शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
2
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
3
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
4
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
5
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
6
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
7
UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
8
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
9
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
10
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
11
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
12
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
13
"डॉक्टर RDX बांधून स्वतःला उडवून देत आहेत"; मुफ्तींचा केंद्रावर हल्ला,'तुमच्या धोरणांनी दिल्लीही असुरक्षित'
14
Ganpatipule: गणपतीपुळे येथे देवदर्शनाला गेलेले भिवंडीतील ३ जण समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू!
15
इस्त्रीत लपवले कोट्यवधी रुपयांचे सोने; हैदराबाद विमानतळावरील घटना, दोघे अटकेत
16
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
17
गळ्यात नेकलेस घातला अन् पैठणीची लुंगी नेसला! 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याचा लूक पाहून चाहत्यांनी डोक्यावर मारला हात
18
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
19
Leopards Alert: बिबट्यापासून सतर्क करेल एआय कॅमेरा; दिसताच वाजेल सायरन!
20
Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

 मंजुरीनंतरही गावांत टँकर पोहोचलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 14:05 IST

आठ दिवसांपूर्वी मंजुरी मिळाली खरी; परंतु अद्याप यातील एकाही गावांत टँकर पोहोचले नाही.

ठळक मुद्दे सहा ग्रामपंचायतींनी टँकरने पाणी पुरवठ्यासाठी महिनाभरापूर्वी प्रस्ताव सादर केले.णी पुरवठा करण्यास मंजुरी दिल्यानंतरही आजवर एकाही गावांत टँकर पोहोचले नाही. पाणीटंचाई निवारणाची प्रक्रिया केवळ कागदोपत्रीच असून, ग्रामस्थांच्या घशाची कोरड मात्र कायमच आहे. 

- अरूण बळी   

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : तालुक्यातील अनेक गावांत पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांची होरपळ सुरू आहे. अशात तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींनी टँकरने पाणी पुरवठ्यासाठी महिनाभरापूर्वी प्रस्ताव सादर केले. या प्रस्तावांना आठ दिवसांपूर्वी मंजुरी मिळाली खरी; परंतु अद्याप यातील एकाही गावांत टँकर पोहोचले नाही. त्यावरून पाणीटंचाई निवारणाबाबत प्रशासन किती गंभीर आहे, ते स्पष्ट होत आहे.मालेगाव शहरासह तालुक्यात ११४ गावे असून, यातील २८ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांतील ग्रामस्थांच्या घशाला पडलेली कोरड मिटविण्यासाठी ३० ग्रामपंचायतींनी विहिरी, कूपनलिका अधीग्रहणाचे, तर ८ ग्रामपंचायतींनी टँकरने पाणी पुरवठ्यासाठी पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव सादर केले. त्यापैकी विहिरी, कूपनलिका अधीग्रहणाचे २५, तर टँकरचे ६ प्रस्ताव उपविभागीय स्तरावरून जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आले. त्यापैकी विहिरी, कूपनलिकेचे ११ प्रस्ताव, तर टँकरचे सहा प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यामुळे संबंधित गावांतील लोकांची तहान भागणे अपेक्षीत होते; परंतु स्थिती अगदी या उलट आहे. जिल्हा प्रशासनाने आठ दिवसांपूर्वी सहा गावांसाठी टँकरने पाणी पुरवठा करण्यास मंजुरी दिल्यानंतरही आजवर एकाही गावांत टँकर पोहोचले नाही. त्यामुळे प्रशासनाची पाणीटंचाई निवारणाची प्रक्रिया केवळ कागदोपत्रीच असून, ग्रामस्थांच्या घशाची कोरड मात्र कायमच आहे.  खैरखेड्यात पोहोचलेले टँकर उभेच मालेगाव तालुक्यातील राजुरा, वरदरी, देवठाणा खांब, खैरखेडा आणि   पिंपळवाडी या गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्यास मंजुरी दिली खरी; परंतु एकाही गावात टँकर पोहोचले नसल्याचे वास्तव आहे. त्यातच खैरखेडा येथे सोमवार १३ मे रोजी पाणी पुरवठ्यासाठी टँकर आले खरे; परंतु या टँकरमधून गावातील विहिरीत पाणी सोडण्यासाठी आवश्यक साहित्यच नसल्याने हे टँकर जागेवरच उभे आहे.  वॉटर न्युट्रल गांगलवाडीच पाणीटंचाई मालेगाव तालुक्यातील ज्या सहा गावांत टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आला. त्यात जलयुक्त शिवारची मोठ्या प्रमाणात कामे झालेल्या गांगलवाडीचा समावेश असून, सदर गाव वॉटर न्युट्रलच्या यादीत आहे. त्यामुळे या गावांत पाणीटंचाई कशी, हे पटवून देणारे पत्र जिल्हाधिकाºयांनी कृषी विभागाला सादर करण्यास सांगितले. कृषी विभागाने याबाबतचे पत्रही सादर केले आहे.  

महिनाभरापूर्वी प्रस्ताव सादर केल्यानंतर सहा दिवसांपूर्वी मंजुरी मिळाली. त्यामुळे गावात टँकर येण्याची आम्हाला अपेक्षा होती. सोमवार १३ मे रोजी टँकर गावात आले; परंतु टँकरमधून विहिरीत पाणी सोडण्यासाठी आवश्यक साहित्यच नसल्याने चालक निघून गेला. त्यामुळे या टँकरचा फायदा झाला नाही. -आशा निवास शेळकेसरपंच, खैरखेडा    गांगलवाडी येथे दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई आहे. पर्याय नसल्याने टँकरचा प्रस्ताव सादर करण्यात आला आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यात त्रुटी काढण्यात आल्या. याबाबत कृषी विभागाचा प्रस्तावही सादर करण्यात आला; परंतु गावात टँकर पोहोचलेच नाही. -अन्नपूर्णा दिलिप भुरकाडेपं.स. सदस्य मालेगाव --------------------------

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई