शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

न उगवलेल्या बियाण्यांचा मिळणार मोबदला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 13:27 IST

जवळपास १३० पेक्षा अधिक बॅगमधील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार शेतकºयांनी तालुका कृषी अधिकाºयांकडे केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या खरीप हंगामात महाबीजचे १३० बॅग सोयाबीन बियाणे न उगवण्याचा प्रकार मानोरा तालुक्यात घडला होता. यामुळे शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. दरम्यान, ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित करुन महाबीजचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन जिल्हा समितीच्यावतीने सलग चार दिवस संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली. यासंदर्भातील प्राथमिक अहवाल महाबीजच्या वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात आला असून, अंतिम अहवालानंतर नेमका किती शेतकºयांंना मोबदला मिळू शकेल, हे निश्चित केले जाणार आहे.मानोरा तालुक्यातील इंझोरी परिसरात बहुतांश शेतकºयांनी प्रामुख्याने महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची यंदाच्या खरीप हंगामात पेरणी केली आहे. यातील काही शेतकºयांनी कृषी सेवा केंद्रांकडून जेएस ३३५, हे सोयाबीन वाण विकत घेतले होते. या वाणाच्या लॉट क्रमांक ५६९८ मधील बियाणे पेरणाºया शेतकºयांचे बियाणेच उगवले नसल्याने शेतकºयांना धक्का बसला. जवळपास १३० पेक्षा अधिक बॅगमधील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार शेतकºयांनी तालुका कृषी अधिकाºयांकडे केली. लोकमतने या संदर्भात वृत्त प्रकाशित करून कृषी विभागासह महागीज प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर लोकमतचे वृत्त आणि शेतकºयांच्या तक्रारीची दखल घेऊन महाबीजचे प्रतिनिधी, कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे अधिकारी यांचा समावेश असलेल्या ५ सदस्यीय पथकाने इंझोरी येथील शिवाराला भेट देऊन काही शेतकºयांच्या पेरणीची पाहणी सुरू केली. चार दिवस पेरणी झालेल्या शेतांची पाहणी केल्यानंतर महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापकांनी या प्रकाराचा प्राथमिक अहवाल त्यांच्या विभागीय कार्यालयाकडे सादर केला. या अहवालानुसार बियाणे न उगवल्याने शेतकºयांचे नुकसान झाल्याचे नमूद असल्याने शेतकºयांना मोबदला मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तथापि, शेतकºयांनी केवळ जेएस ३३५ या वाणाचीच पेरणी केली काय, पेरणी करताना आवश्यक काळजी घेतली काय, यासह ज्या कृषीसेवा केंद्रातून बियाणे विकत घेण्यात आले. त्या कृषीसेवा केंद्राकडीन विक्रीच्या नोंदीची पडताळणी करून अंतिम अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतरच किती शेतकºयांना आणि किती प्रमाणात मोबदला मिळेल, हे निश्चित होणार आहे. गणेशपूर (ता.मंगरूळपीर) येथील शेतकºयांनीही बियाणे न उगवल्याची तक्रार केली आहे.कृषी सेवा केंद्रांकडून घेतली माहितीइंझोरी शिवारात महाबीजचे सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारीनुसार शेतकºयांनी कोण्या कृषीसेवा केंद्रातून किती बियाणे घेतले, तसेच कोणत्या लॉटमधील बियाणे घेतले. याबाबत महाबीजच्या पथकाने माहिती घेतली आहे. आता या माहितीनुसार शेतकºयांच्या नुकसानाबाबतचा अंदाज काढण्यात येत असून, शेतकºयांनी जे वाण उगवले नाही, त्याच वाणाची पेरणी केली काय, हेसुद्धा कळणार असल्याचे महाबीजच्या अधिकाºयांनी सांगितले आहे. तथापि, शेतकºयांचे नुकसान झाले असेल, तर त्यांना पूर्ण मोबदला मिळेलच, असेही या अधिकाºयांनी सांगितले.आम्ही यंदाच्या खरीप हंगामात शेतात महाबीजचे जेएस ३३५ या सोयाबीन वाणाची पेरणी केली असून, पेरलेले बियाणे उगवलेच नाही. याबाबत तक्रार केल्यानंतर शेताची पाहणीही संबंधित पथकाकडून करण्यात आली. आता वस्तूस्थिती आणि नियमानुसार आम्हाला मोबदला लवकरात लवकर मिळावा, अशी अपेक्षा आहे.- गजानन ढोकशेतकरी इंझोरीइंझोरी शिवारातील शेतांना भेटी देऊन पाहणी करण्यात आली आहे. या संदर्भातील प्राथमिक अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करून प्रकाराची माहिती देण्यात आली. आता या संदर्भातील अंतिम अहवाल तयार करण्यात येत असून, सर्व पंचनामे आणि तांत्रिक माहितीनंतरच नेमके शेतकºयांचे किती नुकसान झाले ते निश्चित कळणार आहे.- डॉ. प्रशांत घावडेजिल्हा व्यवस्थापक महाबीज, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी