शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
4
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
5
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
6
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
7
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
9
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
10
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
11
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
12
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
13
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
14
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
15
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
16
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
17
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
18
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
20
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

तारांकित प्रश्नानंतरही खचलेल्या पुलाचा प्रश्न कायमच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:28 IST

इंझोरी : पिंपळगाव - इंझोरीदरम्यानच्या पाणंद रस्त्यावरील पूल दोन वर्षांपूर्वी अवकाळी पावसामुळे वाहून गेला. यामुळे शेतकऱ्यांना शेतात वाहने ...

इंझोरी : पिंपळगाव - इंझोरीदरम्यानच्या पाणंद रस्त्यावरील पूल दोन वर्षांपूर्वी अवकाळी पावसामुळे वाहून गेला. यामुळे शेतकऱ्यांना शेतात वाहने नेण्यात अडचणी येत आहेत. लोकमतने यासंदर्भात वारंवार वृत्त प्रकाशित केल्यानंतर आमदारांनी विधानसभेत या पुलाबाबत तारांकित प्रश्न केला. त्याची दखल शासनाने घेतल्याने तीन विभागांकडून पाहणीही करण्यात आली; परंतु अद्यापही या पुलाचे काम झाले नाही.

मानोरा तालुक्यातील म्हसणीनजीक १९७२ मध्ये अडाण प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे इंझोरी-पिंपळगाव दरम्यानच्या पाणंद रस्त्यावर नाल्याचे पाणी वाढल्याने हा रस्ता पाण्यात जाऊन शेतकऱ्यांची वहिवाट बंद झाली. या रस्त्यावर शेती असलेल्या इंझोरी येथील ३० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना या समस्येचा सामना करावा लागत होता. त्यामुळे या पाणंद रस्त्यावर पूल उभारण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना प्रशासनाकडे पाठपुरावा करावा लागला, आंदोलन उभारावे लागले. त्यानंतर या रस्त्यावर पुनर्वसन विभागाने पूल बांधला. त्यामुळे शेतकऱ्यांना सुविधा झाली. तथापि, २०१९ मध्ये ऑक्टोबर महिन्याच्या अखेर आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीस धो धो कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे हा पूलच वाहून गेला. त्यामुळे या रस्त्यावर शेती असलेल्या ३० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची वहिवाट बंद झाली. लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित करून शेतकऱ्यांची समस्या उजागर केली. त्यानंतर आमदारांनी विधिमंडळात याबाबत तारांकित प्रश्न केला. त्याची दखल घेत शासनाने या पुलाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार यवतमाळ जलसंधारण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग मंगरुळपीर आणि जि.प. बांधकाम विभागाच्या पथकाने या पुलाची पाहणी केली; परंतु हा पूल आमच्या कार्यक्षेत्रात नसल्याचे तिन्ही विभागांचे मत असल्याने या पुलाचे काम अद्यापही होऊ शकले नाही.

.---------------------

बियाणे, खतांची डोक्यावरून वाहतूक

इंझोरी-पिंपळगाव दरम्यानच्या पाणंद रस्त्यावरील पूल अवकाळी पावसामुळे वाहून गेल्यानंतर या रस्त्यावरून बैलगाडी, ट्रॅक्टरसारखी वाहने नेणेच काय, तर पायी जाणेही कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे आता खरीप हंगामात पेरणीसाठी बियाणे, खतांसह इतर कामांसाठी आवश्यक साहित्य डोक्यावर न्यावे लागत आहे. गेल्या खरीप हंगामानंतर रबी हंगामातही या मार्गावरील शेतकऱ्यांना महिनाभर हा त्रास सहन करावा लागला होता.

-----------------

पुनर्वसन विभागाची उदासीनता

अडाण प्रकल्पाच्या निर्मितीमुळे इंझोरी-पिंपळगाव रस्ता पाण्यात गेला होता. यामुळे शेतकऱ्यांची वहिवाट बंद झाली आणि शेतकऱ्यांनी पाठपुरावा केल्याने या रस्त्यावर पुनर्वसन विभागाने १५ वर्षांपूर्वी येथे पुलाची उभारणी केली. आता हा पूल पावसामुळे खचल्याने शेतकऱ्यांची वहिवाट बंद झाली असली तरी, पुनर्वसन विभागाने मात्र गत २ वर्षांपासून या पुलाच्या स्थितीची पाहणीसुद्धा केलेली नाही.

===Photopath===

170621\17wsm_2_17062021_35.jpg

===Caption===

तारांकित प्रश्नानंतरही खचलेल्या पुलाचा प्रश्न कायमच !