शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आज निवडणुकीतील चित्र होणार स्पष्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 20:11 IST

वाशिम : ७ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ६०५८ उमेदवारी अर्ज कायम असून, २७ सप्टेंबर रोजी कोण माघार घेणार यावर निवडणुकीतील पुढील चित्र अवलंबून आहे. दरम्यान, बंडखोरी होऊ नये तसेच ग्रामपंचायत अविरोध करण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक नेते, आघाडी प्रमुखांतर्फे माघार घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी केली जात असल्याचे दिसून येते. 

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक माघार घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ७ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ६०५८ उमेदवारी अर्ज कायम असून, २७ सप्टेंबर रोजी कोण माघार घेणार यावर निवडणुकीतील पुढील चित्र अवलंबून आहे. दरम्यान, बंडखोरी होऊ नये तसेच ग्रामपंचायत अविरोध करण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक नेते, आघाडी प्रमुखांतर्फे माघार घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी केली जात असल्याचे दिसून येते. आगामी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींची निवडणूक  ७ आॅक्टोबर रोजी होत आहे. वाशिम तालुक्यातील ५१ ग्राम पंचायती, कारंजा ५३, मालेगाव तालुक्यातील ४८, रिसोड तालुक्यातील ४५, मानोरा तालुक्यातील ४१ आणि मंगरूळपीर तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. २२ सप्टेंबरपर्यंत दाखल ६१६२ उमेदवारी अर्जाची सोमवार, २५ सप्टेंबर रोजी तहसिल स्तरावर छाननी करण्यात आली. छाननीत १०४ अर्ज बाद झाल्याने आता ६०५८ अर्ज कायम आहेत. यामध्ये वाशिम तालुक्यातील सदस्य पदाचे ९५६ व सरपंच पदाच्या २९४ अशा एकूण १२५० अर्जांचा समावेश आहे. कारंजा तालुक्यातील सदस्य पदाचे ७४१ व सरपंच पदाच्या २३८ अशा एकूण ९७९ अर्जांचा समावेश आहे. मानोरा तालुक्यातील सदस्य पदाचे ६५९ व सरपंच पदाच्या १८५ अशा एकूण ८४४ अर्जांचा समावेश आहे. रिसोड तालुक्यातील सदस्य पदाचे ८५३ व सरपंच पदाच्या २१६ अशा एकूण १०६९ अर्जांचा समावेश आहे. मंगरूळपीर तालुक्यातील सदस्य पदाचे ६३६ व सरपंच पदाच्या २०२ अशा एकूण ८३८ अर्जांचा समावेश आहे. मालेगाव तालुक्यातील सदस्य पदाचे ८३२ व सरपंच पदाच्या २४६ अशा एकूण १०७८ अर्जांचा समावेश आहे. २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. अंतिम मुदतीपर्यंत किती उमेदवार माघार घेतात, यावर निवडणुकीतील चित्र अवलंबून राहणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकी ही पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी पक्षाचे समर्थक, पक्षाच्या कार्यकर्त्यांना ग्राम पंचायतच्या सत्तेत बसविण्यासाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारीप-बमसं या प्रमुख पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याचे दिसून येते. आगामी डिसेंबर २०१८ मध्ये पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत निवडणूक ही रंगीत तालिम ठरत असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची कसोटी लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक अविरोध करणे तसेच बंडखोरांना शांत करण्यासाठी स्थानिक नेते, आघाडी प्रमुखांनी उमेदवारांनी माघार घेण्याकरिता प्रयत्न चालविल्याचे दिसून येते. या प्रयत्नांना कितपत यश येते, हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर स्पष्ट होणार आहे.