शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पीक पंचनामे लांबणीवर; नुकसानग्रस्त शेतकरी वाऱ्यावर!

By संतोष वानखडे | Updated: March 19, 2023 18:04 IST

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पीक पंचनामे लांबणीवर पडत असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. 

वाशिम : अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले तर दुसरीकडे कर्मचारी संपामुळे नुकसानग्रस्त भागातील पीक पंचनामेही लांबणीवर पडत आहेत. यामुळे शासनदरबारी अहवाल केव्हा  पोहचतील आणि मदत केव्हा मिळेल? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात १४ ते १६ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस, वादळवारा व गारपिटीने रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर १७ मार्चला मालेगाव व मंगरूळपीर तालुक्यात गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले. १८ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजतानंतर वाशिमसह जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पाऊस व गारपिट झाल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली. नुकसानग्रस्त भागात तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांसह उच्चस्तरीय यंत्रणेने दिलेले आहेत. मात्र, सध्या जून्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे. या संपात इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक सहभागी झाले आहेत. पीक पंचनाम्याच्या प्रक्रियेत नेमके हेच कर्मचारी अग्रस्थानी असतात. जवळपास ९० टक्क्यापेक्षा अधिक संख्येने तलाठी, ग्रामसेवक, कृषी कर्मचारी संपात असल्याने, पंचनाम्यासाठी प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. परिणामी, नुकसानग्रस्त भागातील पीक पंचनामेदेखील लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.   शेतात गारपिटीचा खच! १८ मार्चला मंगरूळपीर, मानोरा , कारंजा, वाशिम तालुक्यात अवकाळी पावसासह गारपिट झाली. मंगरूळपीर व मानोरा तालुक्यात अनेक ठिकाणी शेतात गारपिटीचा खच पडून असल्याचे पाहावयास मिळाले. गारपिटीमुळे गहू, हरभऱ्यासह फळबागा, भाजीपालावर्गीय पिकांचे  प्रचंड नुकसान झाले.

 

टॅग्स :washimवाशिमRainपाऊस