शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

लोकसहभागातून जलसंधारणाची सोय!

By admin | Updated: August 10, 2016 01:23 IST

वाळकी-दोडकीत ८५0 एकर जमीन सिंचनाखाली.

सुनील काकडे वाशिम, दि. 0९: कधीकाळी कोरडवाहू जमिनीवर पारंपरिक पिके घेताना पाण्याच्या थेंबासाठी तरसणार्‍या वाळकी-दोडकी या गावांमध्ये लोकसहभागातून झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे आजरोजी जिकडे-तिकडे खळखळून वाहणार्‍या पाण्याचे पाट दिसून येतात. यामुळे तब्बल ८५0 एकर जमीन सिंचनाखाली आली असून दोन्ही गावांचा कायापालट झाला आहे. दरवर्षीच पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य निर्माण होत असल्याने वाळकी-दोडकी या गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असे. खरिप हंगामादरम्यान शेतातील विहिरी कोरड्याठाण्ण पडायच्या. जवळपास कुठलेच मोठे धरण, तलाव नसल्याने कोरडवाहू जमिनीतून पावसाच्या पाण्यावर विसंबून राहत, मिळेल तेवढे उत्पादन घ्यावे लागत असे. रबी हंगामात तर सिंचनाचा मोठा प्रश्न गावातील शेतकर्‍यांना भेडसावयाचा. या विपरित परिस्थितीवर मात करून वाळकी-दोडकी या गावांमध्ये जलसंधारणाची शाश्‍वत सोय निर्माण व्हावी आणि शेतकर्‍यांना जाणवणारा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा, यासाठी दोडकी येथील सामाजीक कार्यकर्ते सुभाषराव नानवटे यांनी भगिरथ प्रयत्न करून जलसंधारणाचे महत्व गावकर्‍यांना पटवून दिले. त्यांच्या हाकेला ह्यओह्ण देत गावकर्‍यांनी देखील या कार्यात स्वत:ला झोकून देत ठिकठिकाणी पावसाचे पाणी अडविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले. सुभाषराव नानवटे यांनी कृषी विभाग, कृषी समृद्धी योजना, भुजल सर्वेक्षण यंत्रणा, रतन टाटा ट्रस्ट स्वयंशिक्षण प्रयोग, जिल्हा परिषद, स्थानिक स्तर यासह इतर यंत्रणांकडून जलसंधारणाच्या कामांकरिता भरीव निधी मिळविला. त्यास लोकसहभागाची जोड मिळाल्याने वाळकी-दोडकी या गावांमध्ये आजमितीस ठिकठिकाणी पाणी अडविणे शक्य झाले आहे. यामुळे शेतांमधील पिकांसाठी लागणारे पाणी उपलब्ध होण्यासोबतच गावात यापुढे कधीच कोरडा दुष्काळ उद्भवणार नाही, याची तजवीज करून ठेवण्यात गावकर्‍यांना यश प्राप्त झाले आहे. आगामी रबी हंगामात या पाण्याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे.