शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आज निवडणुकीतील चित्र होणार स्पष्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 20:11 IST

वाशिम : ७ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ६०५८ उमेदवारी अर्ज कायम असून, २७ सप्टेंबर रोजी कोण माघार घेणार यावर निवडणुकीतील पुढील चित्र अवलंबून आहे. दरम्यान, बंडखोरी होऊ नये तसेच ग्रामपंचायत अविरोध करण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक नेते, आघाडी प्रमुखांतर्फे माघार घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी केली जात असल्याचे दिसून येते. 

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक माघार घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ७ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ६०५८ उमेदवारी अर्ज कायम असून, २७ सप्टेंबर रोजी कोण माघार घेणार यावर निवडणुकीतील पुढील चित्र अवलंबून आहे. दरम्यान, बंडखोरी होऊ नये तसेच ग्रामपंचायत अविरोध करण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक नेते, आघाडी प्रमुखांतर्फे माघार घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी केली जात असल्याचे दिसून येते. आगामी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींची निवडणूक  ७ आॅक्टोबर रोजी होत आहे. वाशिम तालुक्यातील ५१ ग्राम पंचायती, कारंजा ५३, मालेगाव तालुक्यातील ४८, रिसोड तालुक्यातील ४५, मानोरा तालुक्यातील ४१ आणि मंगरूळपीर तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. २२ सप्टेंबरपर्यंत दाखल ६१६२ उमेदवारी अर्जाची सोमवार, २५ सप्टेंबर रोजी तहसिल स्तरावर छाननी करण्यात आली. छाननीत १०४ अर्ज बाद झाल्याने आता ६०५८ अर्ज कायम आहेत. यामध्ये वाशिम तालुक्यातील सदस्य पदाचे ९५६ व सरपंच पदाच्या २९४ अशा एकूण १२५० अर्जांचा समावेश आहे. कारंजा तालुक्यातील सदस्य पदाचे ७४१ व सरपंच पदाच्या २३८ अशा एकूण ९७९ अर्जांचा समावेश आहे. मानोरा तालुक्यातील सदस्य पदाचे ६५९ व सरपंच पदाच्या १८५ अशा एकूण ८४४ अर्जांचा समावेश आहे. रिसोड तालुक्यातील सदस्य पदाचे ८५३ व सरपंच पदाच्या २१६ अशा एकूण १०६९ अर्जांचा समावेश आहे. मंगरूळपीर तालुक्यातील सदस्य पदाचे ६३६ व सरपंच पदाच्या २०२ अशा एकूण ८३८ अर्जांचा समावेश आहे. मालेगाव तालुक्यातील सदस्य पदाचे ८३२ व सरपंच पदाच्या २४६ अशा एकूण १०७८ अर्जांचा समावेश आहे. २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. अंतिम मुदतीपर्यंत किती उमेदवार माघार घेतात, यावर निवडणुकीतील चित्र अवलंबून राहणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकी ही पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी पक्षाचे समर्थक, पक्षाच्या कार्यकर्त्यांना ग्राम पंचायतच्या सत्तेत बसविण्यासाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारीप-बमसं या प्रमुख पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याचे दिसून येते. आगामी डिसेंबर २०१८ मध्ये पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत निवडणूक ही रंगीत तालिम ठरत असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची कसोटी लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक अविरोध करणे तसेच बंडखोरांना शांत करण्यासाठी स्थानिक नेते, आघाडी प्रमुखांनी उमेदवारांनी माघार घेण्याकरिता प्रयत्न चालविल्याचे दिसून येते. या प्रयत्नांना कितपत यश येते, हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर स्पष्ट होणार आहे.