शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

वाशिम जिल्ह्यात अकरावीच्या ३,१५६ जागा रिक्त ; शिक्षकांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 11:47 IST

Washim Education Sector News आतापर्यंत २३,५०० पैकी २०,३४४ प्रवेश झाले, तर ३,१५६ जागा रिक्त राहिल्या आहेत.

ठळक मुद्देयावर्षी इयत्ता दहावीचे एकूण १९ हजार ८१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकरावीच्या प्रवेशासाठी एकूण २३ हजार ५०० जागा उपलब्ध आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्यित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावर  यंदा अकरावीची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली  असून, आतापर्यंत २३,५०० पैकी २०,३४४ प्रवेश झाले, तर ३,१५६ जागा रिक्त राहिल्या आहेत.यावर्षी इयत्ता दहावीचे एकूण १९ हजार ८१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत जिल्ह्यात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी एकूण २३ हजार ५०० जागा उपलब्ध असल्याने जागांचा तुटवडा नाही.

शिक्षक संख्येवर परिणाम ?जिल्ह्यात अकरावीच्या २३ हजार ५०० जागा आहेत. यापैकी ३,१५६ जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका तर नाही ना? अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, यंदा काही तुकड्यांची वाढ झाल्याने एकूण प्रवेशित जागांच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसून येते.

मागील वर्षीची स्थितीगेल्यावर्षी कला शाखेसाठी १०,८८०, विज्ञान शाखेसाठी ९,४४०, वाणिज्य शाखेसाठी ६४०, तर अन्य शाखेसाठी ८०० जागा होत्या. गेल्यावर्षी दहावीच्या निकालाची टक्केवारी कमी लागल्याने प्रवेशित एकूण जागांपैकी जवळपास ४ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा ३,१५६ जागा रिक्त राहिल्या आहेत..

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी