शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणावर भर - रमेश तांगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 18:55 IST

Washim News माध्यमिक शाळांमध्ये ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे.

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शाळांमध्ये ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. यंदा चित्रकला, शालेय क्रीडा स्पर्धा यासह अन्य परीक्षाही प्रभावित झाल्या आहेत. अकरावीमधील प्रवेश प्रक्रिया पुर्णत्वाकडे येत आहे. या पार्श्वभूमीवर नवनियुक्त माध्यमिक शिक्षणाधिकारी रमेश तांगडे यांच्याशी शनिवारी संवाद साधला असता, जिल्ह्यात ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणावर भर दिला जात असल्याचे ते म्हणाले.

कोरोनामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झाली नाही. विद्यार्थ्यांना कशाप्रकारे शिकविण्यात येत आहे?कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाच्या सुचनेनुसार सध्या वर्ग सुरू झाले नाहीत. तथापि, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आॅनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल किंवा संगणकाची व्यवस्था नाही, अशा विद्यार्थ्यांना समुदाय पद्धतीने शाळा परिसरात, घरी जाऊन आॅफलाईन पद्धतीने शिकविण्यात येत आहे. यावेळी ‘कोविड-१९’च्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना शिक्षकांना दिल्या आहेत. त्यानुसार या सुचनांचे पालनही होत आहे. 

अकरावी प्रवेशाबाबत काय सांगाल?जिल्ह्यात यावर्षी आॅफलाईन पद्धतीने शाळा स्तरावरच अकरावीमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहेत. आतापर्यंत ही प्रवेश प्रक्रिया ८० टक्के पूर्ण झाली आहे. शासकीय व अनुदानित शाळेत अकरावी प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारू नये, अशा सूचना दिलेल्या आहेत. कुणाच्या तक्रारी असतील तर शिक्षण विभाग स्तरावर तक्रारीचे निराकरण करण्याची व्यवस्थादेखील केली आहे. दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्याच्या तुलनेत अकरावीतील प्रवेशित जागांची संख्या जास्त असल्याने प्रवेशापासून कुणीही वंचित राहणार नाही.

कोरोनामुळे चित्रकला परीक्षा, शालेय क्रीडा स्पर्धा प्रभावित झाल्या, याबाबत काय सांगाल?कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा स्तरावर गर्दी होणार नाही, याची दक्षता वरिष्ठ स्तरावरूनच घेतली जात आहे. शाळा सुरू झाल्यानंतर चित्रकला परीक्षा, शालेय क्रीडा स्पर्धा व अन्य मुद्याच्या अनुषंगाने वरिष्ठ स्तरावर योग्य तो निर्णय होईल. या निर्णयाची अमलबजावणी जिल्ह्यात केली जाईल.

जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासंदर्भात आतापर्यंत मुख्याध्यापकांच्या तीन ते चार वेळा आॅनलाईन पद्धतीने बैठका घेण्यात आल्या. विद्यार्थी, पालकांच्या तक्रारींचा निपटारा शक्यतोवर शाळा स्तरावर करावा, अशा सूचना सर्वांना दिल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखतEducationशिक्षण