यंदा एका हेक्टर क्षेत्रातही गळीत पिकांची पेरणी झालेली नाही. गतवर्षी अमरावती जिल्ह्यात ४२०० हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी अपेक्षीत असताना केवळ ९४५ हेक्टर क्षेत्रावर या पिकांची पेरणी झाली होती, हे येथे उल्लेखनीय. गळीत पिकांच्या सतत घटणाºया पेºयामुळे शेतकरी या पिकांबाबत उदासीन असल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी