शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हयात यंदाही भीषण पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 13:25 IST

जिल्ह्यातील तीन लघू आणि १३३ मध्यम प्रकल्पांत मिळून केवळ ४९ टक्के उपयुक्त साठा उरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात यंदाही भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अद्याप उन्हाळा सुरू झाला नसतानाच प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय घट झाली आहे. रब्बी पिकांच्या क्षेत्रात झालेली वाढ आणि त्यासाठी होत असलेला पाणी उपसा हे यामागील प्रमुख कारण ठरणार आहे. अद्याप फेब्रुवारी महिना संपला नसतानाच जिल्ह्यातील तीन लघू आणि १३३ मध्यम प्रकल्पांत मिळून केवळ ४९ टक्के उपयुक्त साठा उरला आहे.गत पावसाळ्याअखेर जिल्ह्यातील १३६ पैकी ९० पेक्षा अधिक प्रकल्पांत शंभर टक्क्यांवर जलसंचय झाला होता. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे वाटू लागले होते. तथापि, प्रकल्पांची पातळी वाढल्याने यंदा रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली. परिणामी, सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात उपसा सुरू झाला. त्यामुळे प्रकल्पांच्या पातळीत झपाट्याने घट झाली. आज रोजी जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्पांची पातळी ६२ टक्के असली तरी, इतर १३३ प्रकल्पांची सरासरी पातळी ४८ टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात रब्बी पिकांचे अपेक्षीत क्षेत्र ९२ हजार ९९६ हेक्टर असताना यंदा ९८ हजारांपेक्षा अधिक क्षेत्रात रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात गहू पिकाचे सरासरी क्षेत्र २८ हजार ४१७ हेक्टर असताना यंदा या पिकाची पेरणी ३६ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात झाली असून, चालू आठवड्यापर्यंतही या पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली. अर्थात या पिकासाठी शेतकऱ्यांना पाणी मिळणेही आवश्यक आहे. दरम्यान, कृषी विभागाने मात्र, पोषक वातावरणाअभावी गव्हाची पेरणी अंगलट येण्याची भीती असल्याने शेतकºयांना गहू न पेरण्याचे आवाहनही केले होते. आता जिल्ह्याच्या भौगोलिक स्थितीचा विचार करता प्रकल्पातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते. त्यात सिंचन उपसा वाढल्याने जिल्ह्यात यंदाही भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची भीती आहे. २९ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी साठाजिल्ह्यातील १० लघू प्रकल्पांत शुन्य, टक्के, ५ लघू प्रकल्पांत १० टक्क्यांपेक्षा कमी, १४ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा उरला आहे. ३७ प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा कमी, ४८ प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा कमी, तर केवळ २२ प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा उरला आहे.

पाणी आरक्षणाची ग्रामपंचायतींची मागणीगावालगतच्या प्रकल्पातून पाणी उपसा होत असल्याने काही ग्रामपंचायतींनी पाटबंधारे विभागाकडे प्रकल्पातील पाणी गुरांसाठी आणि पिण्यासाठी आरक्षीत ठेवण्याची मागणी केली आहे. यात मंगरुळपीर तालुक्यातील सावरगाव ग्रामपंचायतने ठराव घेऊन पाटबंधारे विभागाकडे सादर केला आहे.

पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात येणार आहेच; परंतु शेतकरी नियमानुसार सिंचन करीत असतील, तर त्यांना अडविता येणार नाही. अवैध सिंचन उपसा किंवा अकारण होत असलेल्या उपशांवर नियंत्रणासाठी सर्व तहसीलस्तरावर सुचना देण्यात येतील. शेतकºयांनीही पाणीटंचाई उद्भवू नये म्हणून सहकार्य करायला हवे.-शैलेश हिंगे,निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

संबंधित स्वराज्य संस्थांनी केलेल्या मागणीनुसार प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षीत ठेवण्यात येते. बहुतांश प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी आरक्षीत असल्याने शेतकºयांना मज्जाव करता येणार नाही. तथापि, पाण्याचा अपव्यय होऊ नये किंवा कोठे विना परवाना उपसा होत असेल, तर त्यावर नियंत्रण मिळविण्यात येईल. शेतकºयांनीही गरज आणि उपयुक्तता लक्षात घेऊनच पाण्याचा वापर करावा.-प्रशांत बोरसेकार्यकारी अभियंता,लघू पाटबंधारे विभाग, वाशिम

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई