शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

न उगवलेल्या बियाण्यांचा मिळणार मोबदला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 13:27 IST

जवळपास १३० पेक्षा अधिक बॅगमधील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार शेतकºयांनी तालुका कृषी अधिकाºयांकडे केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या खरीप हंगामात महाबीजचे १३० बॅग सोयाबीन बियाणे न उगवण्याचा प्रकार मानोरा तालुक्यात घडला होता. यामुळे शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. दरम्यान, ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित करुन महाबीजचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन जिल्हा समितीच्यावतीने सलग चार दिवस संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली. यासंदर्भातील प्राथमिक अहवाल महाबीजच्या वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात आला असून, अंतिम अहवालानंतर नेमका किती शेतकºयांंना मोबदला मिळू शकेल, हे निश्चित केले जाणार आहे.मानोरा तालुक्यातील इंझोरी परिसरात बहुतांश शेतकºयांनी प्रामुख्याने महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची यंदाच्या खरीप हंगामात पेरणी केली आहे. यातील काही शेतकºयांनी कृषी सेवा केंद्रांकडून जेएस ३३५, हे सोयाबीन वाण विकत घेतले होते. या वाणाच्या लॉट क्रमांक ५६९८ मधील बियाणे पेरणाºया शेतकºयांचे बियाणेच उगवले नसल्याने शेतकºयांना धक्का बसला. जवळपास १३० पेक्षा अधिक बॅगमधील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार शेतकºयांनी तालुका कृषी अधिकाºयांकडे केली. लोकमतने या संदर्भात वृत्त प्रकाशित करून कृषी विभागासह महागीज प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर लोकमतचे वृत्त आणि शेतकºयांच्या तक्रारीची दखल घेऊन महाबीजचे प्रतिनिधी, कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे अधिकारी यांचा समावेश असलेल्या ५ सदस्यीय पथकाने इंझोरी येथील शिवाराला भेट देऊन काही शेतकºयांच्या पेरणीची पाहणी सुरू केली. चार दिवस पेरणी झालेल्या शेतांची पाहणी केल्यानंतर महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापकांनी या प्रकाराचा प्राथमिक अहवाल त्यांच्या विभागीय कार्यालयाकडे सादर केला. या अहवालानुसार बियाणे न उगवल्याने शेतकºयांचे नुकसान झाल्याचे नमूद असल्याने शेतकºयांना मोबदला मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तथापि, शेतकºयांनी केवळ जेएस ३३५ या वाणाचीच पेरणी केली काय, पेरणी करताना आवश्यक काळजी घेतली काय, यासह ज्या कृषीसेवा केंद्रातून बियाणे विकत घेण्यात आले. त्या कृषीसेवा केंद्राकडीन विक्रीच्या नोंदीची पडताळणी करून अंतिम अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतरच किती शेतकºयांना आणि किती प्रमाणात मोबदला मिळेल, हे निश्चित होणार आहे. गणेशपूर (ता.मंगरूळपीर) येथील शेतकºयांनीही बियाणे न उगवल्याची तक्रार केली आहे.कृषी सेवा केंद्रांकडून घेतली माहितीइंझोरी शिवारात महाबीजचे सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारीनुसार शेतकºयांनी कोण्या कृषीसेवा केंद्रातून किती बियाणे घेतले, तसेच कोणत्या लॉटमधील बियाणे घेतले. याबाबत महाबीजच्या पथकाने माहिती घेतली आहे. आता या माहितीनुसार शेतकºयांच्या नुकसानाबाबतचा अंदाज काढण्यात येत असून, शेतकºयांनी जे वाण उगवले नाही, त्याच वाणाची पेरणी केली काय, हेसुद्धा कळणार असल्याचे महाबीजच्या अधिकाºयांनी सांगितले आहे. तथापि, शेतकºयांचे नुकसान झाले असेल, तर त्यांना पूर्ण मोबदला मिळेलच, असेही या अधिकाºयांनी सांगितले.आम्ही यंदाच्या खरीप हंगामात शेतात महाबीजचे जेएस ३३५ या सोयाबीन वाणाची पेरणी केली असून, पेरलेले बियाणे उगवलेच नाही. याबाबत तक्रार केल्यानंतर शेताची पाहणीही संबंधित पथकाकडून करण्यात आली. आता वस्तूस्थिती आणि नियमानुसार आम्हाला मोबदला लवकरात लवकर मिळावा, अशी अपेक्षा आहे.- गजानन ढोकशेतकरी इंझोरीइंझोरी शिवारातील शेतांना भेटी देऊन पाहणी करण्यात आली आहे. या संदर्भातील प्राथमिक अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करून प्रकाराची माहिती देण्यात आली. आता या संदर्भातील अंतिम अहवाल तयार करण्यात येत असून, सर्व पंचनामे आणि तांत्रिक माहितीनंतरच नेमके शेतकºयांचे किती नुकसान झाले ते निश्चित कळणार आहे.- डॉ. प्रशांत घावडेजिल्हा व्यवस्थापक महाबीज, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी