शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

न उगवलेल्या बियाण्यांचा मिळणार मोबदला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 13:27 IST

जवळपास १३० पेक्षा अधिक बॅगमधील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार शेतकºयांनी तालुका कृषी अधिकाºयांकडे केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या खरीप हंगामात महाबीजचे १३० बॅग सोयाबीन बियाणे न उगवण्याचा प्रकार मानोरा तालुक्यात घडला होता. यामुळे शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. दरम्यान, ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित करुन महाबीजचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन जिल्हा समितीच्यावतीने सलग चार दिवस संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली. यासंदर्भातील प्राथमिक अहवाल महाबीजच्या वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात आला असून, अंतिम अहवालानंतर नेमका किती शेतकºयांंना मोबदला मिळू शकेल, हे निश्चित केले जाणार आहे.मानोरा तालुक्यातील इंझोरी परिसरात बहुतांश शेतकºयांनी प्रामुख्याने महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची यंदाच्या खरीप हंगामात पेरणी केली आहे. यातील काही शेतकºयांनी कृषी सेवा केंद्रांकडून जेएस ३३५, हे सोयाबीन वाण विकत घेतले होते. या वाणाच्या लॉट क्रमांक ५६९८ मधील बियाणे पेरणाºया शेतकºयांचे बियाणेच उगवले नसल्याने शेतकºयांना धक्का बसला. जवळपास १३० पेक्षा अधिक बॅगमधील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार शेतकºयांनी तालुका कृषी अधिकाºयांकडे केली. लोकमतने या संदर्भात वृत्त प्रकाशित करून कृषी विभागासह महागीज प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर लोकमतचे वृत्त आणि शेतकºयांच्या तक्रारीची दखल घेऊन महाबीजचे प्रतिनिधी, कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे अधिकारी यांचा समावेश असलेल्या ५ सदस्यीय पथकाने इंझोरी येथील शिवाराला भेट देऊन काही शेतकºयांच्या पेरणीची पाहणी सुरू केली. चार दिवस पेरणी झालेल्या शेतांची पाहणी केल्यानंतर महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापकांनी या प्रकाराचा प्राथमिक अहवाल त्यांच्या विभागीय कार्यालयाकडे सादर केला. या अहवालानुसार बियाणे न उगवल्याने शेतकºयांचे नुकसान झाल्याचे नमूद असल्याने शेतकºयांना मोबदला मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तथापि, शेतकºयांनी केवळ जेएस ३३५ या वाणाचीच पेरणी केली काय, पेरणी करताना आवश्यक काळजी घेतली काय, यासह ज्या कृषीसेवा केंद्रातून बियाणे विकत घेण्यात आले. त्या कृषीसेवा केंद्राकडीन विक्रीच्या नोंदीची पडताळणी करून अंतिम अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतरच किती शेतकºयांना आणि किती प्रमाणात मोबदला मिळेल, हे निश्चित होणार आहे. गणेशपूर (ता.मंगरूळपीर) येथील शेतकºयांनीही बियाणे न उगवल्याची तक्रार केली आहे.कृषी सेवा केंद्रांकडून घेतली माहितीइंझोरी शिवारात महाबीजचे सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारीनुसार शेतकºयांनी कोण्या कृषीसेवा केंद्रातून किती बियाणे घेतले, तसेच कोणत्या लॉटमधील बियाणे घेतले. याबाबत महाबीजच्या पथकाने माहिती घेतली आहे. आता या माहितीनुसार शेतकºयांच्या नुकसानाबाबतचा अंदाज काढण्यात येत असून, शेतकºयांनी जे वाण उगवले नाही, त्याच वाणाची पेरणी केली काय, हेसुद्धा कळणार असल्याचे महाबीजच्या अधिकाºयांनी सांगितले आहे. तथापि, शेतकºयांचे नुकसान झाले असेल, तर त्यांना पूर्ण मोबदला मिळेलच, असेही या अधिकाºयांनी सांगितले.आम्ही यंदाच्या खरीप हंगामात शेतात महाबीजचे जेएस ३३५ या सोयाबीन वाणाची पेरणी केली असून, पेरलेले बियाणे उगवलेच नाही. याबाबत तक्रार केल्यानंतर शेताची पाहणीही संबंधित पथकाकडून करण्यात आली. आता वस्तूस्थिती आणि नियमानुसार आम्हाला मोबदला लवकरात लवकर मिळावा, अशी अपेक्षा आहे.- गजानन ढोकशेतकरी इंझोरीइंझोरी शिवारातील शेतांना भेटी देऊन पाहणी करण्यात आली आहे. या संदर्भातील प्राथमिक अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करून प्रकाराची माहिती देण्यात आली. आता या संदर्भातील अंतिम अहवाल तयार करण्यात येत असून, सर्व पंचनामे आणि तांत्रिक माहितीनंतरच नेमके शेतकºयांचे किती नुकसान झाले ते निश्चित कळणार आहे.- डॉ. प्रशांत घावडेजिल्हा व्यवस्थापक महाबीज, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी