शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

लोकसहभागातून जलसंधारणाची सोय!

By admin | Updated: August 10, 2016 01:23 IST

वाळकी-दोडकीत ८५0 एकर जमीन सिंचनाखाली.

सुनील काकडे वाशिम, दि. 0९: कधीकाळी कोरडवाहू जमिनीवर पारंपरिक पिके घेताना पाण्याच्या थेंबासाठी तरसणार्‍या वाळकी-दोडकी या गावांमध्ये लोकसहभागातून झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे आजरोजी जिकडे-तिकडे खळखळून वाहणार्‍या पाण्याचे पाट दिसून येतात. यामुळे तब्बल ८५0 एकर जमीन सिंचनाखाली आली असून दोन्ही गावांचा कायापालट झाला आहे. दरवर्षीच पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य निर्माण होत असल्याने वाळकी-दोडकी या गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असे. खरिप हंगामादरम्यान शेतातील विहिरी कोरड्याठाण्ण पडायच्या. जवळपास कुठलेच मोठे धरण, तलाव नसल्याने कोरडवाहू जमिनीतून पावसाच्या पाण्यावर विसंबून राहत, मिळेल तेवढे उत्पादन घ्यावे लागत असे. रबी हंगामात तर सिंचनाचा मोठा प्रश्न गावातील शेतकर्‍यांना भेडसावयाचा. या विपरित परिस्थितीवर मात करून वाळकी-दोडकी या गावांमध्ये जलसंधारणाची शाश्‍वत सोय निर्माण व्हावी आणि शेतकर्‍यांना जाणवणारा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा, यासाठी दोडकी येथील सामाजीक कार्यकर्ते सुभाषराव नानवटे यांनी भगिरथ प्रयत्न करून जलसंधारणाचे महत्व गावकर्‍यांना पटवून दिले. त्यांच्या हाकेला ह्यओह्ण देत गावकर्‍यांनी देखील या कार्यात स्वत:ला झोकून देत ठिकठिकाणी पावसाचे पाणी अडविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले. सुभाषराव नानवटे यांनी कृषी विभाग, कृषी समृद्धी योजना, भुजल सर्वेक्षण यंत्रणा, रतन टाटा ट्रस्ट स्वयंशिक्षण प्रयोग, जिल्हा परिषद, स्थानिक स्तर यासह इतर यंत्रणांकडून जलसंधारणाच्या कामांकरिता भरीव निधी मिळविला. त्यास लोकसहभागाची जोड मिळाल्याने वाळकी-दोडकी या गावांमध्ये आजमितीस ठिकठिकाणी पाणी अडविणे शक्य झाले आहे. यामुळे शेतांमधील पिकांसाठी लागणारे पाणी उपलब्ध होण्यासोबतच गावात यापुढे कधीच कोरडा दुष्काळ उद्भवणार नाही, याची तजवीज करून ठेवण्यात गावकर्‍यांना यश प्राप्त झाले आहे. आगामी रबी हंगामात या पाण्याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे.