शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

मोठा बदल... आता शेतकरी कुटुंबातील दोघांना मिळणार विमा संरक्षण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 17:07 IST

राज्याच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत ३१ ऑगस्ट रोजी सुधारणा केली असून, यापुढे शेतकरी कुटुंबातील दोन सदस्यांना विमा संरक्षण मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : राज्याच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत ३१ ऑगस्ट रोजी सुधारणा केली असून, यापुढे शेतकरी कुटुंबातील दोन सदस्यांना विमा संरक्षण मिळणार आहे.

शेती व्यवसाय करीत असताना वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विद्युत धक्का आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना दिव्यांगत्वही होऊ शकते. अशा परिस्थितीत अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या पश्चात कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकºयाचे कुटुंब विमा छत्राखाली येत नसल्यामुळे त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा अपघाताने मृत्यू झाल्यास किंवा दिव्यांगत्व आल्यास विमा संरक्षण मिळत नाही. ही गैरसोय टाळण्यासाठी कृषी, पशुसंवर्धन विभागाने ३१ ऑगस्ट रोजी शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये बदल केला आहे. शेतकऱ्याच्या कुटुंबातील कर्त्या पुरूषाबरोबरच आणखी एका सदस्याला (जसे आई, वडील, पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) विमा संरक्षण मिळणार आहे.

कृषी गणना सन २०१५-१६ प्रमाणे निर्धारीत केलेल्या राज्यातील सुमारे १.५२ कोटी वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य असे एकूण दोन जणांकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत लाभ मिळणार आहे. अपघाती मृत्यू झाल्या दोन लाख रुपये, अपघातामुळे दोन डोळे किंवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा, एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. या सुधारीत योजनेची अंमलबजावणी सप्टेंबर महिन्यापासून सुरू झाली आहे.

(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी