शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

वाशिम जिल्हयात यंदाही भीषण पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 13:25 IST

जिल्ह्यातील तीन लघू आणि १३३ मध्यम प्रकल्पांत मिळून केवळ ४९ टक्के उपयुक्त साठा उरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात यंदाही भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अद्याप उन्हाळा सुरू झाला नसतानाच प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय घट झाली आहे. रब्बी पिकांच्या क्षेत्रात झालेली वाढ आणि त्यासाठी होत असलेला पाणी उपसा हे यामागील प्रमुख कारण ठरणार आहे. अद्याप फेब्रुवारी महिना संपला नसतानाच जिल्ह्यातील तीन लघू आणि १३३ मध्यम प्रकल्पांत मिळून केवळ ४९ टक्के उपयुक्त साठा उरला आहे.गत पावसाळ्याअखेर जिल्ह्यातील १३६ पैकी ९० पेक्षा अधिक प्रकल्पांत शंभर टक्क्यांवर जलसंचय झाला होता. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे वाटू लागले होते. तथापि, प्रकल्पांची पातळी वाढल्याने यंदा रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली. परिणामी, सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात उपसा सुरू झाला. त्यामुळे प्रकल्पांच्या पातळीत झपाट्याने घट झाली. आज रोजी जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्पांची पातळी ६२ टक्के असली तरी, इतर १३३ प्रकल्पांची सरासरी पातळी ४८ टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात रब्बी पिकांचे अपेक्षीत क्षेत्र ९२ हजार ९९६ हेक्टर असताना यंदा ९८ हजारांपेक्षा अधिक क्षेत्रात रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात गहू पिकाचे सरासरी क्षेत्र २८ हजार ४१७ हेक्टर असताना यंदा या पिकाची पेरणी ३६ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात झाली असून, चालू आठवड्यापर्यंतही या पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली. अर्थात या पिकासाठी शेतकऱ्यांना पाणी मिळणेही आवश्यक आहे. दरम्यान, कृषी विभागाने मात्र, पोषक वातावरणाअभावी गव्हाची पेरणी अंगलट येण्याची भीती असल्याने शेतकºयांना गहू न पेरण्याचे आवाहनही केले होते. आता जिल्ह्याच्या भौगोलिक स्थितीचा विचार करता प्रकल्पातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते. त्यात सिंचन उपसा वाढल्याने जिल्ह्यात यंदाही भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची भीती आहे. २९ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी साठाजिल्ह्यातील १० लघू प्रकल्पांत शुन्य, टक्के, ५ लघू प्रकल्पांत १० टक्क्यांपेक्षा कमी, १४ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा उरला आहे. ३७ प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा कमी, ४८ प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा कमी, तर केवळ २२ प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा उरला आहे.

पाणी आरक्षणाची ग्रामपंचायतींची मागणीगावालगतच्या प्रकल्पातून पाणी उपसा होत असल्याने काही ग्रामपंचायतींनी पाटबंधारे विभागाकडे प्रकल्पातील पाणी गुरांसाठी आणि पिण्यासाठी आरक्षीत ठेवण्याची मागणी केली आहे. यात मंगरुळपीर तालुक्यातील सावरगाव ग्रामपंचायतने ठराव घेऊन पाटबंधारे विभागाकडे सादर केला आहे.

पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात येणार आहेच; परंतु शेतकरी नियमानुसार सिंचन करीत असतील, तर त्यांना अडविता येणार नाही. अवैध सिंचन उपसा किंवा अकारण होत असलेल्या उपशांवर नियंत्रणासाठी सर्व तहसीलस्तरावर सुचना देण्यात येतील. शेतकºयांनीही पाणीटंचाई उद्भवू नये म्हणून सहकार्य करायला हवे.-शैलेश हिंगे,निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

संबंधित स्वराज्य संस्थांनी केलेल्या मागणीनुसार प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षीत ठेवण्यात येते. बहुतांश प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी आरक्षीत असल्याने शेतकºयांना मज्जाव करता येणार नाही. तथापि, पाण्याचा अपव्यय होऊ नये किंवा कोठे विना परवाना उपसा होत असेल, तर त्यावर नियंत्रण मिळविण्यात येईल. शेतकºयांनीही गरज आणि उपयुक्तता लक्षात घेऊनच पाण्याचा वापर करावा.-प्रशांत बोरसेकार्यकारी अभियंता,लघू पाटबंधारे विभाग, वाशिम

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई