शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
5
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
6
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
7
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
8
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
9
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
12
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
13
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
14
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
15
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
16
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
17
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
18
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
19
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
20
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना

‘समाजकार्य’च्या कर्मचा-यांचे वेतन थकले!

By admin | Updated: March 31, 2017 02:25 IST

४२ कुटुंबांवर उपासमारीची वेळ; डिसेंबर २0१६ पासून प्रश्न कायम.

वाशिम, दि. ३0- स्थानिक सरस्वती समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून एकूण ४२ कर्मचार्‍यांचे वेतन थकल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे. यातील १२ कर्मचार्‍यांचे वेतन डिसेंबर २0१६ पासून, तर उर्वरित ३0 कर्मचार्‍यांचे वेतन जानेवारी २0१७ पासून थकले आहे.वाशिम येथे सरस्वती समाजकार्य महाविद्यालय एका संस्थेमार्फत चालविले जाते. या महाविद्यालयात शेकडो विद्यार्थी सामाजिक शास्त्रांतील विविध विषयांचे ज्ञानार्जन करीत असतात. या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्रांच्या आधारे समाजकार्याचे धडे देण्यासाठी प्राध्यापक आणि इतर कार्यालयीन कामकाजासाठी शिक्षकेतर कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून निधी प्राप्त होत असतो; परंतु मागील दोन महिन्यांपासून या कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी शासनाकडून निधीच प्राप्त झाला नसल्याने आणि यातील १२ कर्मचार्‍यांच्या वेतनाची देयके तांत्रिक अडचणीमुळे विलंबाने पाठविल्याने डिसेंबर २0१६ पासून, तर उर्वरित कर्मचार्‍यांचे वेतन जानेवारी २0१७ पासून थकले आहे. आता मागील तीन महिन्यांपासून वेतनच मिळाले नसल्याने, या कर्मचार्‍यांना आपल्या कुटुंबाच्या आवश्यक गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे. काहींनी गरजा पूर्ण करण्यासाठी उसणवार केली आहे. वेतनच मिळाले नसल्याने त्यांची अनेक आवश्यक कामे खोळंबली आहेत. खासगी देणीघेणी, विम्याचे हप्ते, वीज देयके, किराणाचे बिल थकले आहेच, शिवाय लग्नसराईच्या दिवसांत हाती पैसा नसल्याने समाजात नातेवाइकांच्या लग्नकार्यासह इतर सामाजिक कार्यक्रमांत जाणेही या कर्मचार्‍यांना अवघड झाल्याचे दिसत आहे. वेतन मिळावे, अशी अपेक्षा असली तरी, त्यासाठी या कर्मचार्‍यांना महाविद्यालय व्यवस्थापनाबाबत काही सांगता येत नाही. यासंदर्भात महाविद्यालयातील लेखा विभागाच्या कर्मचार्‍यांकडून माहिती घेतली असता, महाविद्यालयातील १२ कर्मचार्‍यांचे अँरिअर्स काढायचे होते. या अँरिअर्समुळे त्यांचे डिसेंबर महिन्यातील देयकायचे बिल सादर करण्यास विलंब झाला, तर इतर ३0 कर्मचार्‍यांसह ४२ कर्मचार्‍यांची वेतन बिले सादर करण्यात आली असली तरी, शासनाकडून निधीच प्राप्त झाला नसल्याने वेतन अदा करणे शक्य झाले नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.