शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

वाशिम जिल्ह्यात ई-पासचा गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 11:55 IST

सेतू केंद्रांत ५०० ते १००० रुपये देणाऱ्यांना पास काढून दिली जात असल्याचा प्रकार सुरू आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रणासाठी प्रशासनाने जिल्हाबंदी केली आहे. अत्यंत महत्त्वाच्या कामांसाठी ई-पास घेऊन संबंधितांना जिल्ह्याबाहेर जावे लागत आहे. ही ई-पास काढण्यासाठी आॅनलाईन अर्ज करावा लागत असून, या आॅनलाईन अर्ज प्र्रक्रियेत गरिबांना त्रास होत आहे, तर सेतू केंद्रांत ५०० ते १००० रुपये देणाऱ्यांना पास काढून दिली जात असल्याचा प्रकार सुरू आहे.कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रणासाठी शासन, प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. तथापि, यासाठी करण्यात येत असलेल्या उपाय योजना आणि लॉकडाऊनसह जिल्हाबंदीमुळे अत्यावश्यक सेवेत अडथळा येऊ नये म्हणून शासनाने प्रवासासाठी ई-पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही पास काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे आॅनलाईन अर्ज करावा लागतो. त्यात प्रवासाचे कारण आणि आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात. प्रामुख्याने आरोग्यविषयक सुविधांसाठीच ई-पासला प्राधान्य असले तरी, अनलॉकच्या काळात इतरही काही अत्यंत महत्त्वाच्या कामांसाठी ही पास काढता येते. आॅनलाईन अर्जाची पडताळणी करून जिल्हास्तरावरूनच पास मंजूर केली जाते. तथापि, या प्रक्रियेत अनेकांना अडथळे येत आहेत. काही मंडळी सेतू केंद्रांद्वारे अर्ज करीत आहेत; परंतु सेतू केंद्रांकडून यासाठी मनमानी पद्धतीने त्यांच्याकडून शुल्क वसुल केले जात आहे.

आंतर जिल्हा प्रवासासाठी ई-पास दिली जाते. त्यासाठी ंआवश्यक कागदपत्रे जोडून आॅनलाईन अर्ज करावा लागतो. यात कोणाकडून अवाजवी पैसे वसूल केले जात असतील, ते चूक आहे. आमच्याकडे अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितावर कारवाई करू.-शरद पाटील,अतिरिक्त जिल्हाधिकारी, वाशिम

मी मुलीला सासरी पाठविण्यासाठी ई-पास काढण्याच्या उद्देशाने आॅनलाईन पद्धतीने अर्ज केला. नियमानुसार शुल्कही भरले; परंतु आठवडाभर प्रतिक्षा करूनही मला ई-पास मिळाली नाही. काही सेतू केंद्रधारक आॅनलाईन अर्ज करताना मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी करीत असल्याचे त्यानंतर मला कळले.-डॉ. अविनाश मनवर,ग्रामस्थ, इंझोरी

टॅग्स :washimवाशिमCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक