शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दर १५ दिवसांनी होणार दुष्काळी परिस्थितीचे मुल्यांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 16:31 IST

जिल्हास्तरावर दुष्काळ मुल्यांकन करण्याची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश कृषी आयुक्तांनी दिले आहेत.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: राज़्यशासनाने ७ आॅक्टोबर २०१७ च्या निर्णयान्वये विहित केलेल्या दुष्काळ मुल्यांकन कार्यपद्धतीनुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरावर दुष्काळ मुल्यांकन करण्याची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश कृषी आयुक्तांनी दिले आहेत. त्यात दर १५ दिवसांनी जिल्हास्तर दुष्काळ देखरेख समित्यांनी बैठक घेऊन बदलत्या परिस्थितीनुसार उपाय योजना करण्याचे निर्देशही कृषी आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना २७ जुलै रोजीच्या पत्राद्वारे दिले आहेत.राज्य शासनाने ७ आॅक्टोबर २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार दुष्काळाचे मुल्यांकन करण्याची सविस्तर कार्यपद्धतीने विहित केली आहे. सद्यस्थितीत यंदाच्या खरीप हंगामास सुरुवात झाली असून, संभाव्य परिस्थितीचा विचार करून शासन निर्णयात नमूद पद्धतीनुसार दुष्काळाचे मुल्यांकन करणे आवश्यक आहे. या पृष्ठभूमीवर कृषी आयुक्त तथा राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या अध्यक्षांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना २७ जुलै रोजी पत्र पाठवित जिल्हास्तरीय दुष्काळ समितीमार्फत यंदाच्या वर्षात दुष्काळाचे मुल्यांकन करण्याची प्रक्रिया चालू करण्याच्या सुचना केल्या आहेत. दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ मधील कार्यपद्धतीनुसार दुष्काळाचे मुल्यांकन करण्यासाठी महा-मदत ही संगणकीय प्रणाली एमआरएसएसी नागपूरच्या मदतीने कार्यान्वित करण्यात आली असून, या प्रणालीचा वापर दुष्काळाचे मुल्यांकन करण्यासाठी करावा, तसेच जिल्हास्तर दुष्काळ देखरेख समितीची दर १५ दिवसांनी बैठक आयोजित करून जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासह बदलत्या परिस्थितीनुसार आवश्यक उपाय योजना करून त्याबाबतचा अहवालही आयुक्तालयास ई-मेलवर पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :washimवाशिमdroughtदुष्काळ