शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

तारांकित प्रश्नानंतरही खचलेल्या पुलाचा प्रश्न कायमच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:28 IST

इंझोरी : पिंपळगाव - इंझोरीदरम्यानच्या पाणंद रस्त्यावरील पूल दोन वर्षांपूर्वी अवकाळी पावसामुळे वाहून गेला. यामुळे शेतकऱ्यांना शेतात वाहने ...

इंझोरी : पिंपळगाव - इंझोरीदरम्यानच्या पाणंद रस्त्यावरील पूल दोन वर्षांपूर्वी अवकाळी पावसामुळे वाहून गेला. यामुळे शेतकऱ्यांना शेतात वाहने नेण्यात अडचणी येत आहेत. लोकमतने यासंदर्भात वारंवार वृत्त प्रकाशित केल्यानंतर आमदारांनी विधानसभेत या पुलाबाबत तारांकित प्रश्न केला. त्याची दखल शासनाने घेतल्याने तीन विभागांकडून पाहणीही करण्यात आली; परंतु अद्यापही या पुलाचे काम झाले नाही.

मानोरा तालुक्यातील म्हसणीनजीक १९७२ मध्ये अडाण प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे इंझोरी-पिंपळगाव दरम्यानच्या पाणंद रस्त्यावर नाल्याचे पाणी वाढल्याने हा रस्ता पाण्यात जाऊन शेतकऱ्यांची वहिवाट बंद झाली. या रस्त्यावर शेती असलेल्या इंझोरी येथील ३० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना या समस्येचा सामना करावा लागत होता. त्यामुळे या पाणंद रस्त्यावर पूल उभारण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना प्रशासनाकडे पाठपुरावा करावा लागला, आंदोलन उभारावे लागले. त्यानंतर या रस्त्यावर पुनर्वसन विभागाने पूल बांधला. त्यामुळे शेतकऱ्यांना सुविधा झाली. तथापि, २०१९ मध्ये ऑक्टोबर महिन्याच्या अखेर आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीस धो धो कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे हा पूलच वाहून गेला. त्यामुळे या रस्त्यावर शेती असलेल्या ३० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची वहिवाट बंद झाली. लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित करून शेतकऱ्यांची समस्या उजागर केली. त्यानंतर आमदारांनी विधिमंडळात याबाबत तारांकित प्रश्न केला. त्याची दखल घेत शासनाने या पुलाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार यवतमाळ जलसंधारण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग मंगरुळपीर आणि जि.प. बांधकाम विभागाच्या पथकाने या पुलाची पाहणी केली; परंतु हा पूल आमच्या कार्यक्षेत्रात नसल्याचे तिन्ही विभागांचे मत असल्याने या पुलाचे काम अद्यापही होऊ शकले नाही.

.---------------------

बियाणे, खतांची डोक्यावरून वाहतूक

इंझोरी-पिंपळगाव दरम्यानच्या पाणंद रस्त्यावरील पूल अवकाळी पावसामुळे वाहून गेल्यानंतर या रस्त्यावरून बैलगाडी, ट्रॅक्टरसारखी वाहने नेणेच काय, तर पायी जाणेही कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे आता खरीप हंगामात पेरणीसाठी बियाणे, खतांसह इतर कामांसाठी आवश्यक साहित्य डोक्यावर न्यावे लागत आहे. गेल्या खरीप हंगामानंतर रबी हंगामातही या मार्गावरील शेतकऱ्यांना महिनाभर हा त्रास सहन करावा लागला होता.

-----------------

पुनर्वसन विभागाची उदासीनता

अडाण प्रकल्पाच्या निर्मितीमुळे इंझोरी-पिंपळगाव रस्ता पाण्यात गेला होता. यामुळे शेतकऱ्यांची वहिवाट बंद झाली आणि शेतकऱ्यांनी पाठपुरावा केल्याने या रस्त्यावर पुनर्वसन विभागाने १५ वर्षांपूर्वी येथे पुलाची उभारणी केली. आता हा पूल पावसामुळे खचल्याने शेतकऱ्यांची वहिवाट बंद झाली असली तरी, पुनर्वसन विभागाने मात्र गत २ वर्षांपासून या पुलाच्या स्थितीची पाहणीसुद्धा केलेली नाही.

===Photopath===

170621\17wsm_2_17062021_35.jpg

===Caption===

तारांकित प्रश्नानंतरही खचलेल्या पुलाचा प्रश्न कायमच !