शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
3
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
4
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
5
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
6
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
7
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
8
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
9
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
10
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
11
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
12
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
13
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
14
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
15
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
16
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
17
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
18
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
19
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
20
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली

तारांकित प्रश्नानंतरही खचलेल्या पुलाचा प्रश्न कायमच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:28 IST

इंझोरी : पिंपळगाव - इंझोरीदरम्यानच्या पाणंद रस्त्यावरील पूल दोन वर्षांपूर्वी अवकाळी पावसामुळे वाहून गेला. यामुळे शेतकऱ्यांना शेतात वाहने ...

इंझोरी : पिंपळगाव - इंझोरीदरम्यानच्या पाणंद रस्त्यावरील पूल दोन वर्षांपूर्वी अवकाळी पावसामुळे वाहून गेला. यामुळे शेतकऱ्यांना शेतात वाहने नेण्यात अडचणी येत आहेत. लोकमतने यासंदर्भात वारंवार वृत्त प्रकाशित केल्यानंतर आमदारांनी विधानसभेत या पुलाबाबत तारांकित प्रश्न केला. त्याची दखल शासनाने घेतल्याने तीन विभागांकडून पाहणीही करण्यात आली; परंतु अद्यापही या पुलाचे काम झाले नाही.

मानोरा तालुक्यातील म्हसणीनजीक १९७२ मध्ये अडाण प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे इंझोरी-पिंपळगाव दरम्यानच्या पाणंद रस्त्यावर नाल्याचे पाणी वाढल्याने हा रस्ता पाण्यात जाऊन शेतकऱ्यांची वहिवाट बंद झाली. या रस्त्यावर शेती असलेल्या इंझोरी येथील ३० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना या समस्येचा सामना करावा लागत होता. त्यामुळे या पाणंद रस्त्यावर पूल उभारण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना प्रशासनाकडे पाठपुरावा करावा लागला, आंदोलन उभारावे लागले. त्यानंतर या रस्त्यावर पुनर्वसन विभागाने पूल बांधला. त्यामुळे शेतकऱ्यांना सुविधा झाली. तथापि, २०१९ मध्ये ऑक्टोबर महिन्याच्या अखेर आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीस धो धो कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे हा पूलच वाहून गेला. त्यामुळे या रस्त्यावर शेती असलेल्या ३० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची वहिवाट बंद झाली. लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित करून शेतकऱ्यांची समस्या उजागर केली. त्यानंतर आमदारांनी विधिमंडळात याबाबत तारांकित प्रश्न केला. त्याची दखल घेत शासनाने या पुलाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार यवतमाळ जलसंधारण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग मंगरुळपीर आणि जि.प. बांधकाम विभागाच्या पथकाने या पुलाची पाहणी केली; परंतु हा पूल आमच्या कार्यक्षेत्रात नसल्याचे तिन्ही विभागांचे मत असल्याने या पुलाचे काम अद्यापही होऊ शकले नाही.

.---------------------

बियाणे, खतांची डोक्यावरून वाहतूक

इंझोरी-पिंपळगाव दरम्यानच्या पाणंद रस्त्यावरील पूल अवकाळी पावसामुळे वाहून गेल्यानंतर या रस्त्यावरून बैलगाडी, ट्रॅक्टरसारखी वाहने नेणेच काय, तर पायी जाणेही कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे आता खरीप हंगामात पेरणीसाठी बियाणे, खतांसह इतर कामांसाठी आवश्यक साहित्य डोक्यावर न्यावे लागत आहे. गेल्या खरीप हंगामानंतर रबी हंगामातही या मार्गावरील शेतकऱ्यांना महिनाभर हा त्रास सहन करावा लागला होता.

-----------------

पुनर्वसन विभागाची उदासीनता

अडाण प्रकल्पाच्या निर्मितीमुळे इंझोरी-पिंपळगाव रस्ता पाण्यात गेला होता. यामुळे शेतकऱ्यांची वहिवाट बंद झाली आणि शेतकऱ्यांनी पाठपुरावा केल्याने या रस्त्यावर पुनर्वसन विभागाने १५ वर्षांपूर्वी येथे पुलाची उभारणी केली. आता हा पूल पावसामुळे खचल्याने शेतकऱ्यांची वहिवाट बंद झाली असली तरी, पुनर्वसन विभागाने मात्र गत २ वर्षांपासून या पुलाच्या स्थितीची पाहणीसुद्धा केलेली नाही.

===Photopath===

170621\17wsm_2_17062021_35.jpg

===Caption===

तारांकित प्रश्नानंतरही खचलेल्या पुलाचा प्रश्न कायमच !