शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

शासकीय जमिनीवर अतिक्रमण वाढले

By admin | Updated: June 16, 2014 00:43 IST

तालुक्यातील शासकीय पडित जमिनी, कुरणे, गायराने, झुडपी जंगले अतिक्रमणाने गिळंकृत केली आहेत.

मानोरा : तालुक्यातील शासकीय पडित जमिनी, कुरणे, गायराने, झुडपी जंगले अतिक्रमणाने गिळंकृत केली आहेत. परिणामी जनावरांसाठी असणारी गायराने बेपत्ता झाली असल्याने जनावरांचे चार्‍याअभावी कुपोषण होत आहे. तालुका निर्मितीच्यावेळी लोकसंख्येच्या प्रमाणात असणारे ह्यगोधनह्ण आज केवळ काही हजारावर आले आहे.मंगरूळपीर तालुक्याचे १९६२ मध्ये विभाजन होऊन मंगरूळपीर, मानोरा असे दोन स्वतंत्र तालुके अस्तित्वात आले. मानोरा तालुक्याचे क्षेत्रफळ ७८५६८.२२ असून कृषीक्षेत्र ५४0७६.३२ चौ.मि. तशा नोंदी आजही महसूल विभागाच्या दप्तरात आहेत. या झुडपी जंगले, कुरण जमिनीवर तालुक्यातील हजारो जनावरे मुक्तपणे चरत होती. मात्र सध्या सर्व जमिनीवर अतिक्रमण झाल्याने कुरण क्षेत्राअभावी तालुक्यात जनावरेच कमी शिल्लक उरली आहेत. शासनाने सिलिंग कायदा आणला तेव्हा बुद्धीवाद्यांनी त्यांची सुपिक जमिन वाचविण्यासाठी पडिक जमिनी सिलिंगमध्ये दिल्या. तशाच काही जमिनी भुदानमध्ये गेल्या. त्यातील अनेक लाभार्थी त्या जमिनीचा उपयोगच घेऊ शकत नाही. अनेकांच्या जमिनी त्यांनाच माहित नाही, अशी अवस्था आहे. काहींनी या जमिनीचा उपयोग बँकाचे कर्ज काढण्यासाठी शासकीय योजनाचा लाभ घेण्यापुरताच केला. स्वत: जमीन कुणीच कसली नाही. अनेकांनी त्यांच्या जमिनीचे तुकडे दुसर्‍यांना ठेक्याने वहितीसाठी दिले.** दूध झाले मिळेनासे तालक्यात गोधन आहे. म्हशी आहेत. शासन सुद्धा विविध योजना राबवून शेतकर्‍यांना पुरक व्यवसायासाठी गायी, म्हशींचे अनुदानावर वाटप करते. मात्र वैरणअभावी गायी, म्हशीचे पूर्वी गावागावात मिळणारे दूध कमी झाले. बालकांना तर सोडाच चहाला सुद्धा दूध मिळणे गावात कठीण झाले आहे. तालुक्यातील शासकीय जमिनीप्रमाणेच शेतातील धुरे, बंधारे, गावांची शिव, सरकारी रस्ते सुद्धा अतिक्रमित झाले आहेत. पांदन रस्ते किंवा गावशिवेवरून साधी बैलगाडीसुद्धा जाऊ शकत नाही. वैयक्तिक स्वार्थापोटी मानवाने शासकीय जमिन धुरे, गावशिव, झुडपी, जंगले अतिक्रमित केल्याने भांडणे वाढली. पोलीस ठाणे, तहसील कार्यालयात तक्रारी वाढू लागल्या. मारामारी वाढू लागली. परिणामी न्यायालय, तहसील, उपविभागीय अधिकारी कार्यालयात तारखेवर हजर राहणार्‍यांची संख्या वाढली आहे. तथापि, शासन अतिक्रमण न काढता केवळ अतिक्रमणधारकास दंडित करते. त्यामुळे अतिक्रमणधारकांची हिंमत वाढत आहे. त्यातच राजकीय स्वार्थापोटी काही राजकीय पुढारी भूमिहिनांना जमिनी मिळाली पाहिजे. त्यांना वहित करीत असलेल्या जमिनीचे पट्टे मिळालेच पाहिजे यासाठी आंदोलने करतात. मात्र जनावरांना चराईसाठी जागा मिळाल्याच पाहिजे याकडे कोणताही पुढारी लक्ष देत नाही ही शोकांतिका आहे. भविष्यात अतिक्रमणाचा भस्मापूर असाच वाढत राहिल्यास स्मशानासाठी जागा सुद्धा शिल्लक राहणार नाही. अतिक्रमण काढताना शासकीय यंत्रणेला त्रास होईल. काही संघटना आडव्या येतील. अतिक्रमणधारक धमक्या सुद्धा देतील. मात्र त्याला न जुमानता शासनस्तरावर अनधिकृत अतिक्रमण काढण्याची मोहिम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. तरच या अतिक्रमणाला पायबंद बसेल ; अन्यथा मुक्या जनावरांचा चारा मिळणे कठीण होणार आहे. याबाबत आता अधिकार्‍यांनीच दक्षता घेण्याची गरज आहे.** ई-क्लास जमिनी होत आहेत बेपत्ताअनेक लाभार्थ्यांना मिळालेल्या जमिनीप्रमाणे आपल्यालाही जमिनीचा तुकडा असावा म्हणून अनेक भूमिहिनांनी शासकीय जमिनीवर मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करून मनाला वाटेल तेवढी जमिन बळकावण्याचा प्रयतन केला. सरकारी जमिनीवर अतिक्रमण होत असताना महसूल विभागाने पडिक जमिनी ताब्यात घेतल्या. शासकीय पडिक जमीन, झुडपी जंगले, वनिकरणाची जमिन, ग्रामपंचायत मालकीची ह्यई-क्लासह्ण जमिनसुद्धा आता यामुळे बेपत्ता झाली आहे. परिणामी शासकीय दप्तरात अस्तित्वात असलेल्या पडिक, कुरण जमिनी प्रत्यक्षात बेपत्ता झाल्याने कुरण जमिनी नाममात्र शिल्लक आहेत. यामुळे गोपालकांना, गुराख्यांना जनावरे कुठे चारावी असा प्रश्न पडला आहे. पुरेसे वैरण (चराई) मिळत नसल्याने शेकडो जनावरे कुपोषित झाली आहे. गोपालक अनेक जनावरे विकत आहेत. शेतकर्‍यांचा रोख उत्पन्न देणार्‍या पिकाकडे असल्याने जनावरांना लागणारे वैरण, कडबा, कुटार मिळणे दुरापास्त झाले आहेत. परिणामी अनेक जनावरे अर्धेपोटी राहतात. यामुळे ते कुपोषित होत आहेत.