शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शाळांतर्गत शैक्षणिक सहली बंद होण्याच्या मार्गावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 02:01 IST

मालेगाव : विद्यार्थी दशेत सदोदित हवीहवीशी वाटणारी शैक्षणिक सहल विविध स्वरूपातील जाचक अटींमुळे कायमची बंद होण्याच्या मार्गावर आहे. सहलीकरिता केवळ परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसचाच वापर करण्याचे बंधन असून, यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासंबंधी तालुक्यातील शाळांमधील शिक्षकांकडून उदासीनता बाळगली जात असल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून एकही सहल निघाली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देजाचक अटींमुळे वाढल्या अडचणी शिक्षकांचा त्रास बळावला!

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : विद्यार्थी दशेत सदोदित हवीहवीशी वाटणारी शैक्षणिक सहल विविध स्वरूपातील जाचक अटींमुळे कायमची बंद होण्याच्या मार्गावर आहे. सहलीकरिता केवळ परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसचाच वापर करण्याचे बंधन असून, यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासंबंधी तालुक्यातील शाळांमधील शिक्षकांकडून उदासीनता बाळगली जात असल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून एकही सहल निघाली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.शिक्षण उपसंचालकांकडून गतवर्षी जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीसाठी एस.टी. बस अथवा अन्य शासकीय मान्यताप्राप्त असलेल्या तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी मंजुरी दिलेल्या वाहनांमधूनच सहल काढता येऊ शकते. मात्र, एस.टी. बसेस उपलब्ध करण्यासाठी शाळांची पुरती धांदल उडत असून, आगार व्यवस्थापनाशी संपर्क साधण्यापासून बस उपलब्ध होईपर्यंत मोठा कालावधी लागत आहे. याशिवाय विद्यार्थ्यांचे पालक, संस्थाध्यक्ष, शिक्षण विभागाची परवानगीदेखील यासाठी बंधनकारक असल्याने बहुतांश शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांनी शैक्षणिक सहल काढण्याबाबत उदासीनता बाळगली आहे. त्यामुळे यासंदर्भातील जाचक अटींमध्ये शिथिलता आणावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

शैक्षणिक सहलीदरम्यान अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्या पृष्ठभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने काही नियम घालून दिले आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच बाहेर जगाचीही माहिती व्हावी, यासाठी शैक्षणिक सहल आवश्यक असून, त्यासाठी शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांनी अटींची पूर्तता करून शैक्षणिक सहलींचे आयोजन करायला हवे. - डॉ. ज्ञानेश्‍वर नागरेमाध्यमिक शिक्षणाधिकारी, वाशिम 

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाStudentविद्यार्थी