शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून जलसंधारणाची सोय!

By admin | Updated: August 10, 2016 01:23 IST

वाळकी-दोडकीत ८५0 एकर जमीन सिंचनाखाली.

सुनील काकडे वाशिम, दि. 0९: कधीकाळी कोरडवाहू जमिनीवर पारंपरिक पिके घेताना पाण्याच्या थेंबासाठी तरसणार्‍या वाळकी-दोडकी या गावांमध्ये लोकसहभागातून झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे आजरोजी जिकडे-तिकडे खळखळून वाहणार्‍या पाण्याचे पाट दिसून येतात. यामुळे तब्बल ८५0 एकर जमीन सिंचनाखाली आली असून दोन्ही गावांचा कायापालट झाला आहे. दरवर्षीच पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य निर्माण होत असल्याने वाळकी-दोडकी या गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असे. खरिप हंगामादरम्यान शेतातील विहिरी कोरड्याठाण्ण पडायच्या. जवळपास कुठलेच मोठे धरण, तलाव नसल्याने कोरडवाहू जमिनीतून पावसाच्या पाण्यावर विसंबून राहत, मिळेल तेवढे उत्पादन घ्यावे लागत असे. रबी हंगामात तर सिंचनाचा मोठा प्रश्न गावातील शेतकर्‍यांना भेडसावयाचा. या विपरित परिस्थितीवर मात करून वाळकी-दोडकी या गावांमध्ये जलसंधारणाची शाश्‍वत सोय निर्माण व्हावी आणि शेतकर्‍यांना जाणवणारा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा, यासाठी दोडकी येथील सामाजीक कार्यकर्ते सुभाषराव नानवटे यांनी भगिरथ प्रयत्न करून जलसंधारणाचे महत्व गावकर्‍यांना पटवून दिले. त्यांच्या हाकेला ह्यओह्ण देत गावकर्‍यांनी देखील या कार्यात स्वत:ला झोकून देत ठिकठिकाणी पावसाचे पाणी अडविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले. सुभाषराव नानवटे यांनी कृषी विभाग, कृषी समृद्धी योजना, भुजल सर्वेक्षण यंत्रणा, रतन टाटा ट्रस्ट स्वयंशिक्षण प्रयोग, जिल्हा परिषद, स्थानिक स्तर यासह इतर यंत्रणांकडून जलसंधारणाच्या कामांकरिता भरीव निधी मिळविला. त्यास लोकसहभागाची जोड मिळाल्याने वाळकी-दोडकी या गावांमध्ये आजमितीस ठिकठिकाणी पाणी अडविणे शक्य झाले आहे. यामुळे शेतांमधील पिकांसाठी लागणारे पाणी उपलब्ध होण्यासोबतच गावात यापुढे कधीच कोरडा दुष्काळ उद्भवणार नाही, याची तजवीज करून ठेवण्यात गावकर्‍यांना यश प्राप्त झाले आहे. आगामी रबी हंगामात या पाण्याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे.