शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

वाशिम जिल्ह्यात ई-पासचा गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 11:55 IST

सेतू केंद्रांत ५०० ते १००० रुपये देणाऱ्यांना पास काढून दिली जात असल्याचा प्रकार सुरू आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रणासाठी प्रशासनाने जिल्हाबंदी केली आहे. अत्यंत महत्त्वाच्या कामांसाठी ई-पास घेऊन संबंधितांना जिल्ह्याबाहेर जावे लागत आहे. ही ई-पास काढण्यासाठी आॅनलाईन अर्ज करावा लागत असून, या आॅनलाईन अर्ज प्र्रक्रियेत गरिबांना त्रास होत आहे, तर सेतू केंद्रांत ५०० ते १००० रुपये देणाऱ्यांना पास काढून दिली जात असल्याचा प्रकार सुरू आहे.कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रणासाठी शासन, प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. तथापि, यासाठी करण्यात येत असलेल्या उपाय योजना आणि लॉकडाऊनसह जिल्हाबंदीमुळे अत्यावश्यक सेवेत अडथळा येऊ नये म्हणून शासनाने प्रवासासाठी ई-पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही पास काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे आॅनलाईन अर्ज करावा लागतो. त्यात प्रवासाचे कारण आणि आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात. प्रामुख्याने आरोग्यविषयक सुविधांसाठीच ई-पासला प्राधान्य असले तरी, अनलॉकच्या काळात इतरही काही अत्यंत महत्त्वाच्या कामांसाठी ही पास काढता येते. आॅनलाईन अर्जाची पडताळणी करून जिल्हास्तरावरूनच पास मंजूर केली जाते. तथापि, या प्रक्रियेत अनेकांना अडथळे येत आहेत. काही मंडळी सेतू केंद्रांद्वारे अर्ज करीत आहेत; परंतु सेतू केंद्रांकडून यासाठी मनमानी पद्धतीने त्यांच्याकडून शुल्क वसुल केले जात आहे.

आंतर जिल्हा प्रवासासाठी ई-पास दिली जाते. त्यासाठी ंआवश्यक कागदपत्रे जोडून आॅनलाईन अर्ज करावा लागतो. यात कोणाकडून अवाजवी पैसे वसूल केले जात असतील, ते चूक आहे. आमच्याकडे अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितावर कारवाई करू.-शरद पाटील,अतिरिक्त जिल्हाधिकारी, वाशिम

मी मुलीला सासरी पाठविण्यासाठी ई-पास काढण्याच्या उद्देशाने आॅनलाईन पद्धतीने अर्ज केला. नियमानुसार शुल्कही भरले; परंतु आठवडाभर प्रतिक्षा करूनही मला ई-पास मिळाली नाही. काही सेतू केंद्रधारक आॅनलाईन अर्ज करताना मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी करीत असल्याचे त्यानंतर मला कळले.-डॉ. अविनाश मनवर,ग्रामस्थ, इंझोरी

टॅग्स :washimवाशिमCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक