शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

वाशिम जिल्ह्यात ई-पासचा गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 11:55 IST

सेतू केंद्रांत ५०० ते १००० रुपये देणाऱ्यांना पास काढून दिली जात असल्याचा प्रकार सुरू आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रणासाठी प्रशासनाने जिल्हाबंदी केली आहे. अत्यंत महत्त्वाच्या कामांसाठी ई-पास घेऊन संबंधितांना जिल्ह्याबाहेर जावे लागत आहे. ही ई-पास काढण्यासाठी आॅनलाईन अर्ज करावा लागत असून, या आॅनलाईन अर्ज प्र्रक्रियेत गरिबांना त्रास होत आहे, तर सेतू केंद्रांत ५०० ते १००० रुपये देणाऱ्यांना पास काढून दिली जात असल्याचा प्रकार सुरू आहे.कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रणासाठी शासन, प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. तथापि, यासाठी करण्यात येत असलेल्या उपाय योजना आणि लॉकडाऊनसह जिल्हाबंदीमुळे अत्यावश्यक सेवेत अडथळा येऊ नये म्हणून शासनाने प्रवासासाठी ई-पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही पास काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे आॅनलाईन अर्ज करावा लागतो. त्यात प्रवासाचे कारण आणि आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात. प्रामुख्याने आरोग्यविषयक सुविधांसाठीच ई-पासला प्राधान्य असले तरी, अनलॉकच्या काळात इतरही काही अत्यंत महत्त्वाच्या कामांसाठी ही पास काढता येते. आॅनलाईन अर्जाची पडताळणी करून जिल्हास्तरावरूनच पास मंजूर केली जाते. तथापि, या प्रक्रियेत अनेकांना अडथळे येत आहेत. काही मंडळी सेतू केंद्रांद्वारे अर्ज करीत आहेत; परंतु सेतू केंद्रांकडून यासाठी मनमानी पद्धतीने त्यांच्याकडून शुल्क वसुल केले जात आहे.

आंतर जिल्हा प्रवासासाठी ई-पास दिली जाते. त्यासाठी ंआवश्यक कागदपत्रे जोडून आॅनलाईन अर्ज करावा लागतो. यात कोणाकडून अवाजवी पैसे वसूल केले जात असतील, ते चूक आहे. आमच्याकडे अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितावर कारवाई करू.-शरद पाटील,अतिरिक्त जिल्हाधिकारी, वाशिम

मी मुलीला सासरी पाठविण्यासाठी ई-पास काढण्याच्या उद्देशाने आॅनलाईन पद्धतीने अर्ज केला. नियमानुसार शुल्कही भरले; परंतु आठवडाभर प्रतिक्षा करूनही मला ई-पास मिळाली नाही. काही सेतू केंद्रधारक आॅनलाईन अर्ज करताना मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी करीत असल्याचे त्यानंतर मला कळले.-डॉ. अविनाश मनवर,ग्रामस्थ, इंझोरी

टॅग्स :washimवाशिमCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक