शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पीक पंचनामे लांबणीवर; नुकसानग्रस्त शेतकरी वाऱ्यावर!

By संतोष वानखडे | Updated: March 19, 2023 18:04 IST

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पीक पंचनामे लांबणीवर पडत असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. 

वाशिम : अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले तर दुसरीकडे कर्मचारी संपामुळे नुकसानग्रस्त भागातील पीक पंचनामेही लांबणीवर पडत आहेत. यामुळे शासनदरबारी अहवाल केव्हा  पोहचतील आणि मदत केव्हा मिळेल? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात १४ ते १६ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस, वादळवारा व गारपिटीने रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर १७ मार्चला मालेगाव व मंगरूळपीर तालुक्यात गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले. १८ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजतानंतर वाशिमसह जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पाऊस व गारपिट झाल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली. नुकसानग्रस्त भागात तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांसह उच्चस्तरीय यंत्रणेने दिलेले आहेत. मात्र, सध्या जून्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे. या संपात इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक सहभागी झाले आहेत. पीक पंचनाम्याच्या प्रक्रियेत नेमके हेच कर्मचारी अग्रस्थानी असतात. जवळपास ९० टक्क्यापेक्षा अधिक संख्येने तलाठी, ग्रामसेवक, कृषी कर्मचारी संपात असल्याने, पंचनाम्यासाठी प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. परिणामी, नुकसानग्रस्त भागातील पीक पंचनामेदेखील लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.   शेतात गारपिटीचा खच! १८ मार्चला मंगरूळपीर, मानोरा , कारंजा, वाशिम तालुक्यात अवकाळी पावसासह गारपिट झाली. मंगरूळपीर व मानोरा तालुक्यात अनेक ठिकाणी शेतात गारपिटीचा खच पडून असल्याचे पाहावयास मिळाले. गारपिटीमुळे गहू, हरभऱ्यासह फळबागा, भाजीपालावर्गीय पिकांचे  प्रचंड नुकसान झाले.

 

टॅग्स :washimवाशिमRainपाऊस