शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

 मंजुरीनंतरही गावांत टँकर पोहोचलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 14:05 IST

आठ दिवसांपूर्वी मंजुरी मिळाली खरी; परंतु अद्याप यातील एकाही गावांत टँकर पोहोचले नाही.

ठळक मुद्दे सहा ग्रामपंचायतींनी टँकरने पाणी पुरवठ्यासाठी महिनाभरापूर्वी प्रस्ताव सादर केले.णी पुरवठा करण्यास मंजुरी दिल्यानंतरही आजवर एकाही गावांत टँकर पोहोचले नाही. पाणीटंचाई निवारणाची प्रक्रिया केवळ कागदोपत्रीच असून, ग्रामस्थांच्या घशाची कोरड मात्र कायमच आहे. 

- अरूण बळी   

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : तालुक्यातील अनेक गावांत पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांची होरपळ सुरू आहे. अशात तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींनी टँकरने पाणी पुरवठ्यासाठी महिनाभरापूर्वी प्रस्ताव सादर केले. या प्रस्तावांना आठ दिवसांपूर्वी मंजुरी मिळाली खरी; परंतु अद्याप यातील एकाही गावांत टँकर पोहोचले नाही. त्यावरून पाणीटंचाई निवारणाबाबत प्रशासन किती गंभीर आहे, ते स्पष्ट होत आहे.मालेगाव शहरासह तालुक्यात ११४ गावे असून, यातील २८ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांतील ग्रामस्थांच्या घशाला पडलेली कोरड मिटविण्यासाठी ३० ग्रामपंचायतींनी विहिरी, कूपनलिका अधीग्रहणाचे, तर ८ ग्रामपंचायतींनी टँकरने पाणी पुरवठ्यासाठी पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव सादर केले. त्यापैकी विहिरी, कूपनलिका अधीग्रहणाचे २५, तर टँकरचे ६ प्रस्ताव उपविभागीय स्तरावरून जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आले. त्यापैकी विहिरी, कूपनलिकेचे ११ प्रस्ताव, तर टँकरचे सहा प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यामुळे संबंधित गावांतील लोकांची तहान भागणे अपेक्षीत होते; परंतु स्थिती अगदी या उलट आहे. जिल्हा प्रशासनाने आठ दिवसांपूर्वी सहा गावांसाठी टँकरने पाणी पुरवठा करण्यास मंजुरी दिल्यानंतरही आजवर एकाही गावांत टँकर पोहोचले नाही. त्यामुळे प्रशासनाची पाणीटंचाई निवारणाची प्रक्रिया केवळ कागदोपत्रीच असून, ग्रामस्थांच्या घशाची कोरड मात्र कायमच आहे.  खैरखेड्यात पोहोचलेले टँकर उभेच मालेगाव तालुक्यातील राजुरा, वरदरी, देवठाणा खांब, खैरखेडा आणि   पिंपळवाडी या गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्यास मंजुरी दिली खरी; परंतु एकाही गावात टँकर पोहोचले नसल्याचे वास्तव आहे. त्यातच खैरखेडा येथे सोमवार १३ मे रोजी पाणी पुरवठ्यासाठी टँकर आले खरे; परंतु या टँकरमधून गावातील विहिरीत पाणी सोडण्यासाठी आवश्यक साहित्यच नसल्याने हे टँकर जागेवरच उभे आहे.  वॉटर न्युट्रल गांगलवाडीच पाणीटंचाई मालेगाव तालुक्यातील ज्या सहा गावांत टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आला. त्यात जलयुक्त शिवारची मोठ्या प्रमाणात कामे झालेल्या गांगलवाडीचा समावेश असून, सदर गाव वॉटर न्युट्रलच्या यादीत आहे. त्यामुळे या गावांत पाणीटंचाई कशी, हे पटवून देणारे पत्र जिल्हाधिकाºयांनी कृषी विभागाला सादर करण्यास सांगितले. कृषी विभागाने याबाबतचे पत्रही सादर केले आहे.  

महिनाभरापूर्वी प्रस्ताव सादर केल्यानंतर सहा दिवसांपूर्वी मंजुरी मिळाली. त्यामुळे गावात टँकर येण्याची आम्हाला अपेक्षा होती. सोमवार १३ मे रोजी टँकर गावात आले; परंतु टँकरमधून विहिरीत पाणी सोडण्यासाठी आवश्यक साहित्यच नसल्याने चालक निघून गेला. त्यामुळे या टँकरचा फायदा झाला नाही. -आशा निवास शेळकेसरपंच, खैरखेडा    गांगलवाडी येथे दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई आहे. पर्याय नसल्याने टँकरचा प्रस्ताव सादर करण्यात आला आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यात त्रुटी काढण्यात आल्या. याबाबत कृषी विभागाचा प्रस्तावही सादर करण्यात आला; परंतु गावात टँकर पोहोचलेच नाही. -अन्नपूर्णा दिलिप भुरकाडेपं.स. सदस्य मालेगाव --------------------------

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई