शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

आज निवडणुकीतील चित्र होणार स्पष्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 20:11 IST

वाशिम : ७ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ६०५८ उमेदवारी अर्ज कायम असून, २७ सप्टेंबर रोजी कोण माघार घेणार यावर निवडणुकीतील पुढील चित्र अवलंबून आहे. दरम्यान, बंडखोरी होऊ नये तसेच ग्रामपंचायत अविरोध करण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक नेते, आघाडी प्रमुखांतर्फे माघार घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी केली जात असल्याचे दिसून येते. 

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक माघार घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ७ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ६०५८ उमेदवारी अर्ज कायम असून, २७ सप्टेंबर रोजी कोण माघार घेणार यावर निवडणुकीतील पुढील चित्र अवलंबून आहे. दरम्यान, बंडखोरी होऊ नये तसेच ग्रामपंचायत अविरोध करण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक नेते, आघाडी प्रमुखांतर्फे माघार घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी केली जात असल्याचे दिसून येते. आगामी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींची निवडणूक  ७ आॅक्टोबर रोजी होत आहे. वाशिम तालुक्यातील ५१ ग्राम पंचायती, कारंजा ५३, मालेगाव तालुक्यातील ४८, रिसोड तालुक्यातील ४५, मानोरा तालुक्यातील ४१ आणि मंगरूळपीर तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. २२ सप्टेंबरपर्यंत दाखल ६१६२ उमेदवारी अर्जाची सोमवार, २५ सप्टेंबर रोजी तहसिल स्तरावर छाननी करण्यात आली. छाननीत १०४ अर्ज बाद झाल्याने आता ६०५८ अर्ज कायम आहेत. यामध्ये वाशिम तालुक्यातील सदस्य पदाचे ९५६ व सरपंच पदाच्या २९४ अशा एकूण १२५० अर्जांचा समावेश आहे. कारंजा तालुक्यातील सदस्य पदाचे ७४१ व सरपंच पदाच्या २३८ अशा एकूण ९७९ अर्जांचा समावेश आहे. मानोरा तालुक्यातील सदस्य पदाचे ६५९ व सरपंच पदाच्या १८५ अशा एकूण ८४४ अर्जांचा समावेश आहे. रिसोड तालुक्यातील सदस्य पदाचे ८५३ व सरपंच पदाच्या २१६ अशा एकूण १०६९ अर्जांचा समावेश आहे. मंगरूळपीर तालुक्यातील सदस्य पदाचे ६३६ व सरपंच पदाच्या २०२ अशा एकूण ८३८ अर्जांचा समावेश आहे. मालेगाव तालुक्यातील सदस्य पदाचे ८३२ व सरपंच पदाच्या २४६ अशा एकूण १०७८ अर्जांचा समावेश आहे. २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. अंतिम मुदतीपर्यंत किती उमेदवार माघार घेतात, यावर निवडणुकीतील चित्र अवलंबून राहणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकी ही पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी पक्षाचे समर्थक, पक्षाच्या कार्यकर्त्यांना ग्राम पंचायतच्या सत्तेत बसविण्यासाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारीप-बमसं या प्रमुख पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याचे दिसून येते. आगामी डिसेंबर २०१८ मध्ये पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत निवडणूक ही रंगीत तालिम ठरत असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची कसोटी लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक अविरोध करणे तसेच बंडखोरांना शांत करण्यासाठी स्थानिक नेते, आघाडी प्रमुखांनी उमेदवारांनी माघार घेण्याकरिता प्रयत्न चालविल्याचे दिसून येते. या प्रयत्नांना कितपत यश येते, हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर स्पष्ट होणार आहे.