शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

निधीच्या कमतरतेमुळे जिल्ह्यातील धरणांची देखभाल, दुरूस्ती वांध्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 14:33 IST

निधी अत्यंत तोकडया स्वरुपातील राहत असल्याने ही स्थिती उद्भवली असून खर्च भागविणे कठीण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हयात छोटी-मोठी मिळून १५० धरणे आहेत. यामाध्यमातून त्यांची देखभाल दुरुस्ती दरवर्षी होणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. शासनाकडून पाठविला जाणारा निधी अत्यंत तोकडया स्वरुपातील राहत असल्याने ही स्थिती उद्भवली असून खर्च भागविणे कठीण झाले आहे. या समस्येमुळे लघुपाटबंधारे विभागही हतबल झाला आहे.जिल्ह्यातील धरणांमधून दरवर्षी रब्बी हंगामात कालव्यांव्दारे सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. त्यामुळे हे कालवे हंगामापुर्वी स्वच्छ करून तुटफूट झाल्यास त्याची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. यासह धरणावरील भिंतींवर उगवणाऱ्या झाडांची वेळोवेळी कटाई करणेही आवश्यक ठरत असून या महत्वाच्या कामांकडे लघुपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, लघू पाटबंधारे विभागास जिल्ह्यातील १५० धरणांच्या देखभाल, दुरूस्तीसाठी मिळणारा निधी अत्यंत तोकड्या स्वरूपात असून त्यातून कालवे दुरूस्ती, धरणांच्या भिंतींवरील झाडांची कटाई, पाणीवापर संस्थांचे बळकटीकरण, धरणांवरील कर्मचाऱ्यांचे मानधन आदी खर्च भागविणे अशक्य होत असल्याची माहिती प्राप्त झाली. परिणामी, दरवर्षी तालुकानिहाय केवळ दोन ते तीनच प्रकल्पांची देखभाल-दुरूस्ती शक्य होत आहे. बहुतांश धरणांची स्थिती मात्र अत्यंत दयनिय असून अनेक ठिकाणचे कालवे नादुरूस्त असल्याने रब्बी हंगामातील सिंचनावर त्याचा परिणाम जाणवत असल्याचे दिसून येत आहे.वाशिम जिल्ह्यात लघूपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित १५० धरणे येतात. त्यात बहुतांश धरणांची व्याप्ती तुलनेने मोठी आहे. या सर्व धरणांची देखभाल-दुरूस्ती करण्यासाठी शासनाकडून दरवर्षी साधारणत: २ कोटींचा निधी मिळतो. यंदा तर तो १.८० कोटीच मिळाला. एवढ्या कमी पैशातून देखभाल-दुरूस्तीसह इतरही खर्च भागविणे कठीण होत आहे. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरही पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.- प्रशांत बोरसे, कार्यकारी अभियंता, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प