शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईची आशा मावळली ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 15:15 IST

आचारसंहिता लागू झाल्याने किमान मतमोजणीपर्यंत तरी नुकसानभरपाई मिळणार नाही, असा अंदाज वर्तविला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यात आॅगस्ट २०१८ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ६ हजार ७२० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून भरपाई मिळावी यासाठी ४.५९ कोटी रुपये निधीचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र, आता आचारसंहिता लागू झाल्याने किमान मतमोजणीपर्यंत तरी नुकसानभरपाई मिळणार नाही, असा अंदाज वर्तविला जात आहे.वाशिम जिल्ह्यात गतवेळच्या खरीप हंगामात १६ आॅगस्ट २०१८ ते १९ आॅगस्ट २०१८ दरम्यान अतिवृष्टीमुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला होता. जिल्ह्यातील १२०० पेक्षा अधिक शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत झाले. त्यात प्रामुख्याने कारंजा, मानोरा तालुक्यातील शेतकºयांचे अधिक नुकसान झाले. अनेक शेतकºयांची शेतजमीन यादरम्यान खरडून गेली. त्यामुळे त्यांना रब्बीची पिकेही घेता आली नाहीत. आॅगस्ट २०१८ मध्ये ओढवलेल्या या नैसर्गिक आपत्तीत ६ हजार ७२० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. कृषी व महसूल विभागाने पीक नुकसानाची संयुक्त पाहणी करून पंचनामे केले. त्यानुसार, शेतकºयांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे सविस्तर अहवाल पाठवित ४.५९ कोटी रुपयांच्या निधीची मागणी तीन महिन्यांपूर्वी नोंदविली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईपर्यंतदेखील या अहवालाला मंजूरी मिळाली नाही. त्यामुळे आता आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतरच यावर पुढील कार्यवाही होणार असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी