शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अमरावती विभागात गळीताकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 15:09 IST

वाशिम: अमरावती विभागातील शेतकरी रब्बी हंगामातील गळीताबाबत उदासीन असून, यंदा सरासरी १९९१ हेक्टर क्षेत्रावर गळीताची पेरणी अपेक्षीत असताना पाचही जिल्ह्यात मिळून केवळ १७७ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिके अर्थात तेलबियांची पेरणी झाली आहे.

वाशिम: अमरावती विभागातील शेतकरी रब्बी हंगामातील गळीताबाबत उदासीन असून, यंदा सरासरी १९९१ हेक्टर क्षेत्रावर गळीताची पेरणी अपेक्षीत असताना पाचही जिल्ह्यात मिळून केवळ १७७ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिके अर्थात तेलबियांची पेरणी झाली आहे. नियोजित सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ९ टक्के आहे. वन्यप्राण्यांचा उपद्रव, तसेच नगण्य भाव यामुळे या पिकांकडे शेतकºयांनी पाठ केली आहे.अमरावती विभागात पूर्वी सूर्यफुल, करडई, तीळ, कराळ, हिवाळी भुईमुगाचे क्षेत्र लक्षणीय होते; परंतु गत काही वर्षांत या पिकांच्या पेºयात सतत घट होत असून, गेल्या पाच, सहा वर्षांत या पिकांकडे शेतकºयांनी पूर्णपणे पाठच केल्याचे दिसत आहे. सुर्यफुल, तिळ या पिकांना फारशी पाण्याची गरज नसते. तथापि, विपरित वातावरणाचा फटका या पिकांना बसतो, तसेच वन्यप्राणी आणि पक्ष्यांकडून या पिकांची मोठी नासाडी होते. त्यातच उत्पादन झाल्यानंतर बाजारात अपेक्षीत दर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी या पिकाकडे पाठ करीत आहेत. गतवर्षी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात मिळून ८६०० हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी कृषी विभागाने नियोजित केली होती. प्रत्यक्षात केवळ २१०८ हेक्टर क्षेत्रावर या पिकांची पेरणी झाली होती. सरासरीच्या तुलनेत पेरणीचे प्रमाण केवळ २५ टक्के होते. यंदा विभागात समाधानकारक पाऊस पडला असताना केवळ १९९१ क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी अपेक्षीत होती. प्रत्यक्षात केवळ १७७ हेक्टर क्षेत्रावर या पिकांची पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ९ टक्के आहे. विशेष म्हणजे जवस आणि तीळ या पिकांचे क्षेत्र निरंक आहे. यंदा बुलडाणा जिल्ह्यात ७१ हेक्टर, अकोला जिल्ह्यात ४ हेक्टर, वाशिम जिल्ह्यात ३९ हेक्टर, तर यवतमाळ जिल्ह्यात ६३ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी झाली आहे.अमरावती जिल्हा निरंकविभागातील पाच जिल्हे मिळून एकूण १७७ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी झाली असली तरी, अमरावती जिल्ह्यात यंदा एका हेक्टर क्षेत्रातही गळीत पिकांची पेरणी झालेली नाही. गतवर्षी अमरावती जिल्ह्यात ४२०० हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी अपेक्षीत असताना केवळ ९४५ हेक्टर क्षेत्रावर या पिकांची पेरणी झाली होती, हे येथे उल्लेखनीय. गळीत पिकांच्या सतत घटणाºया पेºयामुळे शेतकरी या पिकांबाबत उदासीन असल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी