शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मोठा बदल... आता शेतकरी कुटुंबातील दोघांना मिळणार विमा संरक्षण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 17:07 IST

राज्याच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत ३१ ऑगस्ट रोजी सुधारणा केली असून, यापुढे शेतकरी कुटुंबातील दोन सदस्यांना विमा संरक्षण मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : राज्याच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत ३१ ऑगस्ट रोजी सुधारणा केली असून, यापुढे शेतकरी कुटुंबातील दोन सदस्यांना विमा संरक्षण मिळणार आहे.

शेती व्यवसाय करीत असताना वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विद्युत धक्का आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना दिव्यांगत्वही होऊ शकते. अशा परिस्थितीत अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या पश्चात कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकºयाचे कुटुंब विमा छत्राखाली येत नसल्यामुळे त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा अपघाताने मृत्यू झाल्यास किंवा दिव्यांगत्व आल्यास विमा संरक्षण मिळत नाही. ही गैरसोय टाळण्यासाठी कृषी, पशुसंवर्धन विभागाने ३१ ऑगस्ट रोजी शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये बदल केला आहे. शेतकऱ्याच्या कुटुंबातील कर्त्या पुरूषाबरोबरच आणखी एका सदस्याला (जसे आई, वडील, पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) विमा संरक्षण मिळणार आहे.

कृषी गणना सन २०१५-१६ प्रमाणे निर्धारीत केलेल्या राज्यातील सुमारे १.५२ कोटी वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य असे एकूण दोन जणांकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत लाभ मिळणार आहे. अपघाती मृत्यू झाल्या दोन लाख रुपये, अपघातामुळे दोन डोळे किंवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा, एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. या सुधारीत योजनेची अंमलबजावणी सप्टेंबर महिन्यापासून सुरू झाली आहे.

(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी